शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

कोरोना लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांची कोंडी नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 23:01 IST

कोरोना लॉकडाऊनमध्ये सातारा शहरासह जिल्ह्यातील सर्वच व्यापाऱ्यांनी सुज्ञ भूमिका घेतली. व्यवसाय बंद राहिले तरी गोरगरिबांचे संसार सुरू ठेवण्यासाठी त्यांना मोफत जीवनावश्यक वस्तू पुरविल्या. व्यापारी, जनतेला वेठीस न धरताही प्रशासन कोरोनाविरुद्धची लढाई जिंकू शकते.

ठळक मुद्देसुज्ञपणे परिस्थिती हाताळणे गरजेचे --चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

सागर गुजर ।कोरोना लॉकडाऊनमध्ये सातारा शहरासह जिल्ह्यातील सर्वच व्यापाऱ्यांनी सुज्ञ भूमिका घेतली. व्यवसाय बंद राहिले तरी गोरगरिबांचे संसार सुरू ठेवण्यासाठी त्यांना मोफत जीवनावश्यक वस्तू पुरविल्या. व्यापारी, जनतेला वेठीस न धरताही प्रशासन कोरोनाविरुद्धची लढाई जिंकू शकते.

प्रश्न : कोरोना महामारीच्या काळात संघटनेतर्फे कशी मदत झाली?उत्तर : सातारा चेंबर आॅफ कॉमर्सने लॉकडाऊनच्या काळात आपले उत्तरदायित्व समर्थपणे पार पाडले. कामगार लोकांना जेवण पुरविले. त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी उपाययोजना केली. प्रशासनाच्या सूचनांनुसार जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा मोफत केला. नगरपालिकेकडे गहू, तांदूळ, ज्वारी, आटा या जीवनावश्यक वस्तू दिल्या.

प्रश्न : आपल्या संघटनेशी कोणकोणते व्यापारी संलग्नित आहेत?उत्तर : आपल्या संघटनेशी शहरातील २२ व्यापारी संघटना संलग्नित आहेत. त्यामध्ये किराणा, हार्डवेअर, कापड व्यापारी, सॅनिटेशन, इलेक्ट्रॉनिक, फटाका, पान टपरी, स्वीट मार्ट, हॉटेल व्यावसायिक, पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर, बेकरी, लेबर कॉन्ट्रॅक्टर, आर्किटेक्चर असोसिएशन, बिल्डर असोसिएशन, आॅटोमोबाईल, गॅरेजचालक, सिमेंट असोसिएशन, राजधानी व्यापारी संघ आदींचा समावेश आहे.

प्रश्न : व्यापाºयांसमोर कुठल्या अडचणी आहेत?उत्तर : लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत. व्यावसायिकांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. घर, बँका, गाडीचे हप्ते गेले नाहीत. अनेक पतसंस्था अथवा बँकांतून व्यापारी खेळत्या भांडवलासाठी कॅश क्रेडिटने व्यवहार करतात, ते ठप्प झाले. व्यावसायिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.

पुणे-मुंबईवर अवलंबित्वडिस्ट्रिब्युटरला वाहनांचे परवाने मिळत नाही. आता माल यायला लागला आहे. जास्त दरात माल खरेदी करावा लागला. पुणे-मुंबई बंद असल्याने सातारा जिल्ह्यात मोजकाच माल येत आहे. पुणे-मुंबईची बाजारपेठ बंद राहिल्याने त्याचा दूरगामी परिणाम सातारा शहरासह इतर शहरांमध्ये झाला आहे. ७० टक्के माल पुणे-मुंबईतून येतो. खरेदीला पुणे, मुंबईत जास्त लोक जातात.

शेतीची कामे थांबल्यानेही फटकाशेतीची कामे थांबल्याने हार्डवेअरच्या दुकानांना आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. व्यापारात उलाढाल कमी झाली. किराणा व्यवसायात नफ्याचे प्रमाण कमी आहे. कृत्रिम तुटवडा असून, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी लक्ष घालून होलसेल विक्रेत्यांवर निर्बंध आणावेत, त्यांनी किरकोळ लोकांना माल देऊ नये, होलसेल व्यापार करावा, असे निर्देश द्यावेत.

 

साताऱ्यातील व्यापाऱ्यांनी कोरोनाच्या महामारीत कायमच सहकार्याची भूमिका घेतली. प्रशासनाचेही व्यापा-यांना सहकार्य मिळणे जरुरीचे आहे. सतत नवीन आदेश निघाले तर अडचणी निर्माण होतात. महामारीशी लढताना सांघिक प्रयत्न आवश्यक आहेत.- राजू गोडसे, अध्यक्ष, सातारा चेंबर आॅफ कॉमर्र्स

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसरbusinessव्यवसाय