शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Satara: गळीत हंगामात मुकादमांकडून वाहतूकदारांना गंडा; टोळ्यांकडून शेतकऱ्यांची लूट; ५२ कोटींचा फटका

By नितीन काळेल | Updated: April 25, 2023 11:26 IST

कारखानदारांनी जबाबदारी ढकलल्याने वाहनधारकांना हा गंडा

सातारा : साखर कारखान्याच्या गळीत हंगामात ऊसतोड कामगारांसाठी मुकादमांना उचल देऊनही टोळ्या न देता परस्पर पैसे लाटण्याच्या घटना दोन वर्षात वाढल्या असून, जिल्ह्यात अशी १ हजार २०० प्रकरणे समोर आली आहेत. या माध्यमातून मुकादमांनी वाहतूकदारांना सुमारे ५२ कोटींचा गंडा घातलाय. यामुळे वाहनधारकांचे कुटुंब उद्ध्वस्त झालंय तर दुसरीकडे उसाला कोयता लावण्यासाठी टोळ्या लूट करत आहेत.राज्याचा डोलारा कृषी आणि सहकारावर उभा आहे. साखर कारखान्यामुळे तर अनेक कुटुंबांना आधार मिळालाय. या माध्यमातून वर्षातील सहा महिने तरी अनेक कुटुंबांना हक्काचा रोजगार मिळतोय. पण, यामध्येही आता अनिष्ट गोष्टी घडू लागल्या आहेत. शेतकऱ्यांची लूट होत आहे. तसेच मुकादमांकडून वाहनधारकांना फसविण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचा गंडा गरीब वाहनधारकांना बसलाय. सातारा जिल्ह्यात हा आकडा सतत वाढतच चालला आहे.काही वर्षांपूर्वीपर्यंत साखर कारखाने करार करून ऊसतोडणी कामगार आणत असत. यासाठी मुकादम ही व्यवस्था होतीच. यामध्ये मुकादमांना उचल देणे, ने-आणण्याची जबाबदारी कारखाना प्रशासन पाहत होते. पण, गेल्या काही वर्षांत कारखान्यांनी ही जबाबदारी ढकलली आहे. आता कारखाना प्रशासन वाहनधारकांशी करार करते. त्यासाठी कारखान्याकडून वाहनधारकांना रक्कम देण्यात येते. यातून वाहनधारकाने मुकादमाला भेटून ऊस तोडणीसाठी टोळ्यांची जबाबदारी घ्यायची. त्यासाठी टोळ्यांना पैसेही देण्यात येत आहेत.म्हणजे वाहनधारकच पैसे देण्यापासून टोळ्या आणणे-नेण्याची जबाबदारी घेत आहेत. पण, आगाऊ उचल घेऊनही टोळ्या येत नाहीत. तसेच काहीवेळा टोळ्या आल्या तरी काही दिवस काम करतात आणि परत पळून जातात. यामुळे वाहनधारकांनाच याचा फटका बसत आहे. कारण, कारखानदारांनी जबाबदारी ढकलल्याने वाहनधारकांना हा गंडा बसतो.सातारा जिल्ह्यात मागील दोन वर्षात टोळ्यांनी फसविल्याची सुमारे १ हजार २०० प्रकरणे घडली आहेत. या टोळ्यांनी वाहनधारकांना ५२ कोटींचा गंडा घातलाय. यामुळे वाहनधारक रस्त्यावर आले आहेत. कारखान्याशी करार करणारे वाहनधारक हे गरीब व सामान्य कुटुंबातील आहेत. कर्ज घेऊन वाहन खरेदी आणि हप्ते भरून नाकीनऊ आले असताना या टोळ्या व मुकादमांकडून गंडा घातला जात आहे. त्यामुळे या वाहनधारकांचे संसार उघड्यावर आले आहेत. यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विडा उचलला आहे. आता शासन दरबारी यावर काही मार्ग निघणार का, हाच आता प्रश्न आहे.दरम्यान, टोळ्या तसेच मुकादमांकडून वाहनधारकांना गंडा घातला जातो. तसेच ऊसतोड मजूर हे उसाला कोयता लावण्यापूर्वी शेतकऱ्यांकडून पैसे घेतात. एक एकर ऊसतोडीसाठी ५ ते १० हजार रुपये घेतले जातात. यातून शेतकऱ्यांना लुटण्याचाच प्रकार होतो. हे दुष्टचक्र काेणीही थांबवत नाही.टोळीची स्थिती...

  • एक टोळीत ५ ते १० जोड्या असतात. त्यापेक्षाही अधिक असू शकतात.
  • एक टोळी हंगामासाठी ५ ते १० लाख रुपये घेते.
  • टोळीसाठी मुकादमाचा रोल महत्त्वाचा.
  • एक टोळी दिवसाला क्षमतेनुसार अर्धा ते एक एकर क्षेत्रातील ऊसतोडणी करते.
  • कारखान्याच्या क्रशिंग क्षमतेवर टोळ्या ठरतात. साधारणपणे एका कारखान्यासाठी २५० ते ३०० टोळ्या हंगामात लागतात.
टॅग्स :Satara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखानेfraudधोकेबाजीFarmerशेतकरी