शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

कास-बामणोली रस्ता बंद होणार असल्याच्या चर्चेला उधाण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:11 IST

पेट्री : कास धरणाच्या भिंतीची उंची वाढविण्याचे काम जोरात सुरू आहे. या धरणाचा सांडवा बांधण्यासाठी कास, धावली, जुंगटी, बामणोली, ...

पेट्री : कास धरणाच्या भिंतीची उंची वाढविण्याचे काम जोरात सुरू आहे. या धरणाचा सांडवा बांधण्यासाठी कास, धावली, जुंगटी, बामणोली, तेटलीकडे जाणारी वाहतूक तीन महिन्यांसाठी बंद करून ती अंधारी-कोळघर-एकीवमार्गे वळविण्याच्या हालचाली संबंधित विभागाकडून सुरू असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र, तसे झाल्यास स्थानिकांना वेळेसह २० किलोमीटर अधिकचे अंतर कापावे लागणार असल्याने मोठा आर्थिक भुर्दंड पडणार आहे. या निर्णयाविरोधात कास, धावली, बामणोली, तेटली विभागातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त हाेत असून, कास धरणाशेजारूनच तत्काळ पर्यायी रस्ता काढण्याची मागणी होत आहे अन्यथा स्थानिकांकडून तीव्र आंदोलन छेडले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

सातारा शहरातील नागरिकांना मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी कास धरणाची उंची वाढविण्याचे काम तीन वर्षांपासून सुरू आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात व भिंतीच्या कामात कास-बामणोलीकडे जाणाऱ्या प्रमुख महामार्गाचा काही भाग बाधित होत असल्याने धरणाशेजारी पर्यायी रस्ता काढून स्थानिकांचे दळणवळण सुरळीत सुरू ठेवणे गरजेचे असताना धरणाच्या कामासाठी परिसरातील नागरिकांना विश्वासात न घेता, वारंवार रस्ता बंद करून नागरिकांना वेठीस धरले जात आहे. आता तर चक्क तीन महिन्यांसाठी वाहतूक बंद करण्याच्या हलचाली सुरू झाल्या आहे. मात्र, स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या भागातून सकाळी अत्यावश्यक असणाऱ्या दूध वाहतूक करणाऱ्या गाड्या, रुग्णवाहिका, शाळकरी मुले, दवाखाना व सातारा बाजारपेठेत येणारे प्रवासी प्रवास करत असतात. मात्र, हा नजीकचा मार्ग बंद झाल्यास दूध वाहतूक व अत्यावश्यक सेवा बंद होऊन स्थानिकांचे जीवनमान कोलमडेल व त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल. त्यामुळे भागातील दळणवळण सुरळीत सुरु राहण्यासाठी धरणाच्या बांधकामाशेजारूनच पर्यायी मार्ग काढण्याची मागणी होत आहे.

(कोट )

धरणामुळे बाधित होणारा प्रमुख रस्ता धरणाच्या कामाअगोदर पूर्ण करून भागातील सर्वसामान्यांचे जीवनमान अडचणीत येणार नाही, याची दखल घेणे गरजेचे होते. तसे न होता वारंवार रस्ता बंद करून आम्हाला वेठीस धरले जात आहे. आता सर्वप्रथम कास धरणाशेजारूनच पर्याय रस्ता तत्काळ तयार करावा अन्यथा रस्ता बंद केल्यास या भागातून जनक्षोभ उसळून जनता रस्त्यावर उतरेल.

- दिनकर जाधव, ग्रामस्थ, धावली

(कोट)

कोरोनाचे लॉकडाऊन संपल्यानंतर या भागातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. कास तलावाशेजारील प्रमुख रस्ता बंद केल्यास व वाहतूक कोळघरमार्गे वळविल्यास २० किलोमीटरहून अधिक अंतर वाढल्याने नागरिकांना पेट्रोल-डिझेलचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल व भागातील जनजीवन ठप्प होऊन पर्यटन व्यवसायही अडचणी येईल. त्यामुळे कास येथूनच रस्ता व्हावा अन्यथा आंदोलन छेडावे लागेल.

- राजेंद्र सपकाळ, ग्रामस्थ, बामणोली

२०सागर चव्हाण