शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

अवकाळीची बाधा, त्यात ढगाळ हवामानाची गदा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2021 13:41 IST

रब्बीची शेतीपिके संपूर्णपणे फळबागासह पाण्याखाली राहिल्याने हंगामाचे संपूर्ण नुकसान झाले आहे.

खंडाळा : खंडाळा तालुक्यात अवकाळी पावसाने हाहाकार केला आहे. रब्बीची शेतीपिके संपूर्णपणे फळबागासह पाण्याखाली राहिल्याने हंगामाचे संपूर्ण नुकसान झाले आहे. या नुकसानीतून सावरण्यापूर्वीच ढगाळ हवामानाचे सावट शेतीवर पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे अवकाळीची बाधा त्यासोबतच दूषित वातावरणाची बाधा झाल्याची स्थिती ओढावली आहे.

तालुक्याच्या शेतीचे पावसाने नुकसान झाले आहे. त्यानंतर अवकाळी पावसाने तालुक्याच्या धुमाकूळ घातला. यामध्ये बहुतांशी शेती पाण्याखाली गेली. शेतामध्ये पाणी घुसल्याने शेतपिकाचेही मोठे नुकसान झाले. विशेषतः गहू, कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले.

आता गेल्या दोन दिवसांत ढगाळ वातावरणाचे सावट राहिल्याने खंडाळा तालुक्यातील विविध भागातील ऊस, भुईमूग, टोमॅटो, कांदा तसेच भाजीपाल्याची पिके व काही फळबागा यावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. अशा प्रकारच्या हवामानामुळे कांदा पिकावर करपा रोग, भाजीपाल्याच्या पिकावर अळीचा व किडीचा प्रादुर्भाव तसेच वेली वर्गातील पिकांवर मुरकुटा रोग पसरण्याची भीती वाढली आहे.

खंडाळा तालुकाच्या एकूण क्षेत्रापैकी रब्बी हंगामात आठ हजारांपेक्षा अधिक क्षेत्रात पिकांची लागवड झाली होती. यापैकी तालुक्याच्या ६७ गावांमध्ये बहुतांशी नुकसान झाल्याचे समोर आले होते. आता या नुकसानीतून बाहेर पडण्यापूर्वीच दूषित हवामानाने घेरल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

कांद्याच्या आगाराला बाधा..

खंडाळा तालुक्याचे कांदा हे प्रमुख पीक आहे. या नगदी पिकावरच शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते. मात्र, अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाने कांदा पिकाची पात मुरकटली आहे, तसेच काही ठिकाणी करपा रोगाची लागण होऊ लागली आहे. पिकाच्या सुरुवातीच्या वाढीलाच प्रादुर्भाव झाल्याने पिकांची उत्पादन क्षमता घटणार आहे. कांद्याचे आगार समजल्या जाणाऱ्या या तालुक्यातच मोठे नुकसान झाले आहे. शेतीवर एकामागे एक संकट राहिल्यास शेतकरी उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गावोगावच्या ओढ्यांना पाणी....

खंडाळा तालुक्यातील सर्वच भागात सलग तीन दिवस पावसाचा जोर आहे. त्यामुळे गावोगावच्या ओढ्यांना पाणी वाहू लागले आहे. काही गावांतून ओढ्याचे पाणी शेतीच्या भागात शिरल्याने पिके पाण्यात गेली आहेत. या पिकांची पाहणी महसूल व कृषी प्रशासनाने करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. संपूर्ण पिकांचे नुकसान झाले असताना आता ढगाळ हवामानाच्या कोंडीत शेतकरी सापडला आहे. आमच्या नवीन पीक लागवडीवर तांबेरा आणि करपा रोग पसरण्याची भीती आहे. अगोदरच शेतकरी उघड्यावर आला असताना हे पुन्हा संकट म्हणजे दुष्काळात तेरावा अशी स्थिती आहे. -प्रतीक ढमाळ, शेतकरी केसुर्डी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसFarmerशेतकरी