शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

ज्ञानेश्वर माउली आज घेणार सातारावासीयांचा निरोप, सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 13:20 IST

बरड मुक्कामी विसावली 

लखन नाळेवाठार निंबाळकर :‘पंढरीशी जावे ऐसे माझे मनी, विठाई जननी भेटे केव्हा...’ या उक्तीप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातील चौथ्या मुक्कामासाठी रविवारी बरड गावी विसावला. वैष्णवांचा मेळा सोमवारी सातारा जिल्ह्याचा निरोप घेऊन सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.सोहळा वाटेवर धुळदेव, कोळकी, झिरपवाडी, सांगवी, अलगुडेवाडी गावातील ग्रामपंचायत तसेच सोसायटीचे पदाधिकारी विविध मान्यवर ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत करून पालखीचे दर्शन घेतले. पालखी सोहळा सकाळच्या न्याहरीसाठी विडणी येथे विसावला. या ठिकाणी परिसरातील विविध गावांतील भाविकांनी दर्शन घेतले. काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर विडणीतून पालखी सोहळा मार्गस्थ झाला.पालखी मार्गावर वडले, दुधेबावी, माझेरी, सोनवडी खुर्द, सोनवडी बुद्रुक, तिरकवाडी आदी गावांतील ग्रामस्थांनी माउलींच्या पालखीचे दर्शन घेतले. दुपारच्या जेवणासाठी पिंप्रद येथे विसावला. वाजेगाव येथे काही काळ विसावा घेऊन मार्गस्थ होऊन तालुक्यातील व जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामासाठी बरड येथे विसावला. बरडच्या वेशीवर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पंचायत समितीचे सदस्य, विविध सहकारी व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, विविध राजकीय पदाधिकारी, श्रीराम कारखान्याच्या संचालकांनी स्वागत केले.लाखो भाविकांचा हा सोहळा सोमवारी सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. जिल्ह्यातील प्रशासनाच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या सीमेवर राजुरी गावच्या सीमेवर माउलीच्या पालखी सोहळ्याला निरोप देण्याचा तसेच सोलापूर जिल्ह्याच्या वतीने स्वागताचा समारंभ होणार आहे.फलटण तालुका प्रशासनात उपविभागीय अधिकारी प्रियांका अंबेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, तहसीलदार अभिजित जाधव, गटविकास अधिकारी सतीश कुंभार, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, उपअभियंता राजकुमार मठपती, शाखा अभियंता सोपान बिराजदार, ग्रामीण पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, तालुका वैद्यकीय अधिकारी निखिल दिघे यांनी वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी प्रशासकीय यंत्रणा राबविली.

उत्साहाला उधाण..पालखी सोहळ्यासाठी वीर धरणातून नीरा उजवा कालव्यामध्ये मुबलक पाणी उपलब्ध करून भाविकांसाठी अंघोळ व कपडे धुण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आले होते. महिलांनी घरासमोर सडा, रांगोळ्या काढून वारीत आलेल्या वारकऱ्यांना मोफत खाद्यपदार्थ तसेच जेवणाची व्यवस्था केली होती. गावातील अनेक दानशूर व्यक्तींनी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी आपापल्या परीने भोजनाची सोय उपलब्ध केली होती.