शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

सौजन्य अन् आपुलकीने निम्मे प्रश्न चुटकीसरशी सुटतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 23:23 IST

सातारा : ‘मकरसंक्रांतीचा सण म्हटलं की तीळगूळ घ्या गोड बोला, हे फक्त म्हणणं उपयोगाचं नाही, ते कृतीत आणणंही महत्त्वाचं ...

सातारा : ‘मकरसंक्रांतीचा सण म्हटलं की तीळगूळ घ्या गोड बोला, हे फक्त म्हणणं उपयोगाचं नाही, ते कृतीत आणणंही महत्त्वाचं आहे. पोलीस ठाण्यात येणाऱ्या लोकांजवळ सौजन्य अन् आपुलकीने वागल्यास निम्मे प्रश्न चुटकीसरशी सुटतात,’ असे मत जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी व्यक्त केले.पोलिसांबद्दल समाजात अनेकदा उलटसुलट बोललं जातं. मात्र, पोलीसही तुमच्या आमच्यासारखाच एक माणूस असतो. हे विसरून चालणार नाही. अंगात वर्दी असल्यामुळे तो वर्दीचे इमान राखतो. एखाद्या दुसºयाच्या चुकीमुळे संपूर्ण पोलीस दलच वाईट आहे, असा जो समज तयार होतो, तो चुकीचा आहे. आम्ही केवळ कायद्याचे पालन करत असतो. त्यामुळे कळत न कळत काहीजण दुखावले जातात. साहजिकच अशा लोकांकडून समाजात गैरसमज पसरवले जातात. त्यामुळे पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन काहीसा निराशाजनक असतो; परंतु आता हे सर्व बदलत चाललं आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि प्रामाणिकपणाला पोलिसांकडून नेहमीच उत्तम प्रतिसाद असतो. पोलीस ठाण्यात येणाºया सगळ्याच लोकांना गुन्हेगाराच्या नजरेतून न पाहता त्यांच्याशी आपुलकीने आणि सौजन्याने वागल्यास अनेक प्रश्न काही क्षणातच सुटतात. हाच संदेश मी माझ्या अधिकारी आणि कर्मचाºयांना देत असतो,’ असे सांगून पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुढे म्हणाले, ‘कायदा व सुव्यवस्थेच्या कामाबरोबरच नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असतात. प्रत्येक नागरिक हा पोलीस असतो. आपल्या आजूबाजूला घडणाºया घडामोडीवर प्रत्येकाने डोळसपणे पाहिले पाहिजे. तरच आपली स्वत:ची आणि आपल्या शेजाºयाची सुरक्षा अबाधित राहील. आपली लोकसंख्या दिवसागणिक वाढत आहे. त्या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ अत्यंत तुटपुंजे आहे. पोलिसांना प्रत्येक ठिकाणी सुरक्षा देणे शक्य नसते. त्यामुळे लोकांनीच सजग राहणे गरजेचे आहे.कायद्याचे पालन करताना काही वेळेला पोलिसांना कठोर निर्णय घ्यावे लागतात. परंतु त्या पाठीमागची भूमिका ही लोकहिताची असते. माझे सर्व अधिकारी आणि सहकाºयांना याची जाणीव असते. त्यामुळेच नागरिक, युवक-युवती यांच्याशी त्यांची नाळ घट्ट होत चालली आहे. संवाद आणि आपुलकीमुळे पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आगामी काळात बदलल्याचे दिसेल,’ असेही देशमुख म्हणाले.