शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानेश्वर माउली आज घेणार सातारावासीयांचा निरोप, सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 13:20 IST

बरड मुक्कामी विसावली 

लखन नाळेवाठार निंबाळकर :‘पंढरीशी जावे ऐसे माझे मनी, विठाई जननी भेटे केव्हा...’ या उक्तीप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातील चौथ्या मुक्कामासाठी रविवारी बरड गावी विसावला. वैष्णवांचा मेळा सोमवारी सातारा जिल्ह्याचा निरोप घेऊन सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.सोहळा वाटेवर धुळदेव, कोळकी, झिरपवाडी, सांगवी, अलगुडेवाडी गावातील ग्रामपंचायत तसेच सोसायटीचे पदाधिकारी विविध मान्यवर ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत करून पालखीचे दर्शन घेतले. पालखी सोहळा सकाळच्या न्याहरीसाठी विडणी येथे विसावला. या ठिकाणी परिसरातील विविध गावांतील भाविकांनी दर्शन घेतले. काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर विडणीतून पालखी सोहळा मार्गस्थ झाला.पालखी मार्गावर वडले, दुधेबावी, माझेरी, सोनवडी खुर्द, सोनवडी बुद्रुक, तिरकवाडी आदी गावांतील ग्रामस्थांनी माउलींच्या पालखीचे दर्शन घेतले. दुपारच्या जेवणासाठी पिंप्रद येथे विसावला. वाजेगाव येथे काही काळ विसावा घेऊन मार्गस्थ होऊन तालुक्यातील व जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामासाठी बरड येथे विसावला. बरडच्या वेशीवर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पंचायत समितीचे सदस्य, विविध सहकारी व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, विविध राजकीय पदाधिकारी, श्रीराम कारखान्याच्या संचालकांनी स्वागत केले.लाखो भाविकांचा हा सोहळा सोमवारी सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. जिल्ह्यातील प्रशासनाच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या सीमेवर राजुरी गावच्या सीमेवर माउलीच्या पालखी सोहळ्याला निरोप देण्याचा तसेच सोलापूर जिल्ह्याच्या वतीने स्वागताचा समारंभ होणार आहे.फलटण तालुका प्रशासनात उपविभागीय अधिकारी प्रियांका अंबेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, तहसीलदार अभिजित जाधव, गटविकास अधिकारी सतीश कुंभार, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, उपअभियंता राजकुमार मठपती, शाखा अभियंता सोपान बिराजदार, ग्रामीण पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, तालुका वैद्यकीय अधिकारी निखिल दिघे यांनी वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी प्रशासकीय यंत्रणा राबविली.

उत्साहाला उधाण..पालखी सोहळ्यासाठी वीर धरणातून नीरा उजवा कालव्यामध्ये मुबलक पाणी उपलब्ध करून भाविकांसाठी अंघोळ व कपडे धुण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आले होते. महिलांनी घरासमोर सडा, रांगोळ्या काढून वारीत आलेल्या वारकऱ्यांना मोफत खाद्यपदार्थ तसेच जेवणाची व्यवस्था केली होती. गावातील अनेक दानशूर व्यक्तींनी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी आपापल्या परीने भोजनाची सोय उपलब्ध केली होती.