शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

रब्बीवर दुष्काळाचे सावट; साताऱ्यात सव्वा लाख हेक्टरवर पेर, पेरणी किती..जाणून घ्या

By नितीन काळेल | Updated: November 23, 2023 18:53 IST

सातारा : जिल्ह्यात खरीपनंतर रब्बी हंगाम मोठा घेण्यात येतो. पण, यंदा पावसाअभावी या हंगामावर दुष्काळाचे सावट आहे. कारण, डिसेंबर ...

सातारा : जिल्ह्यात खरीपनंतर रब्बी हंगाम मोठा घेण्यात येतो. पण, यंदा पावसाअभावी या हंगामावर दुष्काळाचे सावट आहे. कारण, डिसेंबर महिना उजाडत आलातरी वेग नसल्याने आतापर्यंत ५३ टक्के म्हणजे १ लाख १३ हजार हेक्टरवरच पेरणी झालेली आहे. तर भविष्यात पाणी कमी पडण्याच्या भीतीने शेतकऱ्यांत पेरणीबद्दल धाकधूक कायम आहे.जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढत चालले आहे. सध्यस्थितीत १ लाख हेक्टरवर ऊस राहतो. त्यामुळेच जिल्ह्यातील साखर कारखान्यांचीही संख्या वाढत चालली आहे. तरीही जिल्ह्यात खरीप आणि रब्बी असे प्रमुख दोन हंगाम मोठ्या प्रमाणात घेतले जातात. खरीपाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख हेक्टरपर्यंत राहते. तर रब्बीचे २ लाख १३ हजार २४४ हेक्टर निश्चित करण्यात आलेले आहे. सध्या रब्बीच्या हंगामावर दुष्काळाचे सावट गडद आहे. कारण, या हंगामातील सर्वाधिक क्षेत्र हे दुष्काळी तालुक्यात अधिक राहते. यामध्ये माण तालुक्यात ४६ हजार ४१८ हेक्टर असून फलटणला सुमारे ३१ हजार, खटाव २९ हजार ८२१, कोरेगाव २१ हजार २६६, सातारा तालुका १४ हजार ९७०, खंडाळा १४ हजार हेक्टर, पाटण १७ हजार ८०९, कऱ्हाड १४ हजार ७३२, जावळी ८ हजार हेक्टर, वाई १४ हजार ६८९ आणि महाबळेश्वर तालुक्यात ६४५ हेक्टर क्षेत्र आहे. पण, यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यात तरी रब्बीच्या पेरणीवर परिणाम होण्याची भीती आहे. या तालुक्यांत यावर्षी सरासरीच्या ५० ते ६५ टक्क्यांपर्यंतच पाऊस झालेला आहे. त्यामुळे पेरणी केलीतर पुढे पिकांना पाणी मिळणार का ? याची शास्वती नाही. परिणामी शेतकऱ्यांचे पेरणीचे धाडस करत नाहीत.जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख १३ हजार २५१ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. हे प्रमाण ५३.११ टक्के इतके आहे. यामध्ये माण तालुक्यात सुमारे ५८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर खटावमध्ये ६५ टक्के, सातारा ७४, जावळी ३८, पाटण ७० टक्के, कऱ्हाड २१, कोरेगाव ६०, फलटण ३९, खंडाळा ३८, वाई तालुक्यात ४५ आणि महाबळेश्वर तालुक्यात ९ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. या आकडेवारीवरुन दुष्काळी तालुक्याततरी १०० टक्के पेरणी होणार का याविषयी साशंकता व्यक्त होत आहे.

ज्वारीची ८८ हजार हेक्टरवर पेरणी..जिल्ह्यात ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र हे १ लाख ३५ हजार ५३१ हेक्टर आहे. आतापर्यंत प्रत्यक्षात ८८ हजार ५२० हेक्टरवर पेरणी झालेली आहे. त्यातच ज्वारीची पेरणी आॅक्टोबर ते नोव्हेंबरच्या पहिल्या काही दिवसांत करण्यात येते. पाऊस कमी असल्याने यंदा ज्वारीच्या क्षेत्रात घट होण्याचा अंदाज आहे. कारण, ज्वारीचे सर्वाधिक क्षेत्र माणमध्ये ३८ हजार ५३४ हेक्टर आहे. येथे २४ हजार हेक्टरवर ज्वारी पेरणी झाली. यापुढे ज्वारीची पेरणी होणार नाही. तर खटावला २० हजार हेक्टर क्षेत्र असलेतरी सुमारे १४ हजार हेक्टरवर पेर आहे. कोरेगावमध्ये १० हजार ६९४ आणि फलटण तालुक्यात ८ हजार ४१३ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झालेली आहे.

खरीपात १९ हजार हेक्टर क्षेत्र नापेर..जिल्ह्यातील खरीप हंगाम हा पावसाळ्यातच असतो. पण, यंदा जून आणि जुलैमध्येही पाऊस कमी पडला. त्यामुळे याचा परिणाम पेरणीवर झाला. खरीप पेरणी ९३ टक्केच झाली. त्यामुळे १९ हजार हेक्टर क्षेत्र हे नापेर राहिले होते. यामध्ये बाजरीचे क्षेत्र सर्वाधिक होते. पण, सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झालेली.

ओढे काेरडे, विहिरींचा तळ..रब्बी हंगाम प्रामुख्याने दुष्काळी तालुक्यातच मोठ्या प्रमाणात घेण्यात येतो. पण, या तालुक्यातील बहुतांशी ओढे काेरडे पडलेले आहे. विहिरींनी तळ गाठलेला आहे. यामुळे शेतकरी पेरणी करण्यास कचरत आहेत. आता पेरणी केलीतर जानेवारीपासून पिकांना पाणी मिळणे अवघड होऊन जाणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीdroughtदुष्काळ