शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सौजन्य अन् आपुलकीने निम्मे प्रश्न चुटकीसरशी सुटतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 23:23 IST

सातारा : ‘मकरसंक्रांतीचा सण म्हटलं की तीळगूळ घ्या गोड बोला, हे फक्त म्हणणं उपयोगाचं नाही, ते कृतीत आणणंही महत्त्वाचं ...

सातारा : ‘मकरसंक्रांतीचा सण म्हटलं की तीळगूळ घ्या गोड बोला, हे फक्त म्हणणं उपयोगाचं नाही, ते कृतीत आणणंही महत्त्वाचं आहे. पोलीस ठाण्यात येणाऱ्या लोकांजवळ सौजन्य अन् आपुलकीने वागल्यास निम्मे प्रश्न चुटकीसरशी सुटतात,’ असे मत जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी व्यक्त केले.पोलिसांबद्दल समाजात अनेकदा उलटसुलट बोललं जातं. मात्र, पोलीसही तुमच्या आमच्यासारखाच एक माणूस असतो. हे विसरून चालणार नाही. अंगात वर्दी असल्यामुळे तो वर्दीचे इमान राखतो. एखाद्या दुसºयाच्या चुकीमुळे संपूर्ण पोलीस दलच वाईट आहे, असा जो समज तयार होतो, तो चुकीचा आहे. आम्ही केवळ कायद्याचे पालन करत असतो. त्यामुळे कळत न कळत काहीजण दुखावले जातात. साहजिकच अशा लोकांकडून समाजात गैरसमज पसरवले जातात. त्यामुळे पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन काहीसा निराशाजनक असतो; परंतु आता हे सर्व बदलत चाललं आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि प्रामाणिकपणाला पोलिसांकडून नेहमीच उत्तम प्रतिसाद असतो. पोलीस ठाण्यात येणाºया सगळ्याच लोकांना गुन्हेगाराच्या नजरेतून न पाहता त्यांच्याशी आपुलकीने आणि सौजन्याने वागल्यास अनेक प्रश्न काही क्षणातच सुटतात. हाच संदेश मी माझ्या अधिकारी आणि कर्मचाºयांना देत असतो,’ असे सांगून पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुढे म्हणाले, ‘कायदा व सुव्यवस्थेच्या कामाबरोबरच नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असतात. प्रत्येक नागरिक हा पोलीस असतो. आपल्या आजूबाजूला घडणाºया घडामोडीवर प्रत्येकाने डोळसपणे पाहिले पाहिजे. तरच आपली स्वत:ची आणि आपल्या शेजाºयाची सुरक्षा अबाधित राहील. आपली लोकसंख्या दिवसागणिक वाढत आहे. त्या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ अत्यंत तुटपुंजे आहे. पोलिसांना प्रत्येक ठिकाणी सुरक्षा देणे शक्य नसते. त्यामुळे लोकांनीच सजग राहणे गरजेचे आहे.कायद्याचे पालन करताना काही वेळेला पोलिसांना कठोर निर्णय घ्यावे लागतात. परंतु त्या पाठीमागची भूमिका ही लोकहिताची असते. माझे सर्व अधिकारी आणि सहकाºयांना याची जाणीव असते. त्यामुळेच नागरिक, युवक-युवती यांच्याशी त्यांची नाळ घट्ट होत चालली आहे. संवाद आणि आपुलकीमुळे पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आगामी काळात बदलल्याचे दिसेल,’ असेही देशमुख म्हणाले.