शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
3
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
4
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
5
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
6
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
7
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
8
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
9
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
10
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
11
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
12
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
13
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
14
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
15
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
16
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
17
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
18
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
20
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त

धोकादायक इमारत कोसळली !

By admin | Updated: April 19, 2017 23:02 IST

कऱ्हाडात घटना : पालिका प्रशासनाने दिल्या होत्या संबंधितांना नोटिसा; शहरात ४८ धोकादायक इमारती

कऱ्हाड : सुमारे साठ वर्षांपूर्वी माती आणि विटांच्या साह्याने बांधण्यात आलेली जुनी इमारत पत्यांच्या पानाच्या बंगल्याप्रमाणे ढासळल्याची घटना बुधवारी सकाळी साडेसात वाजता घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेने पुन्हा एकदा शहरातील धोकादायक इमारतींचा विषय निर्माण झाला आहे.शहरात आझाद चौक येथे अधिक शामराव सूर्यवंशी यांची सुमारे साठ वर्षांपूर्वीची विटा आणि माती, पत्र्यांच्या साह्याने दुमजली इमारत ही त्यांनी गजानन हणमंत देशचौगुले व उल्हास हणमंत देशचौगुले यांना मेडिकल शॉपीसाठी दोन वर्षांपूर्वी दिली होती. ही इमारत बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोसळली. विशेष म्हणजे इमारत खाली करण्यास तसेच ती पाडण्याबाबत पालिकेच्या वतीने देशचौगुले यांना १० मे रोजीच नोटीस देण्यात आली होती.शहरात आझाद चौकात बुधवारी कोसळलेल्या इमारतीमध्ये एक मेडिकलही होते. या मेडिकलमधील साहित्याचेही नुकसान झाले. या इमारतीमधील दुकानाचे १९४७ मध्ये उद्घाटन करण्यात आले होते. माती आणि विटांच्या साह्याने बांधण्यात आलेली इमारत कोसळल्याने इमारत मालक व त्यातील दुकानमालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शहरातील या इमारत मालकाप्रमाणे इतर ४८ धोकादायक इमारत मालकांनाही पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, त्यांच्यापैकी अद्याप कोणीच इमारत खाली केलेली नाही अथवा पाडलेली नाही.आझाद चौक हा शहरातील मुख्य बाजारपेठेतील चौक असल्यामुळे या चौकात जुन्या पद्धतीच्या अनेक इमारती आहेत. मात्र, त्याची किरकोळ डागडुजी करण्याचे काम संबंधित इमारत मालकांकडून केले जाते. सध्या या ठिकाणी असणाऱ्या अनेक जुन्या इमारती या धोकादायक स्थितीत असून, त्या पावसाळ्यापूर्वी पाडण्यात याव्यात अन्यथा जीवितहानी होईल, अशा आशयाच्या नोटिसाही पालिकेच्या वतीने वर्षानुवर्षे इमारत मालकांना दिल्या जातात. मात्र, त्याकडे फारसे कोणी लक्ष देताना दिसत नाही. (प्रतिनिधी)पहिल्यांदा कारवाईनंतर दुर्लक्ष शहरात एखादी धोकादायक इमारत कोसळल्यानंतर इतर धोकादायक इमारतींवर पालिकेच्या वतीने कारवाई केली जाते. मात्र, त्यात सातत्य ठेवले जात नाही. धोकादायक इमारतींप्रमाणे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करीत कारवाईचा दिखावा केला जातो. मात्र, आठ दिवस झाले की, नंतर ही कारवाई बंद केली जाते. पहिल्यांदा कारवाईचा दिखावा आणि नंतर कायमचे दुर्लक्ष हे काम पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून नियमित केले जात असल्याचे नागरिकच सांगतात.