शहरं
Join us  
Trending Stories
1
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
2
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
3
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
4
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
5
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
6
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    
7
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!
8
बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी
9
'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक?
10
Mumbai Crime: सफाई करताना दरोडेखोर घुसले; दागिने वाचवणाऱ्या दुकानमालकावर केले वार, घाटकोपरमध्ये ज्वेलर्सला लुटले
11
जखमेवर मीठ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, आयसीसीनं ठोठावला दंड
12
निवडणुक आयोगाकडे विरोधकांच्या चकरा म्हणजे 'फियास्को', देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
13
'निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने कारण शोधण्याचा खटाटोप'; शिष्ठमंडळाच्या बैठकीवर शंभूराज देसाईंची टीका
14
Gold Price Today 15 October: आजही सोन्यात तेजी, पण चांदीचे दर घसरले; पाहा १८,२२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर
15
अरे बापरे! तुम्हीही प्लास्टिकचा कोबी खाताय? धक्कादायक Video पाहून व्हाल हैराण
16
दुर्गापूरमध्ये मित्रानेच एमबीबीएस विद्यार्थिनीवर लैगिक अत्याचार केले? पोलिसांनी केली अटक
17
Bihar Election JDU: चिराग पासवानांना नितीश कुमारांचा झटका; दावा केलेल्या जागांवरच उतरवले उमेदवार
18
"...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते"; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं
19
बॉलिवूडवर शोककळा! पंकज धीर यांच्यानंतर दिग्गज अभिनेत्री मधुमती यांचं निधन, ८७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
अजब देश! संसद, सरकार, सैन्य सगळं आहे, पण जगाच्या नकाशावर अस्तित्वच नाही, कारण काय?

दुष्काळी भागाला वरदान ठरणारी योजना- - अमोल निकम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 01:07 IST

जिहे-कटापूर योजनेच्या कामाला गती मिळाली आहे. ही योजना दुष्काळी भागाला वरदान ठरणारी आहे. येरळा आणि माणगंगा या दोन्ही नद्या वाहत्या होणार आहेत. - अमोल निकम, कार्यकारी अभियंता, जिहे-कटापूर योजना

ठळक मुद्दे जिहे-कटापूरचे पाणी मार्चअखेर नेर तलावात--चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

सागर गुजर।सातारा : माण-खटाव तालुक्यांतील दुष्काळग्रस्त गावांतील शेती जहे-कटापूर योजनेमुळे सिंचनाखाली येणार आहे. मार्च २०२० पर्यंत एका जलवाहिनेचे काम पूर्ण करून नेर तलावात पाणी सोडले जाणार आहे. या धरणातून येरळा नदी उन्हाळ्यातही वाहती ठेवण्यात यश येईल. या योजनेमुळे दुष्काळी भागातील शेतकरी निश्चितपणे नगदी पिके घेऊ शकणार आहेत.

  • प्रश्न : जिहे-कटापूर योजनेचे स्वरूप कसे आहे?

उत्तर : जिहे-कटापूर ही योजना अत्यंत महत्त्वकांक्षी अशी योजना आहे. सातारा तालुक्यात कृष्णा नदीतून हे पाणी उचलून ते तब्बल १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या नेर तलावात सोडण्यात येणार आहे. नेर नदीतून हे पाणी येरळा नदीत सोडले जाणार असून, पुढे आंधळी धरणातही पाणी सोडून माणगंगा नदी वाहती ठेवण्यात येणार आहे. या योजनेमुळे दुष्काळी भागातील पाणी पातळीत निश्चितपणे वाढ होईल.

  • प्रश्न : या योजनेचे लाभक्षेत्र किती आहे?

उत्तर : खटाव तालुक्यातील ४७ गावे आणि माण तालुक्यातील २० गावांतील सुमारे २७ हजार ५०० हेक्टर शेती क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यामध्ये खटाव तालुक्यातील ११ हजार ७०० हेक्टर तर माण तालुक्यातील १५ हजार ८०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल.

  • प्रश्न : किती केटीवेअर बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले आहेत?

उत्तर : येरळा नदीवर १५ केटीवेअर आणि माणगंगा नदीवर १७ केटीवेअर बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यापैकी एका केटीवेअरचे काम सुरू असून, उर्वरित ३१ केटीवेअर बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे. मागील पावसाळ्यात दुष्काळी भागामध्ये चांगला पाऊस झाला. या पावसामुळे दोन्ही नद्यांवरील केटीवेअर बंधारे पाण्याने भरले आहेत. साहजिकच झिरपलेल्या पाण्यामुळे फायदा होईल.

अशी आहे जिहे-कटापूर योजनाकृष्णा नदीवर सातारा तालुक्यातील जिहे-कटापूर या गावाजवळ पंप हाऊस तयार करण्यात आले आहेत. जिहे, एकसळ, गोळेवाडी या ठिकाणी तीन टप्प्यांमध्ये पाणी उचलून हे पाणी खटाव तालुक्यातील नेर तलावात सोडण्यात येईल. तिथून हे पाणी येरळा नदीत सोडले जाईल. या नदीतून केटी बंधाऱ्याद्वारे ठिकठिकाणी पाणी अडवण्यात येणार आहे. तर तिथून पुढे हेच पाणी आंधळी तलावात नेले जाणार आहे. हा तलाव भरून ते पाणी माणगंगा नदीत सोडले जाणार आहे. या नदीवरही केटीवेअर बंधारे बांधण्यात आले आहेत.नैसर्गिक उताराचा होणार फायदा

कृष्णा नदीतून उंच अशा दुष्काळी भागात पाणी उचलून नेताना पंप हाऊसची गरज पडणार आहे. मात्र, येरळा आणि माणगंगा या दोन्ही नद्यांतून लगतच्या शेतकऱ्यांना पाणी देताना बहुतांश ठिकाणी नैसर्गिक उताराचा फायदा घेतला जाणार आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड पडणार नाही.

टॅग्स :satara-acसातारा