शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

तौक्ते चक्रीवादळामुळे २९२ शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात १५ दिवसांपूर्वी झालेल्या तौक्ते चक्रीवादळातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून यामध्ये २९२ शेतकऱ्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात १५ दिवसांपूर्वी झालेल्या तौक्ते चक्रीवादळातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून यामध्ये २९२ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तर नुकसानग्रस्तांत फळबागधारकांचा अधिक समावेश आहे. या चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे जवळपास पावणेदहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यात मे महिन्याच्या मध्यावर तौक्ते चक्रीवादळ आले होते. तीन दिवस वारा वाहत होता. तसेच पाऊसही झाला. यामध्ये सातारा, खटाव, माण, जावळी हे वगळता इतर ७ तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यातील ५८.२५ हेक्टर क्षेत्राला वादळाचा फटका बसला. यामध्ये २९२ शेतकरी बाधित झाले आहेत. तर ९ लाख ७३ हजार ७५५ रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

तौक्ते चक्रीवादळात पाटण तालुक्यात अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. २८ हेक्टर क्षेत्राला फटका बसला. तर १४५ शेतकरी बाधित झाले आहेत. यामधील १४२ शेतकऱ्यांच्या फळबागांचे नुकसान झालेले आहे. तर तालुक्यात ५ लाखांहून अधिक रुपयांच्या उत्पन्नावर पाणी पडले आहे. महाबळेश्वर तालुक्यातही ५६ शेतकरी बाधित झाले असून सव्वाचार हेक्टर क्षेत्राला हानी पोहोचली. या तालुक्यात बागायत पिकांचे नुकसान झाले आहे. कऱ्हाड तालुक्यातील ४२ शेतकऱ्यांना फटका बसला. बागायत पीकधारक १६ आणि फळबागा असणाऱ्या २६ शेतकऱ्यांचे मिळून १ लाख ९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. बाधित क्षेत्र साडेसहा हेक्टरजवळ आहे.

कोरेगाव तालुक्यात २ शेतकऱ्यांचे ९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वाई तालुक्यातील ४५ शेतकऱ्यांचे २४ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, बाधित क्षेत्र १६ हेक्टरवर आहे. खंडाळा आणि तालुक्यात प्रत्येकी एका शेतकऱ्याला फटका बसला. फलटणमध्ये फळबागेचे ४३ हजार रुपयांचे नुकसान झाले.

चौकट :

४१ हेक्टरवरील फळबागांना फटका...

तौक्ते चक्रीवादळाचा बागायत पिकाखालील १०३ शेतकऱ्यांना फटका बसला. यामध्ये १६.६१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. तर २ लाख २४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर फळपिकाखालील १८९ शेतकऱ्यांना वादळाची हानी पोहोचली. ४१.६१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. तर साडेसात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

..........................................................