शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांची कोंडी नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 23:01 IST

कोरोना लॉकडाऊनमध्ये सातारा शहरासह जिल्ह्यातील सर्वच व्यापाऱ्यांनी सुज्ञ भूमिका घेतली. व्यवसाय बंद राहिले तरी गोरगरिबांचे संसार सुरू ठेवण्यासाठी त्यांना मोफत जीवनावश्यक वस्तू पुरविल्या. व्यापारी, जनतेला वेठीस न धरताही प्रशासन कोरोनाविरुद्धची लढाई जिंकू शकते.

ठळक मुद्देसुज्ञपणे परिस्थिती हाताळणे गरजेचे --चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

सागर गुजर ।कोरोना लॉकडाऊनमध्ये सातारा शहरासह जिल्ह्यातील सर्वच व्यापाऱ्यांनी सुज्ञ भूमिका घेतली. व्यवसाय बंद राहिले तरी गोरगरिबांचे संसार सुरू ठेवण्यासाठी त्यांना मोफत जीवनावश्यक वस्तू पुरविल्या. व्यापारी, जनतेला वेठीस न धरताही प्रशासन कोरोनाविरुद्धची लढाई जिंकू शकते.

प्रश्न : कोरोना महामारीच्या काळात संघटनेतर्फे कशी मदत झाली?उत्तर : सातारा चेंबर आॅफ कॉमर्सने लॉकडाऊनच्या काळात आपले उत्तरदायित्व समर्थपणे पार पाडले. कामगार लोकांना जेवण पुरविले. त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी उपाययोजना केली. प्रशासनाच्या सूचनांनुसार जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा मोफत केला. नगरपालिकेकडे गहू, तांदूळ, ज्वारी, आटा या जीवनावश्यक वस्तू दिल्या.

प्रश्न : आपल्या संघटनेशी कोणकोणते व्यापारी संलग्नित आहेत?उत्तर : आपल्या संघटनेशी शहरातील २२ व्यापारी संघटना संलग्नित आहेत. त्यामध्ये किराणा, हार्डवेअर, कापड व्यापारी, सॅनिटेशन, इलेक्ट्रॉनिक, फटाका, पान टपरी, स्वीट मार्ट, हॉटेल व्यावसायिक, पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर, बेकरी, लेबर कॉन्ट्रॅक्टर, आर्किटेक्चर असोसिएशन, बिल्डर असोसिएशन, आॅटोमोबाईल, गॅरेजचालक, सिमेंट असोसिएशन, राजधानी व्यापारी संघ आदींचा समावेश आहे.

प्रश्न : व्यापाºयांसमोर कुठल्या अडचणी आहेत?उत्तर : लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत. व्यावसायिकांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. घर, बँका, गाडीचे हप्ते गेले नाहीत. अनेक पतसंस्था अथवा बँकांतून व्यापारी खेळत्या भांडवलासाठी कॅश क्रेडिटने व्यवहार करतात, ते ठप्प झाले. व्यावसायिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.

पुणे-मुंबईवर अवलंबित्वडिस्ट्रिब्युटरला वाहनांचे परवाने मिळत नाही. आता माल यायला लागला आहे. जास्त दरात माल खरेदी करावा लागला. पुणे-मुंबई बंद असल्याने सातारा जिल्ह्यात मोजकाच माल येत आहे. पुणे-मुंबईची बाजारपेठ बंद राहिल्याने त्याचा दूरगामी परिणाम सातारा शहरासह इतर शहरांमध्ये झाला आहे. ७० टक्के माल पुणे-मुंबईतून येतो. खरेदीला पुणे, मुंबईत जास्त लोक जातात.

शेतीची कामे थांबल्यानेही फटकाशेतीची कामे थांबल्याने हार्डवेअरच्या दुकानांना आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. व्यापारात उलाढाल कमी झाली. किराणा व्यवसायात नफ्याचे प्रमाण कमी आहे. कृत्रिम तुटवडा असून, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी लक्ष घालून होलसेल विक्रेत्यांवर निर्बंध आणावेत, त्यांनी किरकोळ लोकांना माल देऊ नये, होलसेल व्यापार करावा, असे निर्देश द्यावेत.

 

साताऱ्यातील व्यापाऱ्यांनी कोरोनाच्या महामारीत कायमच सहकार्याची भूमिका घेतली. प्रशासनाचेही व्यापा-यांना सहकार्य मिळणे जरुरीचे आहे. सतत नवीन आदेश निघाले तर अडचणी निर्माण होतात. महामारीशी लढताना सांघिक प्रयत्न आवश्यक आहेत.- राजू गोडसे, अध्यक्ष, सातारा चेंबर आॅफ कॉमर्र्स

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसरbusinessव्यवसाय