शेती माल विकण्याची करू नका घाई

By Admin | Updated: December 23, 2015 01:31 IST2015-12-23T00:35:20+5:302015-12-23T01:31:22+5:30

जिल्हा बँकेचे अवाहन : नाबार्ड,ओरिगो अन् जिल्हाबॅकेकडून होणार शेतकऱ्याला आर्थिक मदत

Do not rush to sell agricultural products | शेती माल विकण्याची करू नका घाई

शेती माल विकण्याची करू नका घाई

वाठार स्टेशन : कर्जात अडकलेला शेतकरी कर्ज परत फेडण्यासाठी नेहमीच शेतातील माल विकण्याची घाई करतो. पर्यायाने बाजारपेठेत दर नसला तरी हा माल काडीमोल किमतीत विकण्याची त्याची तयारी असते; परंतु आता शेतकऱ्याचा हा शेतीमाल गावातच असलेल्या विकास सेवा सोसायट्यांंच्या गोडावूनमध्ये ठेवून त्या शेतीमालावर ७५ टक्के रक्कम घेऊ शकणार आहेत. शिवाय आपला शेतीमाल जेव्हा बाजारपेठेत दर मिळेल त्या वेळी विकू शकणार आहेत, ही किमया आता जिल्हा बँक,नाबार्ड आणि ‘ओरिगो’ कमोडेटीज यांनी वेअरहाऊस रिसिप्ट फायनांंन्स या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील १५ हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.या कराराद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात वेअरहाऊस रिसिप्ट फायनांन्स देण्याबाबतची योजना राबविण्याचा निर्धार जाहीर केला आहे.शेतीत उत्पन्न काढल्यानंतर शेतकरी लगेच माल विकण्याची घाई करत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने आपला माल व्यापाऱ्यांना द्यावा लागतो. कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे खुर्द सोसायटीच्या कार्यालयात या योजनेबाबत नुकताच शेतकरी जागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने,व्यवस्थापक डी.जी पोपळे,आर. के गायकवाड,ओरिगोचे निकम,डी.जी. ओकाटे,संदीप भिसे,मंगेश काटकर,भाग्यवंत कणसे,भागवत घाडगे, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कदम,विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष सुभाष कदम, उपाध्यक्ष योगेश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आर. के. गायकवाड म्हणाले, ‘महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पुढील सहा महिन्यांत शेतकऱ्यांमध्ये या प्रकल्पाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. आगामी हंगामामध्ये शेतकऱ्यांना साह्य करण्यासाठी पीएसीएसची स्थापना करण्यात येणार आहे. नाबार्डच्या माध्यमातून राज्यभर ‘वेअरहाऊस रिसिप्ट फायनांन्स’ ची उच्च क्षमता स्थापित करण्यावर भर देण्यात येणार आहे. हा उपक्रम २० पीएमसीएस स्थापन करण्यासह जवळपास १५ हजार शेतकऱ्यांंना साह्य केले जाणार आहे. (वार्ताहर)

महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात सुरूवात
शेतकऱ्यांना कच्चा माल,उत्पादन वितरण आदीमध्ये साह्य करण्याच्या हेतूने विविध व्यवसायामध्ये कार्यरत राहण्यासाठी पीएसीएसला प्रोत्साहित करण्यामध्ये सहभागी राहणार आहेत. पहिल्या टप्यातील आंध्रप्रदेश,तेलंगणा या राज्यातील यशानंतर महाराष्ट्रात दुसऱ्या टप्यातील सुरुवात झाली आहे.

Web Title: Do not rush to sell agricultural products

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.