शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

भाजप सत्तेवर आल्यास लोकशाही नष्ट होईल : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 21:27 IST

भ्रष्टाचारातून अर्थसंपन्न झालेल्या मोदी सरकारने आता भ्रष्टाचारी पैशाने बहुजनांचा स्वाभिमान विकत घेण्याचा प्रयत्न चालविला आहे.

ठळक मुद्देढेबेवाडीत काँग्रेसचा मेळावा उत्साहात; भ्रष्टाचारी पैशाने स्वाभिमान विकत घेण्याचा प्रयत्न

ढेबेवाडी : ‘भ्रष्टाचारातून अर्थसंपन्न झालेल्या मोदी सरकारने आता भ्रष्टाचारी पैशाने बहुजनांचा स्वाभिमान विकत घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. मोदी पुन्हा सत्तेवर आले तर लोकशाही नष्ट होईल. निवडणुकाही होणार नाहीत आणि ठोकशाही उदयास येईल,’ असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

ढेबेवाडी, ता. पाटण येथे पाटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसचा मेळावा तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच व काँग्रेसच्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांचा सत्कार अशा संयुक्तिक कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. आमदार आनंदराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास आमदार जयकुमार गोरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर, प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील, मंदाकिनी पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार चव्हाण म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या मालाच्या किमती कमी करून शेतीव्यवस्था खिळखिळी करत संपूर्ण साखर कारखानदारीसह सहकार उद्ध्वस्त करण्याचा भाजप सरकारचा डाव आहे. मोदी सरकारने आणि स्वत: मोदींनी राफेल खरेदीमध्ये तीस हजार कोटींचा मोठा भ्रष्टाचार केला आहे.पाच वर्षांत कोणतेही आश्वासन पूर्ण होऊ शकले नाही. याउलट २०१८ मध्ये १ कोटी १० लाख नोकºया या सरकारने कमी करून बेरोजगारी निर्माण केली. तर सर्वात जास्त शेतकºयांनी यांच्याच काळात आत्महत्या केल्याची नोंदही झाली आहे. यामुळे या जातीयवादी सरकारला हद्दपार करण्यासाठी तेवीस समविचारी पक्षांनी आता लढा पुकारला आहे.’

यावेळी आमदार आनंदराव पाटील, आमदार जयकुमार गोरे, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, हिंदुराव पाटील आदींची भाषणे झाली. संजय लोहार यांनी सूत्रसंचालन केले. अभिजित पाटील यांनी प्रास्ताविक केले. पांडुरंग यादव यांनी आभार मानले. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारणBJPभाजपा