शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

'सावत्र भावांवर विश्वास ठेवू नका, ते कधीच काही देत नाहीत'; देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 20:38 IST

Devendra Fadnavis: राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, या योजनेच्या लाभार्थी सोहळ्याचे आयोजन आज साताऱ्यात करण्यात आले होते.

 Devendra Fadnavis ( Marathi News ) : पावसाळी अधिवेशात राज्य सरकारने 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' ही मोठी योजना जाहीर केली. विधानसभेपूर्वी ही योजना जाहीर केल्यामुळे या योजनेची चर्चा सुरू आहे. अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले आहेत. या आर्थिक वर्षात योजनेसाठी ३५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली. दरम्यान, या योजनेवर विरोधकांकडून टीकाही सुरू आहेत. तर दुसरीकडे आज राज्य सरकारकडून योजनेतील लाभार्थ्यांचा सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन सुरू आहे. आज साताऱ्यात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, यावेळी बोलताना फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. 

ठाणे : २ चिमुकल्या विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण; हरभजन संतापला, CM शिंदेंना टॅग करत म्हणाला...

"माझ्या बहीणी जेव्हा मला देवाभाऊ म्हणतात तेव्हा मला जास्त आवडतं.  जर विकसित भारत घडवायचं असेल तर महिलांना देशाच्या मुख्यधारेत आणल्याशिवाय हे होऊ शकतं नाही, असं मोदींनी सांगितलं आहे. जोपर्यंत महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहत नाहीत तोपर्यंत हे होऊ शकत नाही. आता हळूहळू महिलांच्या जीवनात परिणाम होत आहे. आता पुढच्या काळात विधानसभा आणि लोकसभेत महिला प्रतिनिधी निवडून जाणार आहेत. महाराष्ट्र विधानसभेत १०० महिला आपल्याला दिसतील, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

"ज्यावेळी आम्ही एसटी तिकीटाचा निर्णय घेतला तेव्हा विरोधक आमच्यावर टीका करु लागले, पण एसटी यामुळे फायद्यात आली आहे. आज आपण महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. विरोधक या योजनेच्या विरोधात बोलत आहेत. याविरोधात कोर्टात गेले, या सावत्र भावांवर विश्वास ठेवू नका. हे सावत्र भाऊ तुम्हाला आतापर्यंत काही दिलं नाही, यापुढेही काही दिलं नाही, असा टोलाही फडणवीस यांनी विरोधकांना लगावला. 

'योजना कधीच बंद होणार नाही'

"तुमच्या आशिर्वादाने या सरकारने ३१ मार्चपर्यंत या योजनेसाठी पैसे ठेवले आहेत. पुढच्या काही दिवसात पुन्हा आपलेच सरकार येणार पुन्हा आम्ही या योजनेसाठी पैसे ठेवणार आहे. जोपर्यंत महायुतीचे सरकार आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. काहीजण म्हणतात पंधराशे रुपयात काय होणार आहे? सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्यांना या योजनेच काय कळणार आहे. हे लोक हॉटेलमध्ये २ हजारांची टीप देणाऱ्यांना पंधराशे रुपयांची किंमत समजत नाही. आमची ती भगिनी महिन्याच्या शेवटी हिशोब करते तेव्हा त्यांना त्या पंधराशे रुपयांची किंमत कळते. या लोकांना आता आमच्या बहिणीच उत्तर देतील, असा निशाणाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी साधला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेना