शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

जिल्ह्यात ४९० कोटींची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 11:53 PM

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत २ लाख ५० हजार शेतकºयांना अंदाजे ४९० कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. दि. २ व ३ आॅक्टोबर रोजी १ हजार १९० गावांमध्ये कर्जमाफी याद्यांचेचावडी वाचन करण्यात आलेले आहे,’ अशी माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेतदिली.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत २ लाख ५० हजार शेतकºयांना अंदाजे ४९० कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. दि. २ व ३ आॅक्टोबर रोजी १ हजार १९० गावांमध्ये कर्जमाफी याद्यांचेचावडी वाचन करण्यात आलेले आहे,’ अशी माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेतदिली.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ शेतकरी कर्जमुक्ती प्रमाणपत्राचे वितरण बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजनभवनात पालकमंत्री शिवतारे यांच्या हस्ते जिल्ह्यातील २२ शेतकºयांना करण्यात आले. यानंतरआयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.याप्रसंगी सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलासशिंदे, निवासी उपजिल्हाधिकारीभारत वाघमारे, जिल्हा उपनिबंधक महेश कदम, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचेराजेंद्र सरकाळे आदी यावेळी उपस्थित होते.या कर्जमाफीमुळे शेतकºयांचे जीवनमान उंचविण्यास मदत होईल, असे सांगून पालकमंत्री शिवतारे म्हणाले, ‘राज्यभरातून ५६ लाख ५९ हजार शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले हाते. आॅनलाईन अर्ज भरल्यामुळे सर्वसामान्य शेतकºयालाही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. केंद्र व राज्य शासन शेतकºयांसाठी विविध योजना राबवत आहे.या योजनांमधून शेतºयांचे जीवनमान उंचविण्यास मदत होत आहे. शासनाने कर्जमाफी देण्यासाठी ३ वर्षे अभ्यास केला व योग्य वेळी कर्जमाफी दिली त्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांचे विशेष कौतुक करतो.आॅनलाईन अर्ज भरलेल्या शेतकºयांची यादी पोर्टलवरही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. शेतकºयांना सक्षम करण्यासाठी व त्यांना शाश्वत पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे.या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ सर्वसामान्य शेतकºयांना झाला आहे. तसेच दुष्काळी भागातही टँकरची संख्या कमी झालेली आहे. भविष्यकाळात या कर्जमाफीचे परिणाम दिसून येणार असून, शेततकºयांचे जीवनमान उंचविण्यास मदत होईल, असा विश्वासही पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.पालकमंत्र्यांकडून काढता पाय...!गेल्या चार महिन्यांपासून यवतेश्वर ते कास रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत आक्रमक झालेल्या पालकमंत्र्यांना यवतेश्वर-कास परिसरातील एकाही बांधकामावर कारवाई झाली नाही. कारवाई होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता पालकमंत्री विजय शिवतारे यांनी चक्क ‘मला कास अतिक्रमण प्रश्नावर बोलायचे नाही,’ असे म्हणत पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला.