शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
4
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
5
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
6
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
7
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
8
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
9
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
10
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
11
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
12
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
13
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
14
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
15
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
16
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
17
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

राज्यातील गावांचा अंधार आता दूर होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 16:49 IST

Mahavitran Satara : ग्रामपंचायत हद्दीमधील सार्वजनिक वीज पुरवठा थकित वीज बिलापोटी तोडला होता, तो पूर्ववत जोडण्यात यावा, असे आदेश राज्य शासनाच्यावतीने विभागाला देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देवीज जोडण्या पूर्ववत करण्याच्या सूचनासरपंच परिषदेच्या पाठपुराव्यामुळे प्रश्न मार्गी

सातारा : ग्रामपंचायत हद्दीमधील सार्वजनिक वीज पुरवठा थकित वीज बिलापोटी तोडला होता, तो पूर्ववत जोडण्यात यावा, असे आदेश राज्य शासनाच्यावतीने विभागाला देण्यात आले आहेत.

दरम्यान ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक रस्त्यांवरील बिल बिल भरणे शक्य नसल्याचा मुद्दा सरपंच परिषदेत मांडला त्याबाबत नेमके धोरण ठरविण्या संदर्भात तज्ञांची समिती नेमण्यात आली असून १५ ऑगस्ट पूर्वी ही समिती सरकारला अहवाल सादर करणार आहे.सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या वतीने मंगळवारी (दि.२०) मंत्रालय येथे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, उर्जा मंत्री नितीन राऊत, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमवेत संयुक्त बैठक घेण्यात आली.

या बैठकीमध्ये ग्रांपंचायतीच्या समस्या बाबत प्रदीर्घ व सकारात्मक चर्चा झाली. तसेच स्ट्रीट लाईटची तोडलेली कनेक्शन व पाणीपुरवठा कनेक्शन जोडण्याचा निर्णय व सबंधित विभागाला तात्काळ आदेश देण्यात आला आहे. यामुळे सरपंच परिषदेच्या राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला भरीव यश मिळाले असून सरपंच वर्गामध्ये कमालीचा आनंद पसरला आहे.सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, प्रदेश सरचिटणीस ऍड. विकास जाधव सर्व राज्य पदाधिकारी विश्वस्त यांच्या वतीने सातारा जिल्हा सरपंच परिषदेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र चे शिष्टमंडळ मंत्र्यांना भेटले.

या शिष्टमंडळात सरपंच परिषदेचे राज्य विश्वस्त व सातारा कार्याध्यक्ष आनंदराव जाधव, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष समाधान पोफळे, पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय शेलार सातारा जिल्हा उपाध्यक्ष अरुण कापसे, जिल्हा सचिव शत्रुघ्न धनवडे व इतरही पदाधिकारी उपस्थित होते.मागील काही महिन्यापासून विदयुत विभागाने राज्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या सार्वजनीक स्ट्रीट लाईट व पाणी पुरवठा करणाऱ्या विदयुत पंपाचे कनेक्शन तोडले होते. यामुळे सरपंच परिषद मुंबई राज्यात आक्रमक झाली होती. त्या आनुशंगाने सरपंच परिषदेने राज्यात रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शने सुरू केली होती. तसेच या निर्णयामुळे भर पावसाच्या दिवसात अनेक ग्रामपंचायती व लाखो लोक अंधारात होती.

यामुळे राज्य शासनावर मोठ्या प्रमाणात गावकर्यांचा व सरपंच परिषदेचा रोष होता; परंतु आजच्या या बैठकीत महाराष्ट्रातील स्ट्रीट लाईट चालू करणेबाबत सकारात्मक चर्चा झाली तसेच स्ट्रीट लाईटची तोडलेली कनेक्शन व पाणीपुरवठा कनेक्शन जोडण्याचा निर्णय व आदेश देण्यात आला आहे.

पुन्हा अनेक गावात वीज पुर्ववत होऊन मोठी समस्या मिटणार आहे. तसेच या पुढे देखील राज्य सरकार सरपंच परिषद व सरपंचाच्या हितासाठी कटीबद्ध व सकारात्मक असे आश्वासन दिले आहे. याबद्दल मी सरपंच परिषदेच्या वतीने सर्वांचे आभार मानतो.- नितीन पाटील,जिल्हा अध्यक्ष,सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र), सातारा.

महाराष्ट्रातील एकूण बिलाची होणार तपासणीमहाराष्ट्रातील सर्वच ग्रामपंचायतींची या बिलाबाबत तक्रार आहे. विज बिल भरून देखील दंड आकारला गेल्याचा ग्रामविकास विभागाचा आरोप आहे. या सर्व बिलांची चौकशी करण्यासाठी वेगळी समिती देखील नेमण्यात आलेली आहे. 

 

टॅग्स :sarpanchसरपंचSatara areaसातारा परिसरAjit Pawarअजित पवार