शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस घट, पण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 16:27 IST

पाणीपातळीत घट होत असली तरी पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही.

पेट्री : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत असून पाणीपातळी खालावू लागली आहे. सद्य:स्थितीला तलावात साडेसतरा फुटांपर्यंत पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी डिसेंबरच्या अखेरीस अठरा फूट पाणीसाठा शिल्लक होता. परंतु यंदा नोव्हेंबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे सध्या गतवर्षीपेक्षा दीड ते दोन फूट पाणीसाठा अधिक शिल्लक आहे.कास तलावात किनाऱ्यालगत पंचवीस फुटांपर्यंत पाणीसाठा होतो. गतवर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस अठरा फूट पाणीसाठा शिल्लक होता. यंदा आजमितीला सध्या ही पाणी पातळी साडेसतरा फुटांवर आहे. सातारा शहराला होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे दर दोन दिवसांला तलावातील पाणी पातळी एक ते दीड इंचाने कमी होत आहे. 

पाणीसाठा पावसाळ्यांपर्यंत टिकून राहावा, यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. एकूण तीन व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या कास तलावातील पहिला व्हॉल्व्ह गतवर्षी जानेवारी महिन्यात उघडा पडला होता. सद्य:स्थितीला तलावातील पाणीसाठा पाहता फेब्रुवारी महिन्यात तलावाचा पहिला व्हॉल्व्ह उघडा पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.तीन व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा...एकूण तीन व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या कास तलावातील पहिला व्हॉल्व्ह गतवर्षी जानेवारी महिन्यात उघडा पडला होता. साधारण एप्रिल अखेरीस ते मे महिन्याच्या सुरुवातीस दुसरा व्हॉल्व्ह उघडा पडला जातो. दगड अथवा अन्य कोणतीही वस्तू अडकून पाणीपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी पालिकेने सर्वात खालच्या व्हॉल्व्हवर जाळी बसविलेली आहे.

सध्या कास तलावात साडेसतरा फूट पाणीसाठा शिल्लक असून यंदा नोव्हेंबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे गतवर्षीपेक्षा दीड फूट पाणीसाठा जास्त प्रमाणात शिल्लक आहे. तरीदेखील नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा. - जयराम किर्दत, पाटकरी, कास तलाव

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी