शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

बाधितांना ताटकळत ठेवणे मुख्यमंत्र्यांना शोभते का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 4:41 AM

कऱ्हाड : राज्याचे मुख्यमंत्री अद्याप हवेतच आहेत आणि मनसे जमिनीवर आहे. मनसे आजही तळागाळात पोहोचते. मुख्यमंत्र्यांना जनतेसाठी वेळ नाही. ...

कऱ्हाड : राज्याचे मुख्यमंत्री अद्याप हवेतच आहेत आणि मनसे जमिनीवर आहे. मनसे आजही तळागाळात पोहोचते. मुख्यमंत्र्यांना जनतेसाठी वेळ नाही. खराब हवामान आणि पावसाची कारणे देऊन वेळकाढूपणा करणे आणि बाधितांना ताटकळत ठेवणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शोभते का, असा प्रश्न मनसेचे प्रवक्ता संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला.

कोयनानगर विभागात भूस्खलनातील बाधित भागाची पाहणी तसेच स्थलांतरित ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी संतोष धुरी, रवींद्र शेलार, गोरख नारकर, दयानंद नलवडे, आदी उपस्थित होते.

संदीप देशपांडे म्हणाले, मुख्यमंत्र्यांना या बाधित कुटुंबीयांना भेटायला यायचे असते तर ते कसेही आले असते आणि त्यांच्या व्यथा जाणल्या असत्या. येथील परिस्थिती त्यांना समजली असती. राज्याच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्री, नेते, सामाजिक कार्यकर्ते शक्य होईल त्यामार्गाने पाटण तालुक्यात धाव घेत आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांना ते जमत नाही, हे दुर्दैव आहे. बाधितांचे प्रश्न सोडविण्यासाठी मनसे कटिबद्ध असून, त्यांना शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही संदीप देशपांडे यांनी यावेळी दिली.

फोटो : २६ केआरडी ०३

कॅप्शन : कोयनानगर विभागातील बाधित ग्रामस्थांशी मनसेचे प्रवक्ता संदीप देशपांडे यांनी चर्चा केली.