शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वाढला यंदा साखरेचा गोडवा

By admin | Updated: May 25, 2015 00:32 IST

१२ लाख क्विंटल अधिक उत्पादन : गेल्यावर्षीपेक्षा निम्मे कारखाने अद्याप सुरूच

वाठार स्टेशन : चालू हंगामात साखर कारखानदार व शासनाकडून शेतकऱ्यांच्या पदरी ऊसदराबाबत घोर निराशा झाली. ‘एफआरपी’प्रमाणे दर देताना काही कारखाने सोडता इतर कारखान्यांनी शासनाच्या मदतीवर शेतकऱ्यांना एफआरपीचा ठेंगा दाखवण्याचेच काम केले. यामुळे आता एफआरपीचा चेंडू शासन दरबारी टाकत कारखानदारांनी ऊसदराबाबतची जबाबदारी झटकली आहे. तर दुसरीकडे मात्र या हंगामात जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी आपल्या आजवरच्या गाळपाचा विक्रम मोडला आहे. न्यू फलटण शुगर वर्क्स साखरवाडी या कारखान्याने सात महिन्यांत पहिल्यांदाच ५ लाख ६३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेत कारखान्यातील आजपर्यंतच्या गाळपाचा उच्चांक मोडला आहे. गतवर्षी १५ मे अखेर जिल्ह्यातील एकूण ११ कारखान्यांपैकी जवळपास दहा कारखान्यांनी गाळप हंगाम संपवला होता. चालू वर्षी १२ कारखान्यांपैकी अजूनही ६ कारखाने सुरू असून, ३१ मे पर्यंत गाळप हंगाम सुरू राहील, अशी परिस्थिती आहे.सन २०१४ च्या गाळप हंगामाची परिस्थिती पाहता जिल्ह्यात ऊसदरासाठी शेतकरी संघटनांनी मोठे आंदोलन केले. या आंदोलनाचा केंद्रबिंदू कऱ्हाडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भूमीत असतानाही शेतकरी संघटनांच्या आंदोलनाकडे शासन व साखर कारखानदारांनी डोळेझाक करीत शेतकऱ्यांना २००० ते २५०० रुपये उसाचा दर देण्याची भूमिका घेतली.यानंतर लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांचे वारे २०१५ च्या गाळप हंगामापूर्वीच वाहू लागले. या निवडणुकीपूर्र्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊसपरिषद झाली; मात्र यावेळी आंदोलनाची दिशा स्पष्ट न झाल्याने केवळ ३००० ते ३२०० एकरकमी ऊसदर मिळावा, ही भूमिका मांडण्यात आली. दरम्यान, कारखाने कोणत्याही दराच्या घोषणेशिवाय सुरळीत सुरू झाले तरीही या कारखान्यांवर कुणाचाच वचक राहिला नाही. दरम्यान, देशातील व राज्यातील नवीन सरकार शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळवून देईल याच भोळ्या आशेवर ऊस उत्पादक शेतकरी राहिला. आणि पहिल्यांदाच एफआरपीचे सूत्र ऊसदरासाठी कारखान्यावर शासनाकडून लादण्यात आले. गतवर्षीच्या सरासरी साखर उताऱ्यानुसार प्रत्येकाची एफआरपी जाहीर झाली. यामध्ये किसन वीर, प्रतापगड, अजिंक्यतारा या कारखान्यांनी ती मान्य केली; मात्र इतरांनी सध्याच्या साखर दराची परिस्थिती दाखवत एफआरपी पोटी हप्ते देण्याचे काम केले. (वार्ताहर)दोन लाख मे. टन ऊस तोडणीसाठी शिल्लकंदोन्ही हंगामांतील गाळपाची आकडेवारी पाहता आजअखेर जवळपास १२ लाख क्विंटल साखर गेल्या हंगामापेक्षा वाढली आहे. अजून जवळपास सहा कारखान्यांकडे २ लाख मे. टन उसाचे क्षेत्र शिल्लक आहे. यामुळे ३१ मे अखेर हे शिल्लक क्षेत्र संपवण्यासाठी कारखान्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. यातच मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे तोडणी हंगाम लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाऊस वेळेत न थांबल्यास काही प्रमाणात जिल्ह्यात उसाचे क्षेत्र तोडणीअभावी शिल्लक राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.१५ मे अखेर साखरनिर्मितीची तुलनात्मक आकडेवारीकारखाना २०१४ साखर उत्पादन २०१५ साखर उत्पादन(लाख क्विंटल) (लाख क्विंटल)श्रीराम ४१७७३५ ४२८८५० गाळप बंदकृष्णा १३२९३५० १३८१२५० गाळप बंदकिसन वीर ९२९२५० ९५२१६०*देसाई ३३७४३२ ३५०५७५*सह्याद्री १५४२३७० १५५३७००*अजिंक्यतारा ७५२६१० ७९५०४०*रयत २३१७८० १९५९२० गाळप बंदप्रतापगड ४५८१५० ४८०७००*न्यू फलटण ३२२१८० ५६३५५० गाळप बंदजरंडेश्वर ५६६५०० ६१४०३० गाळप बंदजयवंत ४६१६०० ५१७२२०गाळप बंदग्रीन पॉवर ६९२६०० गाळप बंदएकूण ७३४८९५७ ८५२५५९५ (१५मे अखेर)