शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

सातारा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, शिवसेना ठाकरे गटाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 

By नितीन काळेल | Updated: November 8, 2023 18:49 IST

सातारा : जिल्ह्यात यावर्षी पाऊस कमी पडला आहे. शेती पिकवणे अवघड झाले आहे. अशा सततच्या संकटाने शेतकरी कर्जबाजारी झाला ...

सातारा : जिल्ह्यात यावर्षी पाऊस कमी पडला आहे. शेती पिकवणे अवघड झाले आहे. अशा सततच्या संकटाने शेतकरी कर्जबाजारी झाला असून त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने सातारा जिल्हा त्वरित दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी शिवसेनेच्या (उबाठा) वतीने करण्यात आली आहे. यासाठी पोवाई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाही काढण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.याबाबत शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, राज्य शासनाने राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील वाई आणि खंडाळा या दोन तालुक्यांच्या समावेश आहे. पण, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात यंदा पर्जन्यमान कमी आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातच दुष्काळ जाहीर करावा, अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर पीक विम्याचे पैसे तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेत, शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत जाहीर करावी, सोयाबीनला १० हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळावा. उसाला टनाला चार हजार रुपयांचा दर मिळावा, शेतकऱ्यांना वीज मोफत द्यावी, शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप करुन वसुली थांबवावी. जिल्ह्यात असणाऱ्या धरणातील पाणीसाठा येथीलच लोकांसाठी राखीव ठेवावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या आंदोलनात शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, उपनेत्या छाया शिंदे, जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, हर्षल कदम, संजय भोसले, रामदास कांबळे, हणमंत चवरे, शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शिंदे गटाचे आमदार अपात्र होणार..जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर प्रा. बानुगडे-पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच त्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली. यावेळी प्रा. बानुगडे-पाटील यांनी माराठा आरक्षणासाठी राज्य शासन पावले उचलत आहे. त्यामुळे २४ डिसेंबरपर्यंत समाजाला आरक्षण मिळेल, असा आशावाद व्यक्त केला. तर शिवसेना शिंदे गटाच्या आमदार अपात्रतेवरही त्यांनी भाष्य केले. शिंदे गटाचे आमदार ३१ डिसेंबरपूर्वीच अपात्र ठरतील, असेही स्पष्ट केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेdroughtदुष्काळ