शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
5
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
6
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
7
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
8
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
9
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
10
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
11
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
12
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
13
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
14
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
15
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
16
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
17
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
18
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
19
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
20
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात

जिल्ह्यात वाढला यंदा साखरेचा गोडवा

By admin | Updated: May 25, 2015 00:32 IST

१२ लाख क्विंटल अधिक उत्पादन : गेल्यावर्षीपेक्षा निम्मे कारखाने अद्याप सुरूच

वाठार स्टेशन : चालू हंगामात साखर कारखानदार व शासनाकडून शेतकऱ्यांच्या पदरी ऊसदराबाबत घोर निराशा झाली. ‘एफआरपी’प्रमाणे दर देताना काही कारखाने सोडता इतर कारखान्यांनी शासनाच्या मदतीवर शेतकऱ्यांना एफआरपीचा ठेंगा दाखवण्याचेच काम केले. यामुळे आता एफआरपीचा चेंडू शासन दरबारी टाकत कारखानदारांनी ऊसदराबाबतची जबाबदारी झटकली आहे. तर दुसरीकडे मात्र या हंगामात जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी आपल्या आजवरच्या गाळपाचा विक्रम मोडला आहे. न्यू फलटण शुगर वर्क्स साखरवाडी या कारखान्याने सात महिन्यांत पहिल्यांदाच ५ लाख ६३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेत कारखान्यातील आजपर्यंतच्या गाळपाचा उच्चांक मोडला आहे. गतवर्षी १५ मे अखेर जिल्ह्यातील एकूण ११ कारखान्यांपैकी जवळपास दहा कारखान्यांनी गाळप हंगाम संपवला होता. चालू वर्षी १२ कारखान्यांपैकी अजूनही ६ कारखाने सुरू असून, ३१ मे पर्यंत गाळप हंगाम सुरू राहील, अशी परिस्थिती आहे.सन २०१४ च्या गाळप हंगामाची परिस्थिती पाहता जिल्ह्यात ऊसदरासाठी शेतकरी संघटनांनी मोठे आंदोलन केले. या आंदोलनाचा केंद्रबिंदू कऱ्हाडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भूमीत असतानाही शेतकरी संघटनांच्या आंदोलनाकडे शासन व साखर कारखानदारांनी डोळेझाक करीत शेतकऱ्यांना २००० ते २५०० रुपये उसाचा दर देण्याची भूमिका घेतली.यानंतर लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांचे वारे २०१५ च्या गाळप हंगामापूर्वीच वाहू लागले. या निवडणुकीपूर्र्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊसपरिषद झाली; मात्र यावेळी आंदोलनाची दिशा स्पष्ट न झाल्याने केवळ ३००० ते ३२०० एकरकमी ऊसदर मिळावा, ही भूमिका मांडण्यात आली. दरम्यान, कारखाने कोणत्याही दराच्या घोषणेशिवाय सुरळीत सुरू झाले तरीही या कारखान्यांवर कुणाचाच वचक राहिला नाही. दरम्यान, देशातील व राज्यातील नवीन सरकार शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळवून देईल याच भोळ्या आशेवर ऊस उत्पादक शेतकरी राहिला. आणि पहिल्यांदाच एफआरपीचे सूत्र ऊसदरासाठी कारखान्यावर शासनाकडून लादण्यात आले. गतवर्षीच्या सरासरी साखर उताऱ्यानुसार प्रत्येकाची एफआरपी जाहीर झाली. यामध्ये किसन वीर, प्रतापगड, अजिंक्यतारा या कारखान्यांनी ती मान्य केली; मात्र इतरांनी सध्याच्या साखर दराची परिस्थिती दाखवत एफआरपी पोटी हप्ते देण्याचे काम केले. (वार्ताहर)दोन लाख मे. टन ऊस तोडणीसाठी शिल्लकंदोन्ही हंगामांतील गाळपाची आकडेवारी पाहता आजअखेर जवळपास १२ लाख क्विंटल साखर गेल्या हंगामापेक्षा वाढली आहे. अजून जवळपास सहा कारखान्यांकडे २ लाख मे. टन उसाचे क्षेत्र शिल्लक आहे. यामुळे ३१ मे अखेर हे शिल्लक क्षेत्र संपवण्यासाठी कारखान्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. यातच मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे तोडणी हंगाम लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाऊस वेळेत न थांबल्यास काही प्रमाणात जिल्ह्यात उसाचे क्षेत्र तोडणीअभावी शिल्लक राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.१५ मे अखेर साखरनिर्मितीची तुलनात्मक आकडेवारीकारखाना २०१४ साखर उत्पादन २०१५ साखर उत्पादन(लाख क्विंटल) (लाख क्विंटल)श्रीराम ४१७७३५ ४२८८५० गाळप बंदकृष्णा १३२९३५० १३८१२५० गाळप बंदकिसन वीर ९२९२५० ९५२१६०*देसाई ३३७४३२ ३५०५७५*सह्याद्री १५४२३७० १५५३७००*अजिंक्यतारा ७५२६१० ७९५०४०*रयत २३१७८० १९५९२० गाळप बंदप्रतापगड ४५८१५० ४८०७००*न्यू फलटण ३२२१८० ५६३५५० गाळप बंदजरंडेश्वर ५६६५०० ६१४०३० गाळप बंदजयवंत ४६१६०० ५१७२२०गाळप बंदग्रीन पॉवर ६९२६०० गाळप बंदएकूण ७३४८९५७ ८५२५५९५ (१५मे अखेर)