शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
4
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
5
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
6
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
7
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोड्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
8
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
9
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
10
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
11
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
12
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
13
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
15
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
16
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
17
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
18
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
19
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
20
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन हजार रिक्षांचं ‘डेथ वॉरंट’ !: परमिट रिक्षा जाणार भंगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 00:09 IST

संजय पाटील । कºहाड : प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या सोळा वर्षांपूर्वीच्या तब्बल साडेतीन हजार अ‍ॅटो आणि वडाप रिक्षा आता ...

ठळक मुद्देकार्यवाही सुरू; योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण रोखले; ४७ टॅक्सींचाही समावेश

संजय पाटील ।

कºहाड : प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या सोळा वर्षांपूर्वीच्या तब्बल साडेतीन हजार अ‍ॅटो आणि वडाप रिक्षा आता भंगारात जाणार आहेत. संबंधित रिक्षांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण रोखण्याचे आदेश देण्यात आले असून, जिल्हा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणानेही त्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला आहे. त्यामुळे संबंधित रिक्षा आता रस्त्यावर आणताच येणार नाहीत. रिक्षाबरोबरच जिल्ह्यातील ४७ टॅक्सींनाही हा नियम लागू करण्यात आला आहे.

मोटर वाहन कायद्यानुसार वाहनांचे आयुर्मान ठरविण्याचे अधिकार केंद्र शासनाकडे आहेत. तसेच कंत्राटी परवान्यावरील वाहने ही प्रवाशांना आरामदायी सेवा देणारी असावीत, अशी तरतूदही या कायद्यामध्ये आहे. मात्र, अनेकवेळा खिळखिळ्या झालेल्या वाहनांतून प्रवाशांची वाहतूक केली जाते. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो. तसेच प्रवाशांनाही योग्य सेवा मिळत नाही. परिणामी, राज्य परिवहन प्राधिकरणाने २९ एप्रिल २०१३ रोजी बैठक घेऊन त्यामध्ये सोळा वर्षांपूर्वीच्या परमिट रिक्षा आणि वीस वर्षांपूर्वीच्या परमिट टॅक्सी परवान्यावरून उतरवण्याचा निर्णय घेतला. मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातच त्यावेळी हा नियम लागू करण्यात आला. त्यानुसार कार्यवाही झाली आणि हजारो रिक्षा, टॅक्सी रस्त्यावरून बाजूला गेल्या.

दरम्यान, पाच वर्षांपूर्वी मुंबईसाठी घेण्यात आलेला हा निर्णय राज्यभर लागू करण्याबाबतच्या सूचना १९ डिसेंबर २०१८ रोजी परिवहन आयुक्तांनी राज्यभरातील परिवहन कार्यालयांना दिल्या. त्यानुसार पत्रव्यवहारही झाला. सातारा जिल्ह्यात सातारा आणि कºहाड या दोन्ही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना याबाबतचे पत्र त्याचदिवशी मिळाले. परिवहन आयुक्तांच्या या सूचनेनंतर सातारा आणि कºहाड या दोन्ही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परमिटच्या अ‍ॅटोरिक्षा, वडाप रिक्षा आणि जीपची पुनर्नोंदणी थांबविण्यात आली. तसेच जिल्हा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची परिचलन पद्धतीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत मूळ नोंदणीच्या दिनांकापासून मीटर टॅक्सी २० वर्षांनंतर व अ‍ॅटो आणि वडाप रिक्षा सोळा वर्षांनंतर परवान्यावरून उतरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मूळ नोंदणीच्या दिनांकापासून सोळा वर्षे पूर्ण झालेल्या जिल्ह्यातील रिक्षांचे योग्यता प्रमाणपत्र आरटीओकडून नूतनीकरण करून दिले जाणार नाही. परिणामी, संबंधित मालकाला त्याची रिक्षा रस्त्यावर आणता येणार नाही.परमिट वाहनाची दरवर्षी तपासणीप्रवासी वाहतूक परवाना असलेल्या अ‍ॅटो रिक्षा, वडाप रिक्षा तसेच इतर सर्व वाहनांची योग्यता प्रमाणपत्र तपासणी दरवर्षी केली जाते. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वत:ही तपासणी करतात. यांत्रिकी आणि बांधणीमध्ये वाहन सुस्थितीत असेल तरच संबंधित वाहनाला पुढील एक वर्षासाठी योग्यता प्रमाणपत्र दिले जाते. आजपर्यंत वर्षानुवर्षे वडापवाले आपल्या वाहनाचे अशाच पद्धतीने ‘परमिट रिन्युअल’ करून घेत आलेत. मात्र, आता संबंधित वाहनालाच कालमर्यादा ठरविण्यात आली आहे.प्रादेशिक परिवहन प्राधिकरण१) श्वेता सिंघल - अध्यक्षाजिल्हाधिकारी, सातारा२) पंकज देशमुख - सदस्यपोलीस अधीक्षक, सातारा३) संजय धायगुडे - सदस्य सचिवपरिवहन अधिकारी, सातारा४) अजित शिंदे - सदस्यपरिवहन अधिकारी, कºहाडनिर्णय कशासाठी..?१ प्रवासी वाहतूक वाहनाची कार्यक्षमता वयोमर्यादेनुसार कमी होते२ अशी वाहने प्रवाशांसाठी आरामदायी असू शकत नाहीत३ प्रवास करणाºया प्रवाशांना वाहनात सुरक्षित वाटत नाही४ यांत्रिकी आणि बांधणी अकार्यक्षम झाल्याने अपघात होऊ शकतो५ जुन्या यांत्रिकी रचनेमुळे वायू प्रदूषणास ही वाहने कारणीभूत ठरतात५ जुन्या बांधनीमुळे वाहन चालविताना चालकावर ताण येतो 

मूळ नोंदणीच्या दिनांकापासून सोळा वर्षे पूर्ण झालेल्या रिक्षा, तसेच वीस वर्षे पूर्ण झालेल्या टॅक्सीच्या मालकांनी संबंधित वाहनावरील परमिट तत्काळ उतरून घ्यावे. तसेच त्या वाहनाची नोंदणीही रद्द करून घ्यावी. जुनेच परमिट नवीन वाहन किंवा ठरवून दिलेल्या कालमर्यादेतील अन्य वाहनावर नोंदवून घ्यावे.- अजित शिंदे,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कºहाड

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसtraffic policeवाहतूक पोलीस