शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

सौजन्य अन् आपुलकीने निम्मे प्रश्न चुटकीसरशी सुटतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 23:23 IST

सातारा : ‘मकरसंक्रांतीचा सण म्हटलं की तीळगूळ घ्या गोड बोला, हे फक्त म्हणणं उपयोगाचं नाही, ते कृतीत आणणंही महत्त्वाचं ...

सातारा : ‘मकरसंक्रांतीचा सण म्हटलं की तीळगूळ घ्या गोड बोला, हे फक्त म्हणणं उपयोगाचं नाही, ते कृतीत आणणंही महत्त्वाचं आहे. पोलीस ठाण्यात येणाऱ्या लोकांजवळ सौजन्य अन् आपुलकीने वागल्यास निम्मे प्रश्न चुटकीसरशी सुटतात,’ असे मत जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी व्यक्त केले.पोलिसांबद्दल समाजात अनेकदा उलटसुलट बोललं जातं. मात्र, पोलीसही तुमच्या आमच्यासारखाच एक माणूस असतो. हे विसरून चालणार नाही. अंगात वर्दी असल्यामुळे तो वर्दीचे इमान राखतो. एखाद्या दुसºयाच्या चुकीमुळे संपूर्ण पोलीस दलच वाईट आहे, असा जो समज तयार होतो, तो चुकीचा आहे. आम्ही केवळ कायद्याचे पालन करत असतो. त्यामुळे कळत न कळत काहीजण दुखावले जातात. साहजिकच अशा लोकांकडून समाजात गैरसमज पसरवले जातात. त्यामुळे पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन काहीसा निराशाजनक असतो; परंतु आता हे सर्व बदलत चाललं आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि प्रामाणिकपणाला पोलिसांकडून नेहमीच उत्तम प्रतिसाद असतो. पोलीस ठाण्यात येणाºया सगळ्याच लोकांना गुन्हेगाराच्या नजरेतून न पाहता त्यांच्याशी आपुलकीने आणि सौजन्याने वागल्यास अनेक प्रश्न काही क्षणातच सुटतात. हाच संदेश मी माझ्या अधिकारी आणि कर्मचाºयांना देत असतो,’ असे सांगून पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुढे म्हणाले, ‘कायदा व सुव्यवस्थेच्या कामाबरोबरच नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असतात. प्रत्येक नागरिक हा पोलीस असतो. आपल्या आजूबाजूला घडणाºया घडामोडीवर प्रत्येकाने डोळसपणे पाहिले पाहिजे. तरच आपली स्वत:ची आणि आपल्या शेजाºयाची सुरक्षा अबाधित राहील. आपली लोकसंख्या दिवसागणिक वाढत आहे. त्या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ अत्यंत तुटपुंजे आहे. पोलिसांना प्रत्येक ठिकाणी सुरक्षा देणे शक्य नसते. त्यामुळे लोकांनीच सजग राहणे गरजेचे आहे.कायद्याचे पालन करताना काही वेळेला पोलिसांना कठोर निर्णय घ्यावे लागतात. परंतु त्या पाठीमागची भूमिका ही लोकहिताची असते. माझे सर्व अधिकारी आणि सहकाºयांना याची जाणीव असते. त्यामुळेच नागरिक, युवक-युवती यांच्याशी त्यांची नाळ घट्ट होत चालली आहे. संवाद आणि आपुलकीमुळे पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आगामी काळात बदलल्याचे दिसेल,’ असेही देशमुख म्हणाले.