शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक इमारत कोसळली !

By admin | Updated: April 19, 2017 23:02 IST

कऱ्हाडात घटना : पालिका प्रशासनाने दिल्या होत्या संबंधितांना नोटिसा; शहरात ४८ धोकादायक इमारती

कऱ्हाड : सुमारे साठ वर्षांपूर्वी माती आणि विटांच्या साह्याने बांधण्यात आलेली जुनी इमारत पत्यांच्या पानाच्या बंगल्याप्रमाणे ढासळल्याची घटना बुधवारी सकाळी साडेसात वाजता घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेने पुन्हा एकदा शहरातील धोकादायक इमारतींचा विषय निर्माण झाला आहे.शहरात आझाद चौक येथे अधिक शामराव सूर्यवंशी यांची सुमारे साठ वर्षांपूर्वीची विटा आणि माती, पत्र्यांच्या साह्याने दुमजली इमारत ही त्यांनी गजानन हणमंत देशचौगुले व उल्हास हणमंत देशचौगुले यांना मेडिकल शॉपीसाठी दोन वर्षांपूर्वी दिली होती. ही इमारत बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोसळली. विशेष म्हणजे इमारत खाली करण्यास तसेच ती पाडण्याबाबत पालिकेच्या वतीने देशचौगुले यांना १० मे रोजीच नोटीस देण्यात आली होती.शहरात आझाद चौकात बुधवारी कोसळलेल्या इमारतीमध्ये एक मेडिकलही होते. या मेडिकलमधील साहित्याचेही नुकसान झाले. या इमारतीमधील दुकानाचे १९४७ मध्ये उद्घाटन करण्यात आले होते. माती आणि विटांच्या साह्याने बांधण्यात आलेली इमारत कोसळल्याने इमारत मालक व त्यातील दुकानमालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शहरातील या इमारत मालकाप्रमाणे इतर ४८ धोकादायक इमारत मालकांनाही पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, त्यांच्यापैकी अद्याप कोणीच इमारत खाली केलेली नाही अथवा पाडलेली नाही.आझाद चौक हा शहरातील मुख्य बाजारपेठेतील चौक असल्यामुळे या चौकात जुन्या पद्धतीच्या अनेक इमारती आहेत. मात्र, त्याची किरकोळ डागडुजी करण्याचे काम संबंधित इमारत मालकांकडून केले जाते. सध्या या ठिकाणी असणाऱ्या अनेक जुन्या इमारती या धोकादायक स्थितीत असून, त्या पावसाळ्यापूर्वी पाडण्यात याव्यात अन्यथा जीवितहानी होईल, अशा आशयाच्या नोटिसाही पालिकेच्या वतीने वर्षानुवर्षे इमारत मालकांना दिल्या जातात. मात्र, त्याकडे फारसे कोणी लक्ष देताना दिसत नाही. (प्रतिनिधी)पहिल्यांदा कारवाईनंतर दुर्लक्ष शहरात एखादी धोकादायक इमारत कोसळल्यानंतर इतर धोकादायक इमारतींवर पालिकेच्या वतीने कारवाई केली जाते. मात्र, त्यात सातत्य ठेवले जात नाही. धोकादायक इमारतींप्रमाणे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करीत कारवाईचा दिखावा केला जातो. मात्र, आठ दिवस झाले की, नंतर ही कारवाई बंद केली जाते. पहिल्यांदा कारवाईचा दिखावा आणि नंतर कायमचे दुर्लक्ष हे काम पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून नियमित केले जात असल्याचे नागरिकच सांगतात.