शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
2
‘कोस्टल’वर थेट १४० चा हायस्पीड: ...तर मग गुन्हाच होईल दाखल; वाहतूक पोलिसांकडून दिवसाला ५०० ई-चालानची कारवाई
3
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
4
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
5
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
6
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
7
Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी
8
पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा जोडीदाराची इच्छा पडली महागात; मॅट्रिमोनियल साइटवरून शिक्षिकेला कोट्यवधींचा गंडा!
9
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
10
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
11
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
12
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
13
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
14
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
15
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
16
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
17
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
18
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
19
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
20
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...

ज्ञानेश्वर माउली आज घेणार सातारावासीयांचा निरोप, सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 13:20 IST

बरड मुक्कामी विसावली 

लखन नाळेवाठार निंबाळकर :‘पंढरीशी जावे ऐसे माझे मनी, विठाई जननी भेटे केव्हा...’ या उक्तीप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातील चौथ्या मुक्कामासाठी रविवारी बरड गावी विसावला. वैष्णवांचा मेळा सोमवारी सातारा जिल्ह्याचा निरोप घेऊन सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.सोहळा वाटेवर धुळदेव, कोळकी, झिरपवाडी, सांगवी, अलगुडेवाडी गावातील ग्रामपंचायत तसेच सोसायटीचे पदाधिकारी विविध मान्यवर ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत करून पालखीचे दर्शन घेतले. पालखी सोहळा सकाळच्या न्याहरीसाठी विडणी येथे विसावला. या ठिकाणी परिसरातील विविध गावांतील भाविकांनी दर्शन घेतले. काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर विडणीतून पालखी सोहळा मार्गस्थ झाला.पालखी मार्गावर वडले, दुधेबावी, माझेरी, सोनवडी खुर्द, सोनवडी बुद्रुक, तिरकवाडी आदी गावांतील ग्रामस्थांनी माउलींच्या पालखीचे दर्शन घेतले. दुपारच्या जेवणासाठी पिंप्रद येथे विसावला. वाजेगाव येथे काही काळ विसावा घेऊन मार्गस्थ होऊन तालुक्यातील व जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामासाठी बरड येथे विसावला. बरडच्या वेशीवर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पंचायत समितीचे सदस्य, विविध सहकारी व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, विविध राजकीय पदाधिकारी, श्रीराम कारखान्याच्या संचालकांनी स्वागत केले.लाखो भाविकांचा हा सोहळा सोमवारी सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. जिल्ह्यातील प्रशासनाच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या सीमेवर राजुरी गावच्या सीमेवर माउलीच्या पालखी सोहळ्याला निरोप देण्याचा तसेच सोलापूर जिल्ह्याच्या वतीने स्वागताचा समारंभ होणार आहे.फलटण तालुका प्रशासनात उपविभागीय अधिकारी प्रियांका अंबेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, तहसीलदार अभिजित जाधव, गटविकास अधिकारी सतीश कुंभार, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, उपअभियंता राजकुमार मठपती, शाखा अभियंता सोपान बिराजदार, ग्रामीण पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, तालुका वैद्यकीय अधिकारी निखिल दिघे यांनी वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी प्रशासकीय यंत्रणा राबविली.

उत्साहाला उधाण..पालखी सोहळ्यासाठी वीर धरणातून नीरा उजवा कालव्यामध्ये मुबलक पाणी उपलब्ध करून भाविकांसाठी अंघोळ व कपडे धुण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आले होते. महिलांनी घरासमोर सडा, रांगोळ्या काढून वारीत आलेल्या वारकऱ्यांना मोफत खाद्यपदार्थ तसेच जेवणाची व्यवस्था केली होती. गावातील अनेक दानशूर व्यक्तींनी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी आपापल्या परीने भोजनाची सोय उपलब्ध केली होती.