शहरं
Join us  
Trending Stories
1
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी भागाला वरदान ठरणारी योजना- - अमोल निकम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 01:07 IST

जिहे-कटापूर योजनेच्या कामाला गती मिळाली आहे. ही योजना दुष्काळी भागाला वरदान ठरणारी आहे. येरळा आणि माणगंगा या दोन्ही नद्या वाहत्या होणार आहेत. - अमोल निकम, कार्यकारी अभियंता, जिहे-कटापूर योजना

ठळक मुद्दे जिहे-कटापूरचे पाणी मार्चअखेर नेर तलावात--चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

सागर गुजर।सातारा : माण-खटाव तालुक्यांतील दुष्काळग्रस्त गावांतील शेती जहे-कटापूर योजनेमुळे सिंचनाखाली येणार आहे. मार्च २०२० पर्यंत एका जलवाहिनेचे काम पूर्ण करून नेर तलावात पाणी सोडले जाणार आहे. या धरणातून येरळा नदी उन्हाळ्यातही वाहती ठेवण्यात यश येईल. या योजनेमुळे दुष्काळी भागातील शेतकरी निश्चितपणे नगदी पिके घेऊ शकणार आहेत.

  • प्रश्न : जिहे-कटापूर योजनेचे स्वरूप कसे आहे?

उत्तर : जिहे-कटापूर ही योजना अत्यंत महत्त्वकांक्षी अशी योजना आहे. सातारा तालुक्यात कृष्णा नदीतून हे पाणी उचलून ते तब्बल १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या नेर तलावात सोडण्यात येणार आहे. नेर नदीतून हे पाणी येरळा नदीत सोडले जाणार असून, पुढे आंधळी धरणातही पाणी सोडून माणगंगा नदी वाहती ठेवण्यात येणार आहे. या योजनेमुळे दुष्काळी भागातील पाणी पातळीत निश्चितपणे वाढ होईल.

  • प्रश्न : या योजनेचे लाभक्षेत्र किती आहे?

उत्तर : खटाव तालुक्यातील ४७ गावे आणि माण तालुक्यातील २० गावांतील सुमारे २७ हजार ५०० हेक्टर शेती क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यामध्ये खटाव तालुक्यातील ११ हजार ७०० हेक्टर तर माण तालुक्यातील १५ हजार ८०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल.

  • प्रश्न : किती केटीवेअर बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले आहेत?

उत्तर : येरळा नदीवर १५ केटीवेअर आणि माणगंगा नदीवर १७ केटीवेअर बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यापैकी एका केटीवेअरचे काम सुरू असून, उर्वरित ३१ केटीवेअर बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे. मागील पावसाळ्यात दुष्काळी भागामध्ये चांगला पाऊस झाला. या पावसामुळे दोन्ही नद्यांवरील केटीवेअर बंधारे पाण्याने भरले आहेत. साहजिकच झिरपलेल्या पाण्यामुळे फायदा होईल.

अशी आहे जिहे-कटापूर योजनाकृष्णा नदीवर सातारा तालुक्यातील जिहे-कटापूर या गावाजवळ पंप हाऊस तयार करण्यात आले आहेत. जिहे, एकसळ, गोळेवाडी या ठिकाणी तीन टप्प्यांमध्ये पाणी उचलून हे पाणी खटाव तालुक्यातील नेर तलावात सोडण्यात येईल. तिथून हे पाणी येरळा नदीत सोडले जाईल. या नदीतून केटी बंधाऱ्याद्वारे ठिकठिकाणी पाणी अडवण्यात येणार आहे. तर तिथून पुढे हेच पाणी आंधळी तलावात नेले जाणार आहे. हा तलाव भरून ते पाणी माणगंगा नदीत सोडले जाणार आहे. या नदीवरही केटीवेअर बंधारे बांधण्यात आले आहेत.नैसर्गिक उताराचा होणार फायदा

कृष्णा नदीतून उंच अशा दुष्काळी भागात पाणी उचलून नेताना पंप हाऊसची गरज पडणार आहे. मात्र, येरळा आणि माणगंगा या दोन्ही नद्यांतून लगतच्या शेतकऱ्यांना पाणी देताना बहुतांश ठिकाणी नैसर्गिक उताराचा फायदा घेतला जाणार आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड पडणार नाही.

टॅग्स :satara-acसातारा