शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

माण तालुक्यात वळवाने आंबा, द्राक्ष बागांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 17:15 IST

अजून दोन दिवस वळीव पावसाचे संकट असण्याची शक्यता आहे. यामुळे आंबा, द्राक्ष बागायतदारांची चिंता वाढली.

म्हसवड : माण तालुक्यातील पळसावडे, देवापूर, शिरताव, वरकुटे-मलवडी परिसराला काल, रविवारी रात्री दहाच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळ व गारपिटीसह मुसळधार वळीव पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे तालुक्यातील दोघा शेतकऱ्यांचे द्राक्ष आणि आंब्याच्या बागेचे मोठे नुकसान झाले आहे.या वादळात पळसावडे येथील द्राक्ष बागायतदार कुंडलिक यादव यांची पावणे दोन एकर द्राक्ष बाग भुईसपाट झाली तर देवापूर येथील आंबा बागायतदार कृष्णराव रघुनाथ बाबर यांची एक एकर आंब्याची बाग भुईसपाट झाली आहे. कृष्णराव बाबर यांच्या आंब्याच्या बागेला दोनच दिवसांपूर्वी व्यापारी भेट देऊन गेले होते. १४० रुपये दराने संपूर्ण बाग ठरविण्यात आली होती. आठ ते दहा दिवसांत बाग उतरायची होती. अंदाजे १२ ते १३ टन माल अपेक्षित होता.

मात्र वळवामुळे बाबर यांचे १४ ते १५ लाखांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या पावसाने परिसरातील आंबा, द्राक्ष, नारळ बागांसह दोडका, कारले, टोमॅटो या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आंबा, द्राक्ष, नारळाचे नुकसान झाल्याची कृषी विभागाने पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. अजून दोन दिवस वळीव पावसाचे संकट असण्याची शक्यता आहे. यामुळे आंबा, द्राक्ष बागायतदारांची चिंता वाढली आहे. पुढील दोन चार दिवसांत पाऊस वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

कर्जमाफीच्या आनंदावर पाणी..सध्या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झाल्यामुळे आनंदाचे वातावरण आहे. अशातच रविवारी देवापूर, पळसावडे भागात वादळी वाऱ्यासह वळवाच्या पावसामुळे शेती पिकांचे, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या आनंदावर पावसाने पाणी फिरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे. हातातोंडाशी आलेली फळपिके हिरावली गेलीच आहेत. शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस