शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक इमारत कोसळली !

By admin | Updated: April 19, 2017 23:02 IST

कऱ्हाडात घटना : पालिका प्रशासनाने दिल्या होत्या संबंधितांना नोटिसा; शहरात ४८ धोकादायक इमारती

कऱ्हाड : सुमारे साठ वर्षांपूर्वी माती आणि विटांच्या साह्याने बांधण्यात आलेली जुनी इमारत पत्यांच्या पानाच्या बंगल्याप्रमाणे ढासळल्याची घटना बुधवारी सकाळी साडेसात वाजता घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेने पुन्हा एकदा शहरातील धोकादायक इमारतींचा विषय निर्माण झाला आहे.शहरात आझाद चौक येथे अधिक शामराव सूर्यवंशी यांची सुमारे साठ वर्षांपूर्वीची विटा आणि माती, पत्र्यांच्या साह्याने दुमजली इमारत ही त्यांनी गजानन हणमंत देशचौगुले व उल्हास हणमंत देशचौगुले यांना मेडिकल शॉपीसाठी दोन वर्षांपूर्वी दिली होती. ही इमारत बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोसळली. विशेष म्हणजे इमारत खाली करण्यास तसेच ती पाडण्याबाबत पालिकेच्या वतीने देशचौगुले यांना १० मे रोजीच नोटीस देण्यात आली होती.शहरात आझाद चौकात बुधवारी कोसळलेल्या इमारतीमध्ये एक मेडिकलही होते. या मेडिकलमधील साहित्याचेही नुकसान झाले. या इमारतीमधील दुकानाचे १९४७ मध्ये उद्घाटन करण्यात आले होते. माती आणि विटांच्या साह्याने बांधण्यात आलेली इमारत कोसळल्याने इमारत मालक व त्यातील दुकानमालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शहरातील या इमारत मालकाप्रमाणे इतर ४८ धोकादायक इमारत मालकांनाही पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, त्यांच्यापैकी अद्याप कोणीच इमारत खाली केलेली नाही अथवा पाडलेली नाही.आझाद चौक हा शहरातील मुख्य बाजारपेठेतील चौक असल्यामुळे या चौकात जुन्या पद्धतीच्या अनेक इमारती आहेत. मात्र, त्याची किरकोळ डागडुजी करण्याचे काम संबंधित इमारत मालकांकडून केले जाते. सध्या या ठिकाणी असणाऱ्या अनेक जुन्या इमारती या धोकादायक स्थितीत असून, त्या पावसाळ्यापूर्वी पाडण्यात याव्यात अन्यथा जीवितहानी होईल, अशा आशयाच्या नोटिसाही पालिकेच्या वतीने वर्षानुवर्षे इमारत मालकांना दिल्या जातात. मात्र, त्याकडे फारसे कोणी लक्ष देताना दिसत नाही. (प्रतिनिधी)पहिल्यांदा कारवाईनंतर दुर्लक्ष शहरात एखादी धोकादायक इमारत कोसळल्यानंतर इतर धोकादायक इमारतींवर पालिकेच्या वतीने कारवाई केली जाते. मात्र, त्यात सातत्य ठेवले जात नाही. धोकादायक इमारतींप्रमाणे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करीत कारवाईचा दिखावा केला जातो. मात्र, आठ दिवस झाले की, नंतर ही कारवाई बंद केली जाते. पहिल्यांदा कारवाईचा दिखावा आणि नंतर कायमचे दुर्लक्ष हे काम पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून नियमित केले जात असल्याचे नागरिकच सांगतात.