शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

नगरसेवकांना हवाय वीस लाखांचा निधी !

By admin | Updated: January 28, 2016 00:27 IST

स्थायी समिती आग्रही : विकासकामांना येणार गती; आगामी निवडणुकीची व्यूहरचना

दत्ता यादव -- सातारा --वॉर्डमध्ये विकासकामे करताना निधीची कमतरता भासत असल्याने सर्व नगरसेवकांना २० लाखांचा निधी मंजूर व्हावा, यासाठी स्थायी समितीचे प्रयत्न सुरू झाले असून, येत्या अर्थसंकल्पामध्ये हा विषय सर्वसाधारण सभेमध्ये मांडला जाणार आहे. आत्तापेक्षा हा निधी वाढवून मिळाल्यास विकासकामांना गती येणार असल्याचे सर्व नगरसेवकांचे म्हणणे आहे. हा निधी वाढविल्यास पालिकेच्या तिजोरीवर ताण येणार असल्याने यंदा थकबाकीदारांची वसुली शंभर टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.नगरसेवकांना वॉर्डमध्ये विकासकामे करण्यासाठी सध्या प्रत्येकी आठ लाखांचा निधी मिळत आहे. मात्र हा निधी अत्यल्प असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. एखाद्या वॉर्डमधील रस्त्याचे डांबरीकरण करायचे म्हटले तरी हा निधी संपून जातो. त्यामुळे इतर कामे करता येत नाहीत. आरोग्य, पाणी, नागरिकांना बसण्यासाठी सुविधा अशाप्रकारची काहीच विकासकामे करता येत नाहीत. एका गल्लीतील रस्ता पूर्ण करण्यासाठी चार ते पाच लाख रुपये लागतात. मग इतर ठिकाणी विकासकामे करण्यासाठी निधी आणायचा कुठून असाही प्रश्न नगरसेवकांसमोर आवासून उभा आहे. एकाच ठिकाणी निधी खर्च केल्यास अमूक कार्यकर्ता जवळचा म्हणून हा निधी खर्च करण्यात आला, असा मग नगरसेवकांवर आरोप होत असतो. त्यामुळे पालिकेकडून वाढीव निधी मंजूर करून वॉर्डमधील सर्वच नागरिकांना न्याय देता येईल, या हेतूने येत्या अर्थसंकल्पामध्ये हा वाढीव निधीचा विषय प्रामुख्याने पुढे आणला जाणार आहे. यासाठी नगरसेवक निशांत पाटील, अशोक मोने प्रयत्न करत आहेत.नगरसेवकाला वीस लाखांचा निधी मंजूर झाल्यास वर्षाला आठ कोटी रुपयांचा भार पालिकेला सोसावा लागणार आहे. यासाठी स्थायी समितीमध्ये खल सुरू आहे. पालिकेची जवळपास २० कोटींची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल झाल्यास नगरसेवकांना वाढीव निधी मंजूर होण्यास काही अडचण येणार नाही. सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय मंजूर झाल्यास तो जिल्हाधिकाऱ्यांकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. वसुलीवर मदार !गेल्या दहा वर्षांपासून एक रुपयाही पालिकेत न भरलेल्या मिळकतदारांची संख्या अधिक आहे. अशा धनाड्य आणि बलाढ्य लोकांकडून यंदा कसल्याही परिस्थितीत वसुली करायचीच, या इराद्याने पालिका वसुली मोहिमेस सुरुवात करणार आहे. ही वसुली झाली तरच नगरसेवकांना २० लाखांचा वाढीव निधी मिळणार आहे. त्यामुळे वसुली मोहिमेमध्ये कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. वसुली चांगल्या प्रकारे झाली, तर निधी मिळणार त्यामुळे वसुलीवरच अवलंबून असल्याचे नगरसेवक निशांत पाटील यांनी सांगितले.