शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

जिल्ह्यात वाढला यंदा साखरेचा गोडवा

By admin | Updated: May 25, 2015 00:32 IST

१२ लाख क्विंटल अधिक उत्पादन : गेल्यावर्षीपेक्षा निम्मे कारखाने अद्याप सुरूच

वाठार स्टेशन : चालू हंगामात साखर कारखानदार व शासनाकडून शेतकऱ्यांच्या पदरी ऊसदराबाबत घोर निराशा झाली. ‘एफआरपी’प्रमाणे दर देताना काही कारखाने सोडता इतर कारखान्यांनी शासनाच्या मदतीवर शेतकऱ्यांना एफआरपीचा ठेंगा दाखवण्याचेच काम केले. यामुळे आता एफआरपीचा चेंडू शासन दरबारी टाकत कारखानदारांनी ऊसदराबाबतची जबाबदारी झटकली आहे. तर दुसरीकडे मात्र या हंगामात जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी आपल्या आजवरच्या गाळपाचा विक्रम मोडला आहे. न्यू फलटण शुगर वर्क्स साखरवाडी या कारखान्याने सात महिन्यांत पहिल्यांदाच ५ लाख ६३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेत कारखान्यातील आजपर्यंतच्या गाळपाचा उच्चांक मोडला आहे. गतवर्षी १५ मे अखेर जिल्ह्यातील एकूण ११ कारखान्यांपैकी जवळपास दहा कारखान्यांनी गाळप हंगाम संपवला होता. चालू वर्षी १२ कारखान्यांपैकी अजूनही ६ कारखाने सुरू असून, ३१ मे पर्यंत गाळप हंगाम सुरू राहील, अशी परिस्थिती आहे.सन २०१४ च्या गाळप हंगामाची परिस्थिती पाहता जिल्ह्यात ऊसदरासाठी शेतकरी संघटनांनी मोठे आंदोलन केले. या आंदोलनाचा केंद्रबिंदू कऱ्हाडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भूमीत असतानाही शेतकरी संघटनांच्या आंदोलनाकडे शासन व साखर कारखानदारांनी डोळेझाक करीत शेतकऱ्यांना २००० ते २५०० रुपये उसाचा दर देण्याची भूमिका घेतली.यानंतर लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांचे वारे २०१५ च्या गाळप हंगामापूर्वीच वाहू लागले. या निवडणुकीपूर्र्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊसपरिषद झाली; मात्र यावेळी आंदोलनाची दिशा स्पष्ट न झाल्याने केवळ ३००० ते ३२०० एकरकमी ऊसदर मिळावा, ही भूमिका मांडण्यात आली. दरम्यान, कारखाने कोणत्याही दराच्या घोषणेशिवाय सुरळीत सुरू झाले तरीही या कारखान्यांवर कुणाचाच वचक राहिला नाही. दरम्यान, देशातील व राज्यातील नवीन सरकार शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळवून देईल याच भोळ्या आशेवर ऊस उत्पादक शेतकरी राहिला. आणि पहिल्यांदाच एफआरपीचे सूत्र ऊसदरासाठी कारखान्यावर शासनाकडून लादण्यात आले. गतवर्षीच्या सरासरी साखर उताऱ्यानुसार प्रत्येकाची एफआरपी जाहीर झाली. यामध्ये किसन वीर, प्रतापगड, अजिंक्यतारा या कारखान्यांनी ती मान्य केली; मात्र इतरांनी सध्याच्या साखर दराची परिस्थिती दाखवत एफआरपी पोटी हप्ते देण्याचे काम केले. (वार्ताहर)दोन लाख मे. टन ऊस तोडणीसाठी शिल्लकंदोन्ही हंगामांतील गाळपाची आकडेवारी पाहता आजअखेर जवळपास १२ लाख क्विंटल साखर गेल्या हंगामापेक्षा वाढली आहे. अजून जवळपास सहा कारखान्यांकडे २ लाख मे. टन उसाचे क्षेत्र शिल्लक आहे. यामुळे ३१ मे अखेर हे शिल्लक क्षेत्र संपवण्यासाठी कारखान्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. यातच मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे तोडणी हंगाम लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाऊस वेळेत न थांबल्यास काही प्रमाणात जिल्ह्यात उसाचे क्षेत्र तोडणीअभावी शिल्लक राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.१५ मे अखेर साखरनिर्मितीची तुलनात्मक आकडेवारीकारखाना २०१४ साखर उत्पादन २०१५ साखर उत्पादन(लाख क्विंटल) (लाख क्विंटल)श्रीराम ४१७७३५ ४२८८५० गाळप बंदकृष्णा १३२९३५० १३८१२५० गाळप बंदकिसन वीर ९२९२५० ९५२१६०*देसाई ३३७४३२ ३५०५७५*सह्याद्री १५४२३७० १५५३७००*अजिंक्यतारा ७५२६१० ७९५०४०*रयत २३१७८० १९५९२० गाळप बंदप्रतापगड ४५८१५० ४८०७००*न्यू फलटण ३२२१८० ५६३५५० गाळप बंदजरंडेश्वर ५६६५०० ६१४०३० गाळप बंदजयवंत ४६१६०० ५१७२२०गाळप बंदग्रीन पॉवर ६९२६०० गाळप बंदएकूण ७३४८९५७ ८५२५५९५ (१५मे अखेर)