शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

अवकाळीची बाधा, त्यात ढगाळ हवामानाची गदा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2021 13:41 IST

रब्बीची शेतीपिके संपूर्णपणे फळबागासह पाण्याखाली राहिल्याने हंगामाचे संपूर्ण नुकसान झाले आहे.

खंडाळा : खंडाळा तालुक्यात अवकाळी पावसाने हाहाकार केला आहे. रब्बीची शेतीपिके संपूर्णपणे फळबागासह पाण्याखाली राहिल्याने हंगामाचे संपूर्ण नुकसान झाले आहे. या नुकसानीतून सावरण्यापूर्वीच ढगाळ हवामानाचे सावट शेतीवर पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे अवकाळीची बाधा त्यासोबतच दूषित वातावरणाची बाधा झाल्याची स्थिती ओढावली आहे.

तालुक्याच्या शेतीचे पावसाने नुकसान झाले आहे. त्यानंतर अवकाळी पावसाने तालुक्याच्या धुमाकूळ घातला. यामध्ये बहुतांशी शेती पाण्याखाली गेली. शेतामध्ये पाणी घुसल्याने शेतपिकाचेही मोठे नुकसान झाले. विशेषतः गहू, कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले.

आता गेल्या दोन दिवसांत ढगाळ वातावरणाचे सावट राहिल्याने खंडाळा तालुक्यातील विविध भागातील ऊस, भुईमूग, टोमॅटो, कांदा तसेच भाजीपाल्याची पिके व काही फळबागा यावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. अशा प्रकारच्या हवामानामुळे कांदा पिकावर करपा रोग, भाजीपाल्याच्या पिकावर अळीचा व किडीचा प्रादुर्भाव तसेच वेली वर्गातील पिकांवर मुरकुटा रोग पसरण्याची भीती वाढली आहे.

खंडाळा तालुकाच्या एकूण क्षेत्रापैकी रब्बी हंगामात आठ हजारांपेक्षा अधिक क्षेत्रात पिकांची लागवड झाली होती. यापैकी तालुक्याच्या ६७ गावांमध्ये बहुतांशी नुकसान झाल्याचे समोर आले होते. आता या नुकसानीतून बाहेर पडण्यापूर्वीच दूषित हवामानाने घेरल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

कांद्याच्या आगाराला बाधा..

खंडाळा तालुक्याचे कांदा हे प्रमुख पीक आहे. या नगदी पिकावरच शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते. मात्र, अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाने कांदा पिकाची पात मुरकटली आहे, तसेच काही ठिकाणी करपा रोगाची लागण होऊ लागली आहे. पिकाच्या सुरुवातीच्या वाढीलाच प्रादुर्भाव झाल्याने पिकांची उत्पादन क्षमता घटणार आहे. कांद्याचे आगार समजल्या जाणाऱ्या या तालुक्यातच मोठे नुकसान झाले आहे. शेतीवर एकामागे एक संकट राहिल्यास शेतकरी उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गावोगावच्या ओढ्यांना पाणी....

खंडाळा तालुक्यातील सर्वच भागात सलग तीन दिवस पावसाचा जोर आहे. त्यामुळे गावोगावच्या ओढ्यांना पाणी वाहू लागले आहे. काही गावांतून ओढ्याचे पाणी शेतीच्या भागात शिरल्याने पिके पाण्यात गेली आहेत. या पिकांची पाहणी महसूल व कृषी प्रशासनाने करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. संपूर्ण पिकांचे नुकसान झाले असताना आता ढगाळ हवामानाच्या कोंडीत शेतकरी सापडला आहे. आमच्या नवीन पीक लागवडीवर तांबेरा आणि करपा रोग पसरण्याची भीती आहे. अगोदरच शेतकरी उघड्यावर आला असताना हे पुन्हा संकट म्हणजे दुष्काळात तेरावा अशी स्थिती आहे. -प्रतीक ढमाळ, शेतकरी केसुर्डी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसFarmerशेतकरी