शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

Satara: गळीत हंगामात मुकादमांकडून वाहतूकदारांना गंडा; टोळ्यांकडून शेतकऱ्यांची लूट; ५२ कोटींचा फटका

By नितीन काळेल | Updated: April 25, 2023 11:26 IST

कारखानदारांनी जबाबदारी ढकलल्याने वाहनधारकांना हा गंडा

सातारा : साखर कारखान्याच्या गळीत हंगामात ऊसतोड कामगारांसाठी मुकादमांना उचल देऊनही टोळ्या न देता परस्पर पैसे लाटण्याच्या घटना दोन वर्षात वाढल्या असून, जिल्ह्यात अशी १ हजार २०० प्रकरणे समोर आली आहेत. या माध्यमातून मुकादमांनी वाहतूकदारांना सुमारे ५२ कोटींचा गंडा घातलाय. यामुळे वाहनधारकांचे कुटुंब उद्ध्वस्त झालंय तर दुसरीकडे उसाला कोयता लावण्यासाठी टोळ्या लूट करत आहेत.राज्याचा डोलारा कृषी आणि सहकारावर उभा आहे. साखर कारखान्यामुळे तर अनेक कुटुंबांना आधार मिळालाय. या माध्यमातून वर्षातील सहा महिने तरी अनेक कुटुंबांना हक्काचा रोजगार मिळतोय. पण, यामध्येही आता अनिष्ट गोष्टी घडू लागल्या आहेत. शेतकऱ्यांची लूट होत आहे. तसेच मुकादमांकडून वाहनधारकांना फसविण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचा गंडा गरीब वाहनधारकांना बसलाय. सातारा जिल्ह्यात हा आकडा सतत वाढतच चालला आहे.काही वर्षांपूर्वीपर्यंत साखर कारखाने करार करून ऊसतोडणी कामगार आणत असत. यासाठी मुकादम ही व्यवस्था होतीच. यामध्ये मुकादमांना उचल देणे, ने-आणण्याची जबाबदारी कारखाना प्रशासन पाहत होते. पण, गेल्या काही वर्षांत कारखान्यांनी ही जबाबदारी ढकलली आहे. आता कारखाना प्रशासन वाहनधारकांशी करार करते. त्यासाठी कारखान्याकडून वाहनधारकांना रक्कम देण्यात येते. यातून वाहनधारकाने मुकादमाला भेटून ऊस तोडणीसाठी टोळ्यांची जबाबदारी घ्यायची. त्यासाठी टोळ्यांना पैसेही देण्यात येत आहेत.म्हणजे वाहनधारकच पैसे देण्यापासून टोळ्या आणणे-नेण्याची जबाबदारी घेत आहेत. पण, आगाऊ उचल घेऊनही टोळ्या येत नाहीत. तसेच काहीवेळा टोळ्या आल्या तरी काही दिवस काम करतात आणि परत पळून जातात. यामुळे वाहनधारकांनाच याचा फटका बसत आहे. कारण, कारखानदारांनी जबाबदारी ढकलल्याने वाहनधारकांना हा गंडा बसतो.सातारा जिल्ह्यात मागील दोन वर्षात टोळ्यांनी फसविल्याची सुमारे १ हजार २०० प्रकरणे घडली आहेत. या टोळ्यांनी वाहनधारकांना ५२ कोटींचा गंडा घातलाय. यामुळे वाहनधारक रस्त्यावर आले आहेत. कारखान्याशी करार करणारे वाहनधारक हे गरीब व सामान्य कुटुंबातील आहेत. कर्ज घेऊन वाहन खरेदी आणि हप्ते भरून नाकीनऊ आले असताना या टोळ्या व मुकादमांकडून गंडा घातला जात आहे. त्यामुळे या वाहनधारकांचे संसार उघड्यावर आले आहेत. यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विडा उचलला आहे. आता शासन दरबारी यावर काही मार्ग निघणार का, हाच आता प्रश्न आहे.दरम्यान, टोळ्या तसेच मुकादमांकडून वाहनधारकांना गंडा घातला जातो. तसेच ऊसतोड मजूर हे उसाला कोयता लावण्यापूर्वी शेतकऱ्यांकडून पैसे घेतात. एक एकर ऊसतोडीसाठी ५ ते १० हजार रुपये घेतले जातात. यातून शेतकऱ्यांना लुटण्याचाच प्रकार होतो. हे दुष्टचक्र काेणीही थांबवत नाही.टोळीची स्थिती...

  • एक टोळीत ५ ते १० जोड्या असतात. त्यापेक्षाही अधिक असू शकतात.
  • एक टोळी हंगामासाठी ५ ते १० लाख रुपये घेते.
  • टोळीसाठी मुकादमाचा रोल महत्त्वाचा.
  • एक टोळी दिवसाला क्षमतेनुसार अर्धा ते एक एकर क्षेत्रातील ऊसतोडणी करते.
  • कारखान्याच्या क्रशिंग क्षमतेवर टोळ्या ठरतात. साधारणपणे एका कारखान्यासाठी २५० ते ३०० टोळ्या हंगामात लागतात.
टॅग्स :Satara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखानेfraudधोकेबाजीFarmerशेतकरी