शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

मायणी परिसरामध्ये बंधाऱ्यांमुळे पाणीसाठा टिकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:38 IST

मायणी : मायणी परिसरामध्ये विविध गावांमध्ये यावर्षी उन्हाळ्यात सिमेंट साखळी बंधाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा टिकून आहे. वर्षभर सिमेंट बंधाऱ्यांमध्ये ...

मायणी : मायणी परिसरामध्ये विविध गावांमध्ये यावर्षी उन्हाळ्यात सिमेंट साखळी बंधाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा टिकून आहे. वर्षभर सिमेंट बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा शिल्लक राहिल्याने भूगर्भातील पाणी पातळी वाढली असल्याने किमान यावर्षी तरी परिसरातील नागरिकांना पाणीटंचाई जाणवणार नाही. अजूनही साखळी बंधारे होणे गरजेचे आहे.

प्रतिवर्षी मायणी परिसरातील अनफळे, कानकात्रे, विखळे, कलेढोण, पाचवड, मुळकवाडी, तरसवाडी, ढोकळवाडी, कान्हरवाडी, हिवरवाडी, कानकात्रे (विठ्ठलनगर) या गावांसह परिसरातील वाड्या-वस्त्यांमध्ये जानेवारी-फेब्रुवारी महिना सुरू झाला की, पाणीटंचाईचा प्रश्‍न निर्माण होत असतो. परिसरातील विहिरी ओढे-नाले पूर्ण कोरडे पडत असतात; यामुळे परिसरातील नागरिकांच्या, तसेच पशु व जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी शासनाकडे टँकरची मागणी करावी लागते.

२०१९ च्या सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे व गतवर्षी जुलै, ऑगस्ट या पावसाळी वातावरणाच्या काळामध्ये परिसरात चांगला पाऊस झाला तसेच गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकसहभाग, शासनाच्या मदतीतून व खासगी संस्थांच्या सहकार्यातून मातीबांध, नालाबांध, पाझर तलाव, तसेच ओढ्यांवर व नाल्यांवर साखळी सिमेंट बंधाऱ्यांची कामे मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे व अवकाळी पाऊस व गतवर्षी जुलै ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत झालेल्या पावसामुळे बंधाऱ्यात या दोन्हीवेळी झालेल्या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साठले.

तसेच जलसंधारण पाणलोट व विविध खासगी संस्थांच्या मदतीने झालेल्या या कामांमध्ये पाणी साठल्याने जमिनीत चांगल्या प्रकारे पाणी मुरल्यामुळे भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे आज मार्च महिना संपत आला तरीही मायणी परिसरातील कोणत्याही गावाने पिण्याच्या व जनावरांच्या पाण्यासाठी शासनाकडे टँकरची मागणी केलेली नाही. शिवाय आज मार्चअखेरही परिसरातील अनेक सिमेंट बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा आहे. या पाणीसाठ्यामुळे जमिनीतील पाणी पातळी अजूनही टिकून आहे.

(चौकट)

शासन प्रतिवर्षी दुष्काळी पट्ट्यातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर उपलब्ध करते. मात्र, यावर्षी टँकरची गरज भासणार नाही. त्यामुळे टँकरवर होणाऱ्या खर्चाचे पैसे जलसंधारण व पाणलोटच्या कामासाठी खर्च करणे गरजेचे आहे.

चौकट-

मायणी ब्रिटिशकालीन तलावापासून असलेल्या चांद नदीवर सहा ते सात ठिकाणी सिमेंट बंधारे झाले आहेत. या सिमेंट बंधाऱ्यांमध्ये अजूनही पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे याच नदीवर अजून शक्य आहे त्या ठिकाणी व लोकांच्या मागणीनुसार बंधारे बांधले, तर पावसाळ्यातील पाणी यामध्ये शिल्लक राहील व दुष्काळी पट्ट्यातील या गावाला टँकरची गरज भासणार नाही.

- सचिन देशमुख,

सामाजिक कार्यकर्ते

मायणी (ता. खटाव) येथील चांद नदीपात्रात सिमेंट बंधारे बांधल्यामुळे या बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा टिकून आहे. (छाया : संदीप कुंभार)