शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

थायमेटमुळे विषबाधा होऊन दहा मोर मृत्युमुखी वनविभागाकडून पसरणी घाट परिसराची पाहणी ; पिकांचे नुकसान टाळण्यासाठी औषधाची फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 01:27 IST

वाई : शेतकºयांनी हरबरा व ज्वारी पिकाशेजारी थायमेट टाकल्याने दहा मोरांचा विषबाधेने मृत्यू झाला. ही घटना दोन दिवसांपूर्वी पसरणी घाटालगत

वाई : शेतकºयांनी हरबरा व ज्वारी पिकाशेजारी थायमेट टाकल्याने दहा मोरांचा विषबाधेने मृत्यू झाला. ही घटना दोन दिवसांपूर्वी पसरणी घाटालगत असणाºया महाविद्यालयीन मुलांच्या वसतिगृहावरील क्षेत्रात घडली. हा प्रकार बुधवारी रात्री आठ वाजता पर्यावरणप्रेमींनी उघडकीस आणला.

मोरांच्या मृत्यूला दोन दिवस झाले असल्याने भटक्या कुत्र्यांनी ते खाल्याने परिसरात मोरांचे अवशेष व पिसे पडल्याचे दिसून आले. एका मोराचे अवशेष ताब्यात घेऊन गुरुवारी सकाळी पंचनामा करून गुन्हा दाखल केला. मोराचे अवशेष तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेला पाठविण्यात आल्याचे वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे यांनी सांगितले़ एकाच ठिकाणी येवढ्या प्रमाणात मोरांचा मृत्यू झाल्याने पर्यावरणपे्रमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे़

डिसेंबरनंतर पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात शेतीक्षेत्रात येतात. त्यामुळे शेतकरी पिकांना वन्यप्राण्यापासून असणारे संभाव्य धोके ओळखून व पिकांचे संरक्षण करण्यासाठी चुकीच्या पद्धतीच्या उपाययोजना करीत असतात़ त्यामुळे दुर्मीळ व संवेदशील प्राणी, पक्षी यांचा बळी जातो़वास्तविक पाहता पिकांचे नुकसान वन्यप्राण्यांकडून झाल्यास बाधित शेतकºयांना पंचनामे करून शासनाकडून भरपाई देण्यात येते़ परंतु अविचारी शेतकºयांमुळे वन्यप्राण्यांच्या जिवाला धोका पोहोचत आहे़ त्यामुळे दुर्मीळ वन्यप्राण्याचा नाहक बळी जाताना वारंवार दिसत आहे़ त्या अनुषंगाने वाई तालुक्यातील पर्यावरणपे्रमींनी मोरांच्या मृत्यूला कारणीभूत असणाºयांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे़कडक कारवाईची मागणीवाई तालुक्यात वन्यप्राण्यांचे जीव घेण्याच्या वांरवार घटना घडत असून, अनेक दुर्मीळ प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत़ यांचे गांभीर्य काही समाजकंटकांना नसल्याने राजरोसपणे प्राण्यांचे जीव घेत आहे़ त्यांना काययाचा धाक उरलेला नाही. ही गंभीर बाब असून, दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी वृक्षसंवर्धन परिवारचे सदस्य प्रशांत डोंगरे यांनी केली आहे. 

या दिवसात पाणी, अन्नाच्या शोधात वन्य प्राणी शेतीक्षेत्रात येतात़ पिकांचे नुकसान झाले तरी पंचनामा करून भरपाई मिळू शकते़ परंतु एखाद्याने चुकीच्या पद्धतींचा अवलंब केल्याने वन्य प्राण्याच्या जीवाला धोका पोहोचतो. त्यांचा बळी गेल्यास दोषींवर कडक कारवाई केली जाईल.- महेश झांजुर्णे, वनक्षेत्रपाल वाई