शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे संकट काही केल्या संपेना; वळवाचा हजारावर शेतकऱ्यांना फटका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:40 IST

सातारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांमागील पावसाचे शुक्लकाष्ठ संपता संपेना. फेब्रुवारीपासून दुसरा धक्का बसला आहे. मागील आठवड्यात वादळ, वळवाचा पाऊस आणि ...

सातारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांमागील पावसाचे शुक्लकाष्ठ संपता संपेना. फेब्रुवारीपासून दुसरा धक्का बसला आहे. मागील आठवड्यात वादळ, वळवाचा पाऊस आणि गारपिटीचा जिल्ह्यातील नजर अंदाजे ३२६ हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. यामधील बाधित शेतकऱ्यांची संख्या एक हजारांवर आहे. सध्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.

जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून दुष्काळी स्थिती नाही. वरुणराजाने भरभरून जिल्ह्यावर वर्षाव केला आहे. २०१९ मध्ये तर रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला, तर २०२० मध्येही ऑगस्ट महिन्यापासून धुवाधार पाऊस पडत होता. त्यामुळे मागीलवर्षीही सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद जिल्ह्यात झाली. त्यातच दुष्काळी तालुक्यातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. जलसंधारणाची कामे झाल्याने पाणी अडले व जिरले. त्यामुळे दुष्काळाची स्थिती राहिली नाही. पण, जिल्ह्यात दुष्काळ नसलातरी पावसाने नुकसान होण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस होता. मात्र, अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन आणि फळबागांचे नुकसान झालेले. यामधून शेतकरी सावरत असतानाच यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पुन्हा अवकाळी पावसाचा दणका बसला. खटाव, फलटण आणि कोरेगाव या तालुक्यातील पिकांचे नुकसान झालेले, तर आता गेल्या आठवड्यात वादळासह वळवाचा पाऊस आणि गारपीट झाली. यामध्ये खटाव आणि कोरेगाव या दोन तालुक्यांत मोठे नुकसान झाले आहे. पावसापेक्षा गारपीटच धोकादायक ठरली. मोठमोठ्या गारा पडल्या. त्यामुळे फळबागांना मोठा दणका बसला.

गारपिटीमुळे कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील आणि खटावच्या मोळ, डिस्कळ भागात काश्मीरचे रूप आले होते. शेत शिवारात सर्वत्र गारांचा खच होता. त्यामुळे टमाटा, चिकू, कलिंगडाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गारांचा ऐवढा मारा होता की कलिंगडला पाला राहिला नाही. तसेच आंब्याचेही नुकसान झाले. रानातील कांदाही नासू लागलाय. भाजीपाल्यालाही फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी उभा राहत असताना वळवाचा पाऊस आणि गारपिटीने दुसरा दणका दिला. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

गेल्या आठवड्यातील पावसात नुकसान झालेली पिके आणि फळबागांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे लवकरच आकडेवारी समोर येईल. पण, आधार मिळण्याठी नुकसानभरपाई लवकर मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांतून होत आहे.

चौकट :

पाऊस, गारपिटीतील नुकसानीची

नजरअंदाजे आकडेवारी

तालुका पिके बाधित क्षेत्र शेतकरी संख्या

(हेक्टरमध्ये)

कोरेगाव वांगी, टमाटा, कांदा, ८७ २९१

भाजीपाला, मका, झेंडू

अन् पपई.

खटाव आंबा, चिकू, हरभरा, घेवडा, २३७ ७२९

भाजीपाला, कांदा, मिरची,

टमाटा, मका, भुईमूग, बाजारी

व कलिंगड.

पाटण आंबा, मिरची, दुधी भोपळा. ०.२६ १

माण टमाटा अन् आंबा. २.१० ८

एकूण क्षेत्र ३२६.३६ हेक्टर. बाधित शेतकरी संख्या १०२९

.............................................................................

एखादा नुकसानीचा फोटो वापरावा...

....................................................................