शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

कास-बामणोली रस्ता बंद होणार असल्याच्या चर्चेला उधाण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:11 IST

पेट्री : कास धरणाच्या भिंतीची उंची वाढविण्याचे काम जोरात सुरू आहे. या धरणाचा सांडवा बांधण्यासाठी कास, धावली, जुंगटी, बामणोली, ...

पेट्री : कास धरणाच्या भिंतीची उंची वाढविण्याचे काम जोरात सुरू आहे. या धरणाचा सांडवा बांधण्यासाठी कास, धावली, जुंगटी, बामणोली, तेटलीकडे जाणारी वाहतूक तीन महिन्यांसाठी बंद करून ती अंधारी-कोळघर-एकीवमार्गे वळविण्याच्या हालचाली संबंधित विभागाकडून सुरू असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र, तसे झाल्यास स्थानिकांना वेळेसह २० किलोमीटर अधिकचे अंतर कापावे लागणार असल्याने मोठा आर्थिक भुर्दंड पडणार आहे. या निर्णयाविरोधात कास, धावली, बामणोली, तेटली विभागातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त हाेत असून, कास धरणाशेजारूनच तत्काळ पर्यायी रस्ता काढण्याची मागणी होत आहे अन्यथा स्थानिकांकडून तीव्र आंदोलन छेडले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

सातारा शहरातील नागरिकांना मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी कास धरणाची उंची वाढविण्याचे काम तीन वर्षांपासून सुरू आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात व भिंतीच्या कामात कास-बामणोलीकडे जाणाऱ्या प्रमुख महामार्गाचा काही भाग बाधित होत असल्याने धरणाशेजारी पर्यायी रस्ता काढून स्थानिकांचे दळणवळण सुरळीत सुरू ठेवणे गरजेचे असताना धरणाच्या कामासाठी परिसरातील नागरिकांना विश्वासात न घेता, वारंवार रस्ता बंद करून नागरिकांना वेठीस धरले जात आहे. आता तर चक्क तीन महिन्यांसाठी वाहतूक बंद करण्याच्या हलचाली सुरू झाल्या आहे. मात्र, स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या भागातून सकाळी अत्यावश्यक असणाऱ्या दूध वाहतूक करणाऱ्या गाड्या, रुग्णवाहिका, शाळकरी मुले, दवाखाना व सातारा बाजारपेठेत येणारे प्रवासी प्रवास करत असतात. मात्र, हा नजीकचा मार्ग बंद झाल्यास दूध वाहतूक व अत्यावश्यक सेवा बंद होऊन स्थानिकांचे जीवनमान कोलमडेल व त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल. त्यामुळे भागातील दळणवळण सुरळीत सुरु राहण्यासाठी धरणाच्या बांधकामाशेजारूनच पर्यायी मार्ग काढण्याची मागणी होत आहे.

(कोट )

धरणामुळे बाधित होणारा प्रमुख रस्ता धरणाच्या कामाअगोदर पूर्ण करून भागातील सर्वसामान्यांचे जीवनमान अडचणीत येणार नाही, याची दखल घेणे गरजेचे होते. तसे न होता वारंवार रस्ता बंद करून आम्हाला वेठीस धरले जात आहे. आता सर्वप्रथम कास धरणाशेजारूनच पर्याय रस्ता तत्काळ तयार करावा अन्यथा रस्ता बंद केल्यास या भागातून जनक्षोभ उसळून जनता रस्त्यावर उतरेल.

- दिनकर जाधव, ग्रामस्थ, धावली

(कोट)

कोरोनाचे लॉकडाऊन संपल्यानंतर या भागातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. कास तलावाशेजारील प्रमुख रस्ता बंद केल्यास व वाहतूक कोळघरमार्गे वळविल्यास २० किलोमीटरहून अधिक अंतर वाढल्याने नागरिकांना पेट्रोल-डिझेलचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल व भागातील जनजीवन ठप्प होऊन पर्यटन व्यवसायही अडचणी येईल. त्यामुळे कास येथूनच रस्ता व्हावा अन्यथा आंदोलन छेडावे लागेल.

- राजेंद्र सपकाळ, ग्रामस्थ, बामणोली

२०सागर चव्हाण