शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

'सावत्र भावांवर विश्वास ठेवू नका, ते कधीच काही देत नाहीत'; देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 20:38 IST

Devendra Fadnavis: राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, या योजनेच्या लाभार्थी सोहळ्याचे आयोजन आज साताऱ्यात करण्यात आले होते.

 Devendra Fadnavis ( Marathi News ) : पावसाळी अधिवेशात राज्य सरकारने 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' ही मोठी योजना जाहीर केली. विधानसभेपूर्वी ही योजना जाहीर केल्यामुळे या योजनेची चर्चा सुरू आहे. अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले आहेत. या आर्थिक वर्षात योजनेसाठी ३५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली. दरम्यान, या योजनेवर विरोधकांकडून टीकाही सुरू आहेत. तर दुसरीकडे आज राज्य सरकारकडून योजनेतील लाभार्थ्यांचा सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन सुरू आहे. आज साताऱ्यात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, यावेळी बोलताना फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. 

ठाणे : २ चिमुकल्या विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण; हरभजन संतापला, CM शिंदेंना टॅग करत म्हणाला...

"माझ्या बहीणी जेव्हा मला देवाभाऊ म्हणतात तेव्हा मला जास्त आवडतं.  जर विकसित भारत घडवायचं असेल तर महिलांना देशाच्या मुख्यधारेत आणल्याशिवाय हे होऊ शकतं नाही, असं मोदींनी सांगितलं आहे. जोपर्यंत महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहत नाहीत तोपर्यंत हे होऊ शकत नाही. आता हळूहळू महिलांच्या जीवनात परिणाम होत आहे. आता पुढच्या काळात विधानसभा आणि लोकसभेत महिला प्रतिनिधी निवडून जाणार आहेत. महाराष्ट्र विधानसभेत १०० महिला आपल्याला दिसतील, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

"ज्यावेळी आम्ही एसटी तिकीटाचा निर्णय घेतला तेव्हा विरोधक आमच्यावर टीका करु लागले, पण एसटी यामुळे फायद्यात आली आहे. आज आपण महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. विरोधक या योजनेच्या विरोधात बोलत आहेत. याविरोधात कोर्टात गेले, या सावत्र भावांवर विश्वास ठेवू नका. हे सावत्र भाऊ तुम्हाला आतापर्यंत काही दिलं नाही, यापुढेही काही दिलं नाही, असा टोलाही फडणवीस यांनी विरोधकांना लगावला. 

'योजना कधीच बंद होणार नाही'

"तुमच्या आशिर्वादाने या सरकारने ३१ मार्चपर्यंत या योजनेसाठी पैसे ठेवले आहेत. पुढच्या काही दिवसात पुन्हा आपलेच सरकार येणार पुन्हा आम्ही या योजनेसाठी पैसे ठेवणार आहे. जोपर्यंत महायुतीचे सरकार आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. काहीजण म्हणतात पंधराशे रुपयात काय होणार आहे? सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्यांना या योजनेच काय कळणार आहे. हे लोक हॉटेलमध्ये २ हजारांची टीप देणाऱ्यांना पंधराशे रुपयांची किंमत समजत नाही. आमची ती भगिनी महिन्याच्या शेवटी हिशोब करते तेव्हा त्यांना त्या पंधराशे रुपयांची किंमत कळते. या लोकांना आता आमच्या बहिणीच उत्तर देतील, असा निशाणाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी साधला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेना