शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीची बाधा, त्यात ढगाळ हवामानाची गदा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2021 13:41 IST

रब्बीची शेतीपिके संपूर्णपणे फळबागासह पाण्याखाली राहिल्याने हंगामाचे संपूर्ण नुकसान झाले आहे.

खंडाळा : खंडाळा तालुक्यात अवकाळी पावसाने हाहाकार केला आहे. रब्बीची शेतीपिके संपूर्णपणे फळबागासह पाण्याखाली राहिल्याने हंगामाचे संपूर्ण नुकसान झाले आहे. या नुकसानीतून सावरण्यापूर्वीच ढगाळ हवामानाचे सावट शेतीवर पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे अवकाळीची बाधा त्यासोबतच दूषित वातावरणाची बाधा झाल्याची स्थिती ओढावली आहे.

तालुक्याच्या शेतीचे पावसाने नुकसान झाले आहे. त्यानंतर अवकाळी पावसाने तालुक्याच्या धुमाकूळ घातला. यामध्ये बहुतांशी शेती पाण्याखाली गेली. शेतामध्ये पाणी घुसल्याने शेतपिकाचेही मोठे नुकसान झाले. विशेषतः गहू, कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले.

आता गेल्या दोन दिवसांत ढगाळ वातावरणाचे सावट राहिल्याने खंडाळा तालुक्यातील विविध भागातील ऊस, भुईमूग, टोमॅटो, कांदा तसेच भाजीपाल्याची पिके व काही फळबागा यावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. अशा प्रकारच्या हवामानामुळे कांदा पिकावर करपा रोग, भाजीपाल्याच्या पिकावर अळीचा व किडीचा प्रादुर्भाव तसेच वेली वर्गातील पिकांवर मुरकुटा रोग पसरण्याची भीती वाढली आहे.

खंडाळा तालुकाच्या एकूण क्षेत्रापैकी रब्बी हंगामात आठ हजारांपेक्षा अधिक क्षेत्रात पिकांची लागवड झाली होती. यापैकी तालुक्याच्या ६७ गावांमध्ये बहुतांशी नुकसान झाल्याचे समोर आले होते. आता या नुकसानीतून बाहेर पडण्यापूर्वीच दूषित हवामानाने घेरल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

कांद्याच्या आगाराला बाधा..

खंडाळा तालुक्याचे कांदा हे प्रमुख पीक आहे. या नगदी पिकावरच शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते. मात्र, अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाने कांदा पिकाची पात मुरकटली आहे, तसेच काही ठिकाणी करपा रोगाची लागण होऊ लागली आहे. पिकाच्या सुरुवातीच्या वाढीलाच प्रादुर्भाव झाल्याने पिकांची उत्पादन क्षमता घटणार आहे. कांद्याचे आगार समजल्या जाणाऱ्या या तालुक्यातच मोठे नुकसान झाले आहे. शेतीवर एकामागे एक संकट राहिल्यास शेतकरी उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गावोगावच्या ओढ्यांना पाणी....

खंडाळा तालुक्यातील सर्वच भागात सलग तीन दिवस पावसाचा जोर आहे. त्यामुळे गावोगावच्या ओढ्यांना पाणी वाहू लागले आहे. काही गावांतून ओढ्याचे पाणी शेतीच्या भागात शिरल्याने पिके पाण्यात गेली आहेत. या पिकांची पाहणी महसूल व कृषी प्रशासनाने करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. संपूर्ण पिकांचे नुकसान झाले असताना आता ढगाळ हवामानाच्या कोंडीत शेतकरी सापडला आहे. आमच्या नवीन पीक लागवडीवर तांबेरा आणि करपा रोग पसरण्याची भीती आहे. अगोदरच शेतकरी उघड्यावर आला असताना हे पुन्हा संकट म्हणजे दुष्काळात तेरावा अशी स्थिती आहे. -प्रतीक ढमाळ, शेतकरी केसुर्डी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसFarmerशेतकरी