शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बिचुकले गावच्या जलयुक्त चळवळीचा डंका

By admin | Updated: March 23, 2017 16:47 IST

दुष्काळ निवारण : ना राजकारण, ना पक्ष, जलसाक्षरता व ग्रामविकास हेच लक्ष्यचा नारा

आॅनलाईन लोकमत

वाठार स्टेशन : कायम दुष्काळी भाग अशी ओळख असलेल्या कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील बिचुकले गावाने काळाची पावले ओळखून ना राजकारण, ना पक्ष, जलसाक्षरता व ग्रामविकास हे आमचे लक्ष्य,ह्ण असा नारा देत गेल्या तीन वर्षांपासून आपल्या गाव परिसरात जलसंधारण, ग्रामस्वछता व दुष्काळ निवारणाचे काम हाती घेतले आहे. याचा डंका आता सर्वत्र वाजू लागला आहे.

सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली व गावातील डॉ. सुरेश पवार यांच्या नेतृत्वाखाली श्रमदान ग्रुप या नावाने संस्था स्थापन करण्यात आली आहे. या ग्रुपच्या माध्यमातून गावातील शेकडो युवक, ग्रामस्थ आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी एक दिवस श्रमदान करत आहेत. अशामुळेच याची दखल घेण्यात आल्याने गुढी पाडव्यादिवशी या गावच्या जलसंधारण कामाची यशोगाथा संपूर्ण राज्यभर दिसणार आहे.

चहू बाजूने विस्तारलेले डोंगर आणि या मधोमध असलेले बिचुकले हे साधारण दोन ते तीन हजार लोकसंख्येच गाव. गावाशेजारी पूर्व व दक्षिण बाजूला डोंगर तर पश्चिमेला देऊर गाव अशा निसर्गसानिध्यात असलेल्या या गावाने कायमच्या दुष्काळावर मात करण्याचा निर्धार केला आहे. गेल्या तीनवर्षांपासून हे गाव दुष्काळ निवारणासाठी झटू लागले. गाव परिसरात असलेल्या डोंगरावर पाणी अडवणे. तसेच वृक्षारोपण करणे वाहून जाणारे पाणी अडवणे व जिरवण्याचे काम या गावाने सुरू ठेवले आहे.

या गावातील युवक, ग्रामस्थांच्या या प्रयत्नांना आज अपेक्षित यशसुद्धा मिळालेय. बिचुकले गाव परिसरातील गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असली तरी या गावात मात्र अद्याप कोणताही टँकर लावण्याची आवश्यकता भासत नाही. गावचा दुष्काळ हटवण्यासाठी आता हे सर्वच गावकरी मनापासून कामाला लागले आहेत. नुकतीच ग्रामसभाही बोलावण्यात आली होती. यासाठी युवकांपासून सर्वच ग्रामस्थ व महिलांनी या लढ्यात एकत्र येऊन गावाचा चेहरा बदलण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील या गावाचा आदर्श शेजारील गावांनी घेण्याची आता गरज निर्माण झाली आहे. (वार्ताहर) बक्षीस मिळविण्यापेक्षा काम महत्त्वाचे...गतवर्षी महाराष्ट्रातील दुष्काळ हटवण्यासाठी अभिनेता अमीर खान, मुकेश अंबानी, सचिन तेंडुलकर यांनी पाणी फाउंडेशनची स्थापना केली. केवळ शासकीय मदतीवर किंवा निसर्गावर अवलंबून न राहता लोकसहभागाच्या आणि श्रमदानाच्या माध्यमातून जनजागृती व जलजागृती करणे हे पाणी फाउंडेशनचे मुख्य ध्येय असल्याने त्यांनी कोरेगावसह महाराष्ट्रातील तीन तालुके यासाठी निवडले. यामध्ये बिचुकले गाव सहभागी झाले. केवळ बक्षीस मिळवण्यापेक्षा संघटितपणे या गावाने या स्पर्धेत सहभाग घेतला. याचा मोठा फायदा आज हे गाव अनुभवत आहे. यापुढे कुठेही न थांबता आता ही चळवळ या पुढेही सुरूच ठेवण्याची भूमिका या गावकऱ्यांनी घेतली आहे.