शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दहिवडी आगाराचे ढिसाळ नियोजन, एसटी बस वेळेत न सुटल्याने विद्यार्थ्यांची अंधारातून पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 12:45 IST

दहिवडी आगारातून सायंकाळी साडेपाच वाजता सुटणारी दहिवडी-पळशी एसटी आगाराच्या ढिसाळ नियोजनामुळे वेळेत सुटत नाही. त्यामुळे ही बस पळशी गावात सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास पोहोचत आहे. बस वेळेवर येत नसल्याने मुलींच्या पालकांच्या जीवाला घोर लागत असून, एसटी वेळेत सोडण्याची मागणी पालक व ग्रामस्थांतून होत आहे.

ठळक मुद्देपालकांची वाढली चिंता दहिवडी आगाराच्या नियोजनाबाबत नाराजी

पळशी (सातारा) : दहिवडी आगारातून सायंकाळी साडेपाच वाजता सुटणारी दहिवडी-पळशी एसटी आगाराच्या ढिसाळ नियोजनामुळे वेळेत सुटत नाही. त्यामुळे ही बस पळशी गावात सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास पोहोचत आहे. बस वेळेवर येत नसल्याने मुलींच्या पालकांच्या जीवाला घोर लागत असून, एसटी वेळेत सोडण्याची मागणी पालक व ग्रामस्थांतून होत आहे.पळशी तसेच वाड्यावस्त्यांवरून दहिवडी येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी जातात. गोंदवले, लोधवडे, पळशी येथील विद्यार्थ्यांच्या सततच्या होणा ऱ्यां वादावादीमुळे दहिवडी-पळशी एसटीची वेळ काही महिन्यांपूर्वी एक तास वाढवून सायंकाळी साडेपाच अशी करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिवहन विभागाकडून उपाययोजना करण्यात आली असली तरी दुसरीकडे मात्र बस वेळेवर सोडली जात नसल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

सायंकाळी साडेपाच अशी वेळ असताना दहिवडी-पळशी बस कधी सहा तर कधी साडेसहा वाजता बसस्थानकातून मार्गस्थ होते. गावात बस उशिरा पोहोचल्याने पळशीसह वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या मुला-मुलींना अंधारात वाट शोधत घरी जावे लागत आहे. आगार प्रमुखांनी विद्यार्थ्यांना येणाºया अडचणींची गांभीर्याने दखल घेऊन दहिवडी-पळशी बस वेळेत सोडावी, अशी मागणी होत आहे.

 

दहिवडी-पळशी एसटी गावात वेळेत पोहोचत नाही. विद्यार्थ्यांना घरी अंधारतच चालत जावे लागत आहे. एसटी वेळेत सोडण्याबाबत आगार प्रमुखांना वेळोवेळी फोन केले आहेत. मात्र, अद्याप दखल घेतली नसून परिवहन मंत्र्यांना भेटून निवेदन देणार आहे.- विष्णू खाडेतालुका उपाध्यक्ष, भाजप 

साडेपाचची वेळ असलेली एसटी कधी सहा तर कधी साडेसहाला सुटत असते. त्यामुळे गावात येईपर्यंत पूर्ण अंधार झालेला असतो. बस वेळेत सोडली तर आम्ही लवकर घरी पोहोचू .- विशाल नाकाडेविद्यार्थी, पळशी

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळSatara areaसातारा परिसर