शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

बिचुकले गावच्या जलयुक्त चळवळीचा डंका

By admin | Updated: March 23, 2017 16:47 IST

दुष्काळ निवारण : ना राजकारण, ना पक्ष, जलसाक्षरता व ग्रामविकास हेच लक्ष्यचा नारा

आॅनलाईन लोकमत

वाठार स्टेशन : कायम दुष्काळी भाग अशी ओळख असलेल्या कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील बिचुकले गावाने काळाची पावले ओळखून ना राजकारण, ना पक्ष, जलसाक्षरता व ग्रामविकास हे आमचे लक्ष्य,ह्ण असा नारा देत गेल्या तीन वर्षांपासून आपल्या गाव परिसरात जलसंधारण, ग्रामस्वछता व दुष्काळ निवारणाचे काम हाती घेतले आहे. याचा डंका आता सर्वत्र वाजू लागला आहे.

सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली व गावातील डॉ. सुरेश पवार यांच्या नेतृत्वाखाली श्रमदान ग्रुप या नावाने संस्था स्थापन करण्यात आली आहे. या ग्रुपच्या माध्यमातून गावातील शेकडो युवक, ग्रामस्थ आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी एक दिवस श्रमदान करत आहेत. अशामुळेच याची दखल घेण्यात आल्याने गुढी पाडव्यादिवशी या गावच्या जलसंधारण कामाची यशोगाथा संपूर्ण राज्यभर दिसणार आहे.

चहू बाजूने विस्तारलेले डोंगर आणि या मधोमध असलेले बिचुकले हे साधारण दोन ते तीन हजार लोकसंख्येच गाव. गावाशेजारी पूर्व व दक्षिण बाजूला डोंगर तर पश्चिमेला देऊर गाव अशा निसर्गसानिध्यात असलेल्या या गावाने कायमच्या दुष्काळावर मात करण्याचा निर्धार केला आहे. गेल्या तीनवर्षांपासून हे गाव दुष्काळ निवारणासाठी झटू लागले. गाव परिसरात असलेल्या डोंगरावर पाणी अडवणे. तसेच वृक्षारोपण करणे वाहून जाणारे पाणी अडवणे व जिरवण्याचे काम या गावाने सुरू ठेवले आहे.

या गावातील युवक, ग्रामस्थांच्या या प्रयत्नांना आज अपेक्षित यशसुद्धा मिळालेय. बिचुकले गाव परिसरातील गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असली तरी या गावात मात्र अद्याप कोणताही टँकर लावण्याची आवश्यकता भासत नाही. गावचा दुष्काळ हटवण्यासाठी आता हे सर्वच गावकरी मनापासून कामाला लागले आहेत. नुकतीच ग्रामसभाही बोलावण्यात आली होती. यासाठी युवकांपासून सर्वच ग्रामस्थ व महिलांनी या लढ्यात एकत्र येऊन गावाचा चेहरा बदलण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील या गावाचा आदर्श शेजारील गावांनी घेण्याची आता गरज निर्माण झाली आहे. (वार्ताहर) बक्षीस मिळविण्यापेक्षा काम महत्त्वाचे...गतवर्षी महाराष्ट्रातील दुष्काळ हटवण्यासाठी अभिनेता अमीर खान, मुकेश अंबानी, सचिन तेंडुलकर यांनी पाणी फाउंडेशनची स्थापना केली. केवळ शासकीय मदतीवर किंवा निसर्गावर अवलंबून न राहता लोकसहभागाच्या आणि श्रमदानाच्या माध्यमातून जनजागृती व जलजागृती करणे हे पाणी फाउंडेशनचे मुख्य ध्येय असल्याने त्यांनी कोरेगावसह महाराष्ट्रातील तीन तालुके यासाठी निवडले. यामध्ये बिचुकले गाव सहभागी झाले. केवळ बक्षीस मिळवण्यापेक्षा संघटितपणे या गावाने या स्पर्धेत सहभाग घेतला. याचा मोठा फायदा आज हे गाव अनुभवत आहे. यापुढे कुठेही न थांबता आता ही चळवळ या पुढेही सुरूच ठेवण्याची भूमिका या गावकऱ्यांनी घेतली आहे.