शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

सातारकरांचे पाण्यासाठी 'बोंबाबोंब आंदोलन', अधिकाऱ्यांना गढूळ पाणी पाजण्याचा इशारा

By सचिन काकडे | Updated: April 26, 2023 15:41 IST

संतप्त नागरिकांनी पाणीपुरवठा अभियंता यांना धरले धारेवर

सातारा : सातारा शहराच्या पश्चिम भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, सलग तीन आठवडे गढूळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या येथील रहिवाशांनी बुधवारी सकाळी पालिकेत येऊन बोंबाबोंब आंदोलन केले. नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा न झाल्यास सहा मे रोजी अधिकाऱ्यांना गढूळ पाणी पाजू, असा इशारा यावेळी नगर विकास आघाडीच्या माजी नगरसेवकांनी प्रशासनाला दिला.गेल्या महिनाभरापासून सातारा शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यातचशहराच्या पश्चिम भागात वारंवार गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न बनला आहे.वारंवार सूचना, निवेदने देऊन पाणीपुरवठ्यात कोणताही फरक पडलेला नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी नगर विकास आघाडीचे माजी नगरसेवक अविनाश कदम,  पक्षप्रतोद अमोल मोहिते यांच्यासह रामाचा गोट, मंगळवार पेठ, होलार गल्ली भागातील नागरिकांनी पालिकेत  मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर बोंबाबोंब आंदोलन केले. यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी पाणीपुरवठा अभियंता शहाजी वाठारे यांच्यासमोर प्रश्नांची सरबत्ती केली.यावेळी शहर अभियंता दिलीप चित्रे यांनी प्रशासनाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, फिल्टर बेडची स्वच्छता केल्यानंतर पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकावी लागते. या पावडरमुळे पाण्याचा रंग काहीसा पिवळसर होतो. याचा अर्थ ते पाणी दूषित आहे असे नाही. असे सांगत त्यांनी समोरच्या बाटलीतील पिवळसर पाणी नागरिकांना पिऊनच दाखवले. यानंतर नागरिकांचा विरोध शांत झाला.दरम्यान, पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करून नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करावा, अन्यथा सहा मे रोजी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, असा इशारा अविनाश कदम यांनी दिला. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीagitationआंदोलन