शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वाढला यंदा साखरेचा गोडवा

By admin | Updated: May 25, 2015 00:32 IST

१२ लाख क्विंटल अधिक उत्पादन : गेल्यावर्षीपेक्षा निम्मे कारखाने अद्याप सुरूच

वाठार स्टेशन : चालू हंगामात साखर कारखानदार व शासनाकडून शेतकऱ्यांच्या पदरी ऊसदराबाबत घोर निराशा झाली. ‘एफआरपी’प्रमाणे दर देताना काही कारखाने सोडता इतर कारखान्यांनी शासनाच्या मदतीवर शेतकऱ्यांना एफआरपीचा ठेंगा दाखवण्याचेच काम केले. यामुळे आता एफआरपीचा चेंडू शासन दरबारी टाकत कारखानदारांनी ऊसदराबाबतची जबाबदारी झटकली आहे. तर दुसरीकडे मात्र या हंगामात जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी आपल्या आजवरच्या गाळपाचा विक्रम मोडला आहे. न्यू फलटण शुगर वर्क्स साखरवाडी या कारखान्याने सात महिन्यांत पहिल्यांदाच ५ लाख ६३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेत कारखान्यातील आजपर्यंतच्या गाळपाचा उच्चांक मोडला आहे. गतवर्षी १५ मे अखेर जिल्ह्यातील एकूण ११ कारखान्यांपैकी जवळपास दहा कारखान्यांनी गाळप हंगाम संपवला होता. चालू वर्षी १२ कारखान्यांपैकी अजूनही ६ कारखाने सुरू असून, ३१ मे पर्यंत गाळप हंगाम सुरू राहील, अशी परिस्थिती आहे.सन २०१४ च्या गाळप हंगामाची परिस्थिती पाहता जिल्ह्यात ऊसदरासाठी शेतकरी संघटनांनी मोठे आंदोलन केले. या आंदोलनाचा केंद्रबिंदू कऱ्हाडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भूमीत असतानाही शेतकरी संघटनांच्या आंदोलनाकडे शासन व साखर कारखानदारांनी डोळेझाक करीत शेतकऱ्यांना २००० ते २५०० रुपये उसाचा दर देण्याची भूमिका घेतली.यानंतर लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांचे वारे २०१५ च्या गाळप हंगामापूर्वीच वाहू लागले. या निवडणुकीपूर्र्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊसपरिषद झाली; मात्र यावेळी आंदोलनाची दिशा स्पष्ट न झाल्याने केवळ ३००० ते ३२०० एकरकमी ऊसदर मिळावा, ही भूमिका मांडण्यात आली. दरम्यान, कारखाने कोणत्याही दराच्या घोषणेशिवाय सुरळीत सुरू झाले तरीही या कारखान्यांवर कुणाचाच वचक राहिला नाही. दरम्यान, देशातील व राज्यातील नवीन सरकार शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळवून देईल याच भोळ्या आशेवर ऊस उत्पादक शेतकरी राहिला. आणि पहिल्यांदाच एफआरपीचे सूत्र ऊसदरासाठी कारखान्यावर शासनाकडून लादण्यात आले. गतवर्षीच्या सरासरी साखर उताऱ्यानुसार प्रत्येकाची एफआरपी जाहीर झाली. यामध्ये किसन वीर, प्रतापगड, अजिंक्यतारा या कारखान्यांनी ती मान्य केली; मात्र इतरांनी सध्याच्या साखर दराची परिस्थिती दाखवत एफआरपी पोटी हप्ते देण्याचे काम केले. (वार्ताहर)दोन लाख मे. टन ऊस तोडणीसाठी शिल्लकंदोन्ही हंगामांतील गाळपाची आकडेवारी पाहता आजअखेर जवळपास १२ लाख क्विंटल साखर गेल्या हंगामापेक्षा वाढली आहे. अजून जवळपास सहा कारखान्यांकडे २ लाख मे. टन उसाचे क्षेत्र शिल्लक आहे. यामुळे ३१ मे अखेर हे शिल्लक क्षेत्र संपवण्यासाठी कारखान्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. यातच मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे तोडणी हंगाम लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाऊस वेळेत न थांबल्यास काही प्रमाणात जिल्ह्यात उसाचे क्षेत्र तोडणीअभावी शिल्लक राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.१५ मे अखेर साखरनिर्मितीची तुलनात्मक आकडेवारीकारखाना २०१४ साखर उत्पादन २०१५ साखर उत्पादन(लाख क्विंटल) (लाख क्विंटल)श्रीराम ४१७७३५ ४२८८५० गाळप बंदकृष्णा १३२९३५० १३८१२५० गाळप बंदकिसन वीर ९२९२५० ९५२१६०*देसाई ३३७४३२ ३५०५७५*सह्याद्री १५४२३७० १५५३७००*अजिंक्यतारा ७५२६१० ७९५०४०*रयत २३१७८० १९५९२० गाळप बंदप्रतापगड ४५८१५० ४८०७००*न्यू फलटण ३२२१८० ५६३५५० गाळप बंदजरंडेश्वर ५६६५०० ६१४०३० गाळप बंदजयवंत ४६१६०० ५१७२२०गाळप बंदग्रीन पॉवर ६९२६०० गाळप बंदएकूण ७३४८९५७ ८५२५५९५ (१५मे अखेर)