शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

थायमेटमुळे विषबाधा होऊन दहा मोर मृत्युमुखी वनविभागाकडून पसरणी घाट परिसराची पाहणी ; पिकांचे नुकसान टाळण्यासाठी औषधाची फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 01:27 IST

वाई : शेतकºयांनी हरबरा व ज्वारी पिकाशेजारी थायमेट टाकल्याने दहा मोरांचा विषबाधेने मृत्यू झाला. ही घटना दोन दिवसांपूर्वी पसरणी घाटालगत

वाई : शेतकºयांनी हरबरा व ज्वारी पिकाशेजारी थायमेट टाकल्याने दहा मोरांचा विषबाधेने मृत्यू झाला. ही घटना दोन दिवसांपूर्वी पसरणी घाटालगत असणाºया महाविद्यालयीन मुलांच्या वसतिगृहावरील क्षेत्रात घडली. हा प्रकार बुधवारी रात्री आठ वाजता पर्यावरणप्रेमींनी उघडकीस आणला.

मोरांच्या मृत्यूला दोन दिवस झाले असल्याने भटक्या कुत्र्यांनी ते खाल्याने परिसरात मोरांचे अवशेष व पिसे पडल्याचे दिसून आले. एका मोराचे अवशेष ताब्यात घेऊन गुरुवारी सकाळी पंचनामा करून गुन्हा दाखल केला. मोराचे अवशेष तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेला पाठविण्यात आल्याचे वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे यांनी सांगितले़ एकाच ठिकाणी येवढ्या प्रमाणात मोरांचा मृत्यू झाल्याने पर्यावरणपे्रमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे़

डिसेंबरनंतर पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात शेतीक्षेत्रात येतात. त्यामुळे शेतकरी पिकांना वन्यप्राण्यापासून असणारे संभाव्य धोके ओळखून व पिकांचे संरक्षण करण्यासाठी चुकीच्या पद्धतीच्या उपाययोजना करीत असतात़ त्यामुळे दुर्मीळ व संवेदशील प्राणी, पक्षी यांचा बळी जातो़वास्तविक पाहता पिकांचे नुकसान वन्यप्राण्यांकडून झाल्यास बाधित शेतकºयांना पंचनामे करून शासनाकडून भरपाई देण्यात येते़ परंतु अविचारी शेतकºयांमुळे वन्यप्राण्यांच्या जिवाला धोका पोहोचत आहे़ त्यामुळे दुर्मीळ वन्यप्राण्याचा नाहक बळी जाताना वारंवार दिसत आहे़ त्या अनुषंगाने वाई तालुक्यातील पर्यावरणपे्रमींनी मोरांच्या मृत्यूला कारणीभूत असणाºयांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे़कडक कारवाईची मागणीवाई तालुक्यात वन्यप्राण्यांचे जीव घेण्याच्या वांरवार घटना घडत असून, अनेक दुर्मीळ प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत़ यांचे गांभीर्य काही समाजकंटकांना नसल्याने राजरोसपणे प्राण्यांचे जीव घेत आहे़ त्यांना काययाचा धाक उरलेला नाही. ही गंभीर बाब असून, दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी वृक्षसंवर्धन परिवारचे सदस्य प्रशांत डोंगरे यांनी केली आहे. 

या दिवसात पाणी, अन्नाच्या शोधात वन्य प्राणी शेतीक्षेत्रात येतात़ पिकांचे नुकसान झाले तरी पंचनामा करून भरपाई मिळू शकते़ परंतु एखाद्याने चुकीच्या पद्धतींचा अवलंब केल्याने वन्य प्राण्याच्या जीवाला धोका पोहोचतो. त्यांचा बळी गेल्यास दोषींवर कडक कारवाई केली जाईल.- महेश झांजुर्णे, वनक्षेत्रपाल वाई