शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

शेतकऱ्यांचे संकट काही केल्या संपेना; वळवाचा हजारावर शेतकऱ्यांना फटका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:40 IST

सातारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांमागील पावसाचे शुक्लकाष्ठ संपता संपेना. फेब्रुवारीपासून दुसरा धक्का बसला आहे. मागील आठवड्यात वादळ, वळवाचा पाऊस आणि ...

सातारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांमागील पावसाचे शुक्लकाष्ठ संपता संपेना. फेब्रुवारीपासून दुसरा धक्का बसला आहे. मागील आठवड्यात वादळ, वळवाचा पाऊस आणि गारपिटीचा जिल्ह्यातील नजर अंदाजे ३२६ हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. यामधील बाधित शेतकऱ्यांची संख्या एक हजारांवर आहे. सध्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.

जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून दुष्काळी स्थिती नाही. वरुणराजाने भरभरून जिल्ह्यावर वर्षाव केला आहे. २०१९ मध्ये तर रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला, तर २०२० मध्येही ऑगस्ट महिन्यापासून धुवाधार पाऊस पडत होता. त्यामुळे मागीलवर्षीही सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद जिल्ह्यात झाली. त्यातच दुष्काळी तालुक्यातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. जलसंधारणाची कामे झाल्याने पाणी अडले व जिरले. त्यामुळे दुष्काळाची स्थिती राहिली नाही. पण, जिल्ह्यात दुष्काळ नसलातरी पावसाने नुकसान होण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस होता. मात्र, अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन आणि फळबागांचे नुकसान झालेले. यामधून शेतकरी सावरत असतानाच यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पुन्हा अवकाळी पावसाचा दणका बसला. खटाव, फलटण आणि कोरेगाव या तालुक्यातील पिकांचे नुकसान झालेले, तर आता गेल्या आठवड्यात वादळासह वळवाचा पाऊस आणि गारपीट झाली. यामध्ये खटाव आणि कोरेगाव या दोन तालुक्यांत मोठे नुकसान झाले आहे. पावसापेक्षा गारपीटच धोकादायक ठरली. मोठमोठ्या गारा पडल्या. त्यामुळे फळबागांना मोठा दणका बसला.

गारपिटीमुळे कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील आणि खटावच्या मोळ, डिस्कळ भागात काश्मीरचे रूप आले होते. शेत शिवारात सर्वत्र गारांचा खच होता. त्यामुळे टमाटा, चिकू, कलिंगडाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गारांचा ऐवढा मारा होता की कलिंगडला पाला राहिला नाही. तसेच आंब्याचेही नुकसान झाले. रानातील कांदाही नासू लागलाय. भाजीपाल्यालाही फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी उभा राहत असताना वळवाचा पाऊस आणि गारपिटीने दुसरा दणका दिला. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

गेल्या आठवड्यातील पावसात नुकसान झालेली पिके आणि फळबागांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे लवकरच आकडेवारी समोर येईल. पण, आधार मिळण्याठी नुकसानभरपाई लवकर मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांतून होत आहे.

चौकट :

पाऊस, गारपिटीतील नुकसानीची

नजरअंदाजे आकडेवारी

तालुका पिके बाधित क्षेत्र शेतकरी संख्या

(हेक्टरमध्ये)

कोरेगाव वांगी, टमाटा, कांदा, ८७ २९१

भाजीपाला, मका, झेंडू

अन् पपई.

खटाव आंबा, चिकू, हरभरा, घेवडा, २३७ ७२९

भाजीपाला, कांदा, मिरची,

टमाटा, मका, भुईमूग, बाजारी

व कलिंगड.

पाटण आंबा, मिरची, दुधी भोपळा. ०.२६ १

माण टमाटा अन् आंबा. २.१० ८

एकूण क्षेत्र ३२६.३६ हेक्टर. बाधित शेतकरी संख्या १०२९

.............................................................................

एखादा नुकसानीचा फोटो वापरावा...

....................................................................