शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

मायणी प्रादेशिक नळपाणी योजनेचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 16:03 IST

watershortege satara-खटाव तालुक्यातील येरळवाडी येथील मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा होत असलेल्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे सुमारे तीन कोटी रुपये थकीत आहेत. त्यामुळे वीज कंपनीने या पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तोंडावर मायणीसह पश्चिम-उत्तर काही भागातील ग्रामस्थांवर पाणी कपातीचे संकट ओढवले आहे.

ठळक मुद्देमायणी प्रादेशिक नळपाणी योजनेचा वीजपुरवठा खंडित तीन कोटींची थकबाकी : ग्रामस्थांनी कर भरुन सहकार्य करण्याचे आवाहन

मायणी : खटाव तालुक्यातील येरळवाडी येथील मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा होत असलेल्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे सुमारे तीन कोटी रुपये थकीत आहेत. त्यामुळे वीज कंपनीने या पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तोंडावर मायणीसह पश्चिम-उत्तर काही भागातील ग्रामस्थांवर पाणी कपातीचे संकट ओढवले आहे.याबाबत माहिती अशी की, येरळवाडी येथील मध्यम प्रकल्पातून मायणी परिसरातील मायणीसह चितळी, गुंडेवाडी, मोराळे, व मरडवाक या पाच गावांसाठी पिण्याचे पाणी मिळण्यासाठी मायणी प्रादेशिक नळ पाणी परवठा योजना सुरू करण्यात आली आहे. पाणीपुरवठा योजना सुरू केल्यापासून विविध कारणांमुळे ही योजना सतत बंद राहत होती.

दोन वर्षांपूर्वी या योजनेचे मोठ्या प्रमाणात लाईट बिल येत असल्याने व लहान गावांना योजना न परवडणारी असल्याने चितळी मोराळे गुंडेवाडी व मरडवाक या चार गावांनी या योजनेतील आपला सहभाग काढून घेतला. तेव्हापासून केवळ मायणी गावासाठी ही योजना कार्यान्वित होती. मात्र या योजनेवर असलेली शंभर हाऊस पॉवरची मोटर व त्याचे येणारे लाईट बील व मायणी गावासही न परवडणारे आहे.या योजनेचे थकीत वीज बिल ३ कोटी १२ लाखाचा आसपास गेले आहे. चार-पाच दिवसांपूर्वी मायणी ग्रामपंचायतीकडून संबंधित विभागास दोन लाख रुपये थकीत बिलापोटी भरले होते. मात्र थकबाकीची रक्कम मोठी असल्याने दोन लाख भरल्यानंतर ही संबंधित विभागाने अधिक पैसे भरण्याची मागणी करत योजनेचा पुरवठा खंडित केला. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर मायणीच्या पश्चिम व उत्तर भागातील लक्ष्मीनगर, सराटे मळा, चांदणी चौक परिसर मोराळे रोड मरडवाक रोड कचरेवाडीतील काही भाग या ठिकाणी या ठिकाणातील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा फटका बसणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने यावर लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढून वीजपुरवठा सुरळीत करून ऐन उन्हाळ्यात पाण्याची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.पर्यायी व्यवस्थाही अशक्यसुमारे तीन कोटी रुपये प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचे बील थकल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. गत दोन दिवसापूर्वी ग्रामपंचायतीने थोडी रक्कम भरली आहे. तसेच नवीन योजना किंवा इतर पर्यायी व्यवस्था लगेच बघणे शक्य नसल्याने ग्रामस्थांनी आपला थकित घरफळा व पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच सचिन गुदगे यांनी केले आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातSatara areaसातारा परिसर