मृत रुग्णांचे ‘डेथ आॅडिट’ मस्ट
By Admin | Updated: August 25, 2015 23:03 IST2015-08-25T23:03:32+5:302015-08-25T23:03:32+5:30
मागील वर्षी ५०० ते ६०० मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाल्याचे म्हणले जात होते, पण ते सगळेच त्यामुळे झाले नसल्याचे नंतर लक्षात आले. यासारखे गैरसमज दूर करण्यासाठी दर

मृत रुग्णांचे ‘डेथ आॅडिट’ मस्ट
सातारा : शहरातील तळी स्वच्छ करण्यासाठी पालिकेने मोठा खर्च केला असल्याने नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निवडून निसर्गाचा समतोल राखण्यास मदत करावी, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले. तसेच कऱ्हाड प्रमाणेच साताऱ्यातही डॉल्बीवाल्यांवर कारवाई केली जाईल, असे सूतोवाच अधिकाऱ्यांनी बैठकीत केले.
येथील पोलीस करमणूक केंद्रातील अलंकार हॉलमध्ये गणेशोत्सव मंडळ आणि नागरिकांची बैठक पोलीस प्रशासनाने आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रांतधिकारी मल्लिकार्जुन माने, नगराध्यक्ष सचिन सारस, उपनगराध्यक्षा दिपाली गोडसे, उपविभागीय अधिकारी खंडेरावर धरणे, पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे आदी अधिकारी व शहरातील विविध गणेशमंडळाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.डॉ. हमीद म्हणाले, पालिकेले विसर्जनासाठी हौद उपलब्ध करावेत. निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वयंसेवकांची नोंदणी करावी. सार्वजनिक मंडळांनी व्यसनांशी संबंधित जाहिराती स्वीकारू नयेत. तसेच डॉल्बीसारख्या घातक ध्ननीव्यवस्थेला फाटा द्यावा.उपविभागीय अधिकारी धरणे म्हणाले, गणेशमंडळांना सर्व परवाने काढता यावेत, यासाठी एक खिडकी योजना लवकरच सुरू करू. यंदाचा गणेशोत्सव गुलालमुक्त मिरवणुकीने साजरा करावा. आपआपल्या मंडळांनी स्वयंसेवक नेमावेत. रात्री बारावाजेपर्यंत देखाव्यांना परवानगी द्यायची की नाही, याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. मिरवणुकीमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून जास्तीत जास्त वैद्यकीय पथकांची नेमणूक केली जाणार आहे. तसेच ब्रेथ अनालायझर मशीनहीची संख्याही वाढविणार. मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या वाहनांची उपप्रादेशीक परिवहन कार्यायाकडून तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही धरणे
यांनी केले. दरम्यान बैठकीपूर्वी नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच प्रशासनाकडून विविध परवानगी घेताना अडचणी येत असल्याच्या तक्रारीही नागरिकांनी मांडल्या. प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने, उपनगराध्यक्ष दिपाली गोडसे, नगराध्यक्ष सचिन सारस, श्रीगणेश कानगुडे आदींची यावेळी भाषणे झाली. (प्रतिनिधी)
पुन्हा बैठक --गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक मंगळवारी प्रशासनाने बोलवली असली तरी या बैठकीत केवळ सूचनाच मांडण्यात आल्या. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा बैठक बोलविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.