शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

सातारा जिल्ह्यातील माळी समाजाकडून राज्याला दिशा!

By admin | Updated: January 7, 2016 01:00 IST

फुलेंचा समाज : सावता माळीपासून ते महात्मा ज्योतिबा फु ले, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे माळी समाजाचेच

संतोष गुरव- कऱ्हाड  -समाजातील अशिक्षित व बेरोजगार, जातीव्यवस्थेतील लोकांना दिशा देण्याचे काम माळी समाजाने केले आहे. स्त्रियांना सतीपासून परावृत्त करून पूर्नविवाहाची प्रथाही सर्वप्रथम माळी समाजामध्येच रूढीस आली. अशा माळी समाजातील थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे दाम्पत्य सातारा जिल्ह्याचेच होय. त्यांनी आपल्या कार्यातून सपूर्ण महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले.खंडाळा तालुक्यातील नायगावच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व खटाव तालुक्यातील कटगुणचे महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षण, समाजव्यवस्था व धर्म, जातींबाबत मोठे कार्य केले.जातीने माळी असूनदेखील त्यांनी सर्वधर्मसमभाव जपला. त्यांच्या माळी समाजाचेही एक वेगळेच वैशिष्ट्य आहे. माळी समाजाने आपली परंपरा व रितीरिवाज आजही जपला आहे.महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची जोपासना करत आजही माळी समाजातील व्यक्ती शिक्षण, वैद्यकीय, राजकारण तसेच उद्योग क्षेत्रांमध्ये क्रांती घडवत आहेत.माळी समाजाच्या दोन जाती आहेत. एक म्हणजे लिंगायत व दुसरी खतावणी होय. लिंगायत व खतावणी जातीमधील लोकांची राहणीमानही काहीशा प्रमाणात विभक्त पद्धतीची असलेली पाहावयास मिळते.सातारा जिल्ह्यात माळी समाजाची लोकसंख्या ही साधारणत: लाखापेक्षाही जास्त आढळते. महादेव व वीरशैव बसवेश्वर दैवत यांची माळी समाजातील लोक पूजा करतात. लिंगायत माळी हे श्रावणातील सर्व सोमवारी शंकराची पूजा करतात. त्यामध्ये देवाला बेलाची पाने व झेंडूची फुले घालतात. माळी समाजातील लोकांची विवाहाचीही पद्धत वेगळ्या स्वरूपाची आहे. त्यामध्ये माळी समाजात नवजोडप्यांचा विवाह हा बैठकीच्या पद्धतीने साजरा केला जातो. हातामध्ये नारळ देऊन मंगलाष्ठकांच्या साक्षीने या समाजातील विधी केले जातात.माळी समाजातील लोक हे जास्त करून पश्चिम महाराष्ट्रात आढळून येतात. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, नगरजिल्ह्यात जास्त लोकसंख्या ही माळी समाजातील लोकांची आढळते.बाराबलुतेदारीमधील एक व महत्त्वपूर्ण समाज म्हणून माळी समाजाकडे पाहिले जाते. माळी समाजाचे वैशिष्ट्य म्हणजे लग्न कार्यात नवरदेवाला मंडवळी, हार, तुरे हे देण्याचे काम करतात. प्रत्येक सनाला बेल व झेंडूची फुले वाटण्याचे काम माळी समाजातील लोकांकडून केले जाते. बेंदूर, दिवाळी अशा सणाला बेल व चंदनाची पाने वाटली जातात. माळी समाजात पुर्नविवाह तसेच विधवा विवाह पद्धत फुले यांच्या काळापासून केले केली जाऊ लागली. जातीने माळी असलेल्या लोकांकडून फुलबेल विक्रीचा व्यवसाय हा पंरपरागत पद्धतीने केला जातो. बाराबलुतेदारांपैकी एक असलेल्या माळी समाजातील लोकांकडून गावच्या दैवतामधील महादेवाची पूजा ही केली जाते. त्यासाठी या समाजातील लोक देवाची पूजाअर्चा नित्यनेमाने करतात. त्याबदल्यात त्यांना गावातील लोकांकडून धान्य तसेच नैवद्य दिला जातो. प्रत्येक सणाला गावातील लोकांना बेल व फुले, चंदनाची पाने वाटून त्यांना धार्मिक विधितीसाठी धार्मिक साहित्य पूरविण्याचे काम हे या समाजातील लोक करत असतात. त्यामुळे गावातील इतर धर्म, जातीतील लोकांशी त्यांचा सलोखा हा वाढण्यास मदतही होते. महादेवाची पूजा करून समाजात ज्ञानदानाचे काम माळी समाज आजही करत आहे. समाजातील स्त्रियांचा मळवट प्रसिद्धमाळी समाजातील विवाहित स्त्रिया या आपल्या कपाळावर कुंकवाच्या गोल टिकलीबरोबर आडव्या पद्धतीने मळवटही लावतात. साधारण साधी राहणीमानी अवलंबवून धार्मिक कार्यात बेल, चंदनाची पाने व झेंडूची फुलेही वाटतात. माळी समाजातील स्त्रियांच्या डोक्यावरील मळवटामुळे त्यांना विशेष महत्त्व प्राप्त होते. माळी समाजातील विवाहाची पद्धत ही वेगळ्या स्वरूपाची आहे. या समाजात नवरा व नवरीला पाटावर बसवून हातात नारळ देऊन मंगलाष्ठकांच्या साह्याने विवाह केले जातात. विवाहानंतर देवास नैवेद्याच्या स्वरूपात बोकडही काही दिले जाते. समाजाचा विवाहही वेगळ्या पद्धतीनेमाळी समाजातील विवाहाची पद्धत वेगळी आहे. नवरा व नवरीला पाटावर बसवून हातात नारळ देऊन मंगलाष्ठकांच्या साह्याने विवाह केले जातात. काही ठिकाणी विवाहानंतर देवास नैवेद्याच्या स्वरूपात बोकडही दिले जाते. महाराष्ट्रात माळी समाजातील लोकांना मोठ्याप्रमाणात महत्त्व आहे. सामाजिक क्षेत्रासह राजकीय, सांस्कृतिक अशा क्षेत्रात उच्चपदावर या समाजातील लोकांनी महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. आजही समाजातील लोकांकडून धर्मातील जाती, परंपरा नित्यनेमाने पाळल्या जातात. - मोहनराव माळी, संस्थापक, दत्त अपंग संस्था, आगाशिवनगर, मलकापूर