शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
4
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
6
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
7
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
8
हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
9
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
10
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
11
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
12
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
13
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
14
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
15
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
16
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
17
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
18
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
19
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
20
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

काहीही करा.. आम्ही इथंच बसणार ! सातारा पालिका प्रशासन हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 21:45 IST

राजवाडा ते मंगळवार तळे या रस्त्यावर पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून दुमजली भाजी मंडई बांधली. ग्राहकांच्या गाड्यांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्थाही करण्यात आली.

ठळक मुद्देराजवाडा-मंगळवार तळे रस्ता पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यातवाहतूक कोंडी कायम

सातारा  : राजवाडा ते मंगळवार तळे या रस्त्यावर पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून दुमजली भाजी मंडई बांधली. ग्राहकांच्या गाड्यांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्थाही करण्यात आली. रस्त्यावर भाजी, फळे विक्री व इतर व्यवसाय करणाऱ्यांची संख्या काही केल्या कमी होईना. कारवाई करूनही या रस्त्यावरील अतिक्रमण पुन्हा फोफावत असल्याने आता प्रशासनही पुरते हतलब झाले आहे.

राजवाडा भाजी मंडईची उभारणी केल्यानंतर सर्व भाजी विक्रेत्यांचे या मंडईत पुनर्वसन करण्यात आले. वाहतुकीला अडथळा ठरू नये म्हणून फळविक्रेत्यांनाही या मंडईत जागा देण्यात आली. मात्र, फळविक्रेत्यांना ग्राहक येत नसल्याचे कारण देत मंडईत व्यवसाय करण्यात नकार दर्शविला. त्यामुळे अनेक फळविक्रेते गेल्या अनेक वर्षांपासून राजवाडा-मंगळवार तळे रस्त्यावरच फळविक्री करीत आहेत.

पालिकेने विक्रेत्यांना चकाचक मंडई बांधून दिली. मात्र, अतिहव्यासापोटी मंडईत बसणाºया व्यावसायिकांनी रस्त्यावरही ठाण मांडले. पालिकेची पावती फाडण्याची वेळ टळून गेल्यानंतर टोपल्या आणि हातगाड्या घेऊन ही मंडळी राजवाडा ते मंगळवार तळे रस्त्यावर बसतात. यामुळे वाहतुकीची कोंडी आणि किरकोळ अपघातांची संख्या वाढतच चालली आहे.

वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील होत गेल्याने पालिकेच्या वतीने या मार्गावरील सर्व अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटविली होती. कारवाईनंतर या रस्त्याने मोकळा श्वास घेतला होता. काही दिवसांनंतर पुन्हा हा मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला. सध्या राजवाडा बसस्थानकापासून मंगळवार तळ्यापर्यंत भाजी विक्रेते, व्यावसायिकांनी रस्त्यावरच ठाण मांडले आहे. कारवाई करूनही तशीच परिस्थिती निर्माण होत असल्याने आता प्रशासनही हतलब झाले आहे.रस्त्याच्या दुतर्फा पार्किंगराजवाडा ते मंगळवार तळे या मार्गावर भाजी व फळविक्रेत्यांची संख्या अधिक आहे. भाजी मंडई सोडली तर इतरत्र कोठेही पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा दररोज वाहने पार्क केली जात आहे. त्यामुळे गर्दीतून वाट काढताना वाहनधारकांसह नागरिकांनी दमछाक उडत आहे. याबाबत ठोस कारवाई करणे गरजेचे बनले आहे.

सकाळी फळे.. रात्री भाजी विक्रीनो हॉकर्स झोन असतानाही राजवाडा ते मंगळवार तळे रस्त्यावर हंगामी व्यावसायिकांनी आपले बस्तान बसविले आहे. या रस्त्यावर सकाळी नऊपासून सायंकाळी पाचपर्यंत फळांचे गाडे असतात तर सायंकाळी पाचनंतर येथे भाजीमंडई भरते. विक्रेते व वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना सकाळी शालेय विद्यार्थी तर सायंकाळी नोकरदारांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMarketबाजार