शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीवर दुष्काळाचे सावट; साताऱ्यात सव्वा लाख हेक्टरवर पेर, पेरणी किती..जाणून घ्या

By नितीन काळेल | Updated: November 23, 2023 18:53 IST

सातारा : जिल्ह्यात खरीपनंतर रब्बी हंगाम मोठा घेण्यात येतो. पण, यंदा पावसाअभावी या हंगामावर दुष्काळाचे सावट आहे. कारण, डिसेंबर ...

सातारा : जिल्ह्यात खरीपनंतर रब्बी हंगाम मोठा घेण्यात येतो. पण, यंदा पावसाअभावी या हंगामावर दुष्काळाचे सावट आहे. कारण, डिसेंबर महिना उजाडत आलातरी वेग नसल्याने आतापर्यंत ५३ टक्के म्हणजे १ लाख १३ हजार हेक्टरवरच पेरणी झालेली आहे. तर भविष्यात पाणी कमी पडण्याच्या भीतीने शेतकऱ्यांत पेरणीबद्दल धाकधूक कायम आहे.जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढत चालले आहे. सध्यस्थितीत १ लाख हेक्टरवर ऊस राहतो. त्यामुळेच जिल्ह्यातील साखर कारखान्यांचीही संख्या वाढत चालली आहे. तरीही जिल्ह्यात खरीप आणि रब्बी असे प्रमुख दोन हंगाम मोठ्या प्रमाणात घेतले जातात. खरीपाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख हेक्टरपर्यंत राहते. तर रब्बीचे २ लाख १३ हजार २४४ हेक्टर निश्चित करण्यात आलेले आहे. सध्या रब्बीच्या हंगामावर दुष्काळाचे सावट गडद आहे. कारण, या हंगामातील सर्वाधिक क्षेत्र हे दुष्काळी तालुक्यात अधिक राहते. यामध्ये माण तालुक्यात ४६ हजार ४१८ हेक्टर असून फलटणला सुमारे ३१ हजार, खटाव २९ हजार ८२१, कोरेगाव २१ हजार २६६, सातारा तालुका १४ हजार ९७०, खंडाळा १४ हजार हेक्टर, पाटण १७ हजार ८०९, कऱ्हाड १४ हजार ७३२, जावळी ८ हजार हेक्टर, वाई १४ हजार ६८९ आणि महाबळेश्वर तालुक्यात ६४५ हेक्टर क्षेत्र आहे. पण, यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यात तरी रब्बीच्या पेरणीवर परिणाम होण्याची भीती आहे. या तालुक्यांत यावर्षी सरासरीच्या ५० ते ६५ टक्क्यांपर्यंतच पाऊस झालेला आहे. त्यामुळे पेरणी केलीतर पुढे पिकांना पाणी मिळणार का ? याची शास्वती नाही. परिणामी शेतकऱ्यांचे पेरणीचे धाडस करत नाहीत.जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख १३ हजार २५१ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. हे प्रमाण ५३.११ टक्के इतके आहे. यामध्ये माण तालुक्यात सुमारे ५८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर खटावमध्ये ६५ टक्के, सातारा ७४, जावळी ३८, पाटण ७० टक्के, कऱ्हाड २१, कोरेगाव ६०, फलटण ३९, खंडाळा ३८, वाई तालुक्यात ४५ आणि महाबळेश्वर तालुक्यात ९ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. या आकडेवारीवरुन दुष्काळी तालुक्याततरी १०० टक्के पेरणी होणार का याविषयी साशंकता व्यक्त होत आहे.

ज्वारीची ८८ हजार हेक्टरवर पेरणी..जिल्ह्यात ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र हे १ लाख ३५ हजार ५३१ हेक्टर आहे. आतापर्यंत प्रत्यक्षात ८८ हजार ५२० हेक्टरवर पेरणी झालेली आहे. त्यातच ज्वारीची पेरणी आॅक्टोबर ते नोव्हेंबरच्या पहिल्या काही दिवसांत करण्यात येते. पाऊस कमी असल्याने यंदा ज्वारीच्या क्षेत्रात घट होण्याचा अंदाज आहे. कारण, ज्वारीचे सर्वाधिक क्षेत्र माणमध्ये ३८ हजार ५३४ हेक्टर आहे. येथे २४ हजार हेक्टरवर ज्वारी पेरणी झाली. यापुढे ज्वारीची पेरणी होणार नाही. तर खटावला २० हजार हेक्टर क्षेत्र असलेतरी सुमारे १४ हजार हेक्टरवर पेर आहे. कोरेगावमध्ये १० हजार ६९४ आणि फलटण तालुक्यात ८ हजार ४१३ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झालेली आहे.

खरीपात १९ हजार हेक्टर क्षेत्र नापेर..जिल्ह्यातील खरीप हंगाम हा पावसाळ्यातच असतो. पण, यंदा जून आणि जुलैमध्येही पाऊस कमी पडला. त्यामुळे याचा परिणाम पेरणीवर झाला. खरीप पेरणी ९३ टक्केच झाली. त्यामुळे १९ हजार हेक्टर क्षेत्र हे नापेर राहिले होते. यामध्ये बाजरीचे क्षेत्र सर्वाधिक होते. पण, सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झालेली.

ओढे काेरडे, विहिरींचा तळ..रब्बी हंगाम प्रामुख्याने दुष्काळी तालुक्यातच मोठ्या प्रमाणात घेण्यात येतो. पण, या तालुक्यातील बहुतांशी ओढे काेरडे पडलेले आहे. विहिरींनी तळ गाठलेला आहे. यामुळे शेतकरी पेरणी करण्यास कचरत आहेत. आता पेरणी केलीतर जानेवारीपासून पिकांना पाणी मिळणे अवघड होऊन जाणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीdroughtदुष्काळ