राजसत्तेच्या एकसंधेतून देशाचा विकास
By Admin | Updated: November 17, 2015 00:06 IST2015-11-16T21:22:33+5:302015-11-17T00:06:29+5:30
रामराजे नाईक-निंबाळकर : पिंप्रदमध्ये मध्यवर्ती इमारत उद्घाटन

राजसत्तेच्या एकसंधेतून देशाचा विकास
फलटण : ‘धर्मसत्ता व राजसत्ता यांनी हातात हात घालून काम केले तर देशाचा विकास होईल. आपल्या देशात अनेक जातीधर्म असतानाही येथील लोकशाही बळकट असल्यानेच सहज सत्तांतर होऊ शकते, हे लोकशाहीचे चांगले उदाहरण आहे,’ असे प्रतिपादन विधान परिषदचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.
पिंप्रद येथे मध्यवर्ती कार्यालय इमारत, व्यसनमुक्ती केंद्र, गुरुकुल व आरोग्य केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी होते. यावेळी संदीपान महाराज हासेगावकर, पांडुरंग बुवा घुले, बजरंग महाराज कर्जुलेकर, लक्ष्मण महाराज कोकाटे, गुरुवर्य मारुतीबाबा कुऱ्हेकर, अदृष्य काडसिद्धेश्वर स्वामी, मारुतीमामा कऱ्हाडकर, विठ्ठल स्वामी वडगावकर, शिवानंदजी भारती अंभेरी, आमदार दीपक चव्हाण, न्यू फलटण शुगर वर्क्सचे अध्यक्ष प्रल्हादराव साळुंखे-पाटील, अशोक सस्ते, नगरसेवक सनी अहिवळे, प्रा. भीमदेव बुरुंगले, नायब तहसीलदार नंदकुमार भोईटे, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, भाजप किसान मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष वासुदेव काळे, जावळी पंचायत समितीचे सभापती सुहास गिरी, आर. के. रांजणे शेठ, नामदेवराव ननवरे, वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव सापते, काँ. विलासराव सोनवणे, अॅड. भानुदास राऊत, संजय धोंडगे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अनुप शहा, शहराध्यक्ष दादा चोरमले उपस्थित होते.
धैर्यशील देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष विलासबाबा जवळ यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
स्वराज्याचे सुराज्य शक्य
‘युवक मित्र बंडातात्या कऱ्हाडकर यांनी म्हणाले, ‘या राज्यात मनुष्य व निसर्गाचा संहार करण्याचे पापकर्म करणाऱ्या डाऊ कंपनीला येथून हद्दपार केल्याने आम्हाला मोठे बळ लाभले. संघाद्वारे हुंबरी घेणारे तरुण आपण एकत्र करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. यातून येसाजी कंक, खंडोजी बल्लाळ, तानाजी मालुसरे, हनुमान यांच्यासारखी सर्वसामान्यातून आलेली, कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडणारी तरुण मुले एकत्र आल्याने स्वराजाचे सुराज्य करण्याची संकल्पना आगामी काळात निश्चित यशस्वी होईल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.