शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पाणीपातळीत घट चिंता वाढविणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:40 IST

फलटण : एप्रिल महिना सुरू झाला आणि उन्हाच्या झळांनी शेतशिवारे तापू लागली. रानात असणारी गव्हाच्या पिकाची काढणी जवळजवळ ...

फलटण : एप्रिल महिना सुरू झाला आणि उन्हाच्या झळांनी शेतशिवारे तापू लागली. रानात असणारी गव्हाच्या पिकाची काढणी जवळजवळ पूर्ण होत आली आहे. गेल्या वर्षी मुबलक पाऊस झाला असला तरी यंदा मात्र मार्चच्या सुरुवातीलाच पाण्याने तळ गाठला आहे. परिसरातील काशीदवाडी, वडजल, निंभोरे, नांदल, सुरवडी या गावांमध्ये भूजल पातळी खालावत चालली असून विहिरीच्या पाणीपातळीत लक्षणीय घट दिसून येत आहे.

गेल्या वर्षी या दिवसांत पाणीपातळी चांगली टिकून होती. या वर्षी मात्र कूपनलिकांचे पाणी तासाभर पण टिकत नाही.

भरपूर पाऊस पडूनसुद्धा मार्चच्या सुरुवातीलाच विहिरी आणि बोअरवेल यांचे पाणी कमी पडू लागले आहे. त्यामुळे ऊसलागणीला पाणी देताना शेतकऱ्यांना कमालीची कसरत करावी लागत आहे. जूनपर्यंत ऊस व कडवळ पिकांना जगवताना शेतकरी हैराण होत आहेत. उपलब्ध पाणी आणि पीक यांचा समतोल कसा साधायचा, हा प्रश्न शेतकऱ्यांना सोडवावा लागत आहे.

परिसरातील तलाव कोरडे पडू लागल्याने गावकरी चिंतेत आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होणार आहे. गुरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागणार आहे. परिसरात गेल्या दहा दिवसांत अचानक पाणीपातळी घटल्याचे शेतकरी सांगतात. बोअरवेल एकदमच कोरड्या पडत आहेत.

निसर्गाने भरभरून दिले; परंतु नियोजन व उपाययोजना यांच्याअभावी दरवर्षी शेतकऱ्यांना या दिवसात पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. एका बाजूला वाढता कोरोना आणि दुसऱ्या बाजूला घटती पाणीपातळी नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे.

गेल्या पावसाळ्यात भरपूर पाऊस पडूनही या वर्षी पाणीपातळी खालावली आहे. यापाठीमागचे वैज्ञानिक कारण शोधले पाहिजे; तसेच पाणी साठवण क्षमता वाढविली पाहिजे.

- संदीप कांबळे, ग्रामस्थ, सुरवडी