शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

नगरसेवक, महसूल राज्यमंत्री ते धमाकेदार लोकप्रिय खासदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 23:55 IST

सातारा : छत्रपती घराण्याचे थेट तेरावे वंशज असलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांनी कायम सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहण्याचा प्रयत्न केला. राजकारणातील ...

सातारा : छत्रपती घराण्याचे थेट तेरावे वंशज असलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांनी कायम सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहण्याचा प्रयत्न केला. राजकारणातील त्यांचे उमेदवारीचे दिवस त्यांचीही सत्त्वपरीक्षा बघणारे होते. पण अनेक चढउतार आणि आरोपांच्या दिव्यातून गेल्यानंतर त्यांनी नगरपालिकेत एकहाती सत्ता घेतली. त्यानंतर गेल्या दीड दशकात त्यांनी मागे वळून पाहिले नाही. सामान्यांची नाळ ओळखून त्यांना घायाळ करणाऱ्या उदयनराजे यांच्यासमोर कुठलीच लाट टिकाव धरू शकत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.सातारा लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांनी तरुण आणि सामान्य हे त्यांचे ‘फोकस’ ठेवले. सातारा नगरपालिकेतून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. पहिल्यांदा अपयश पचविल्यानंतर त्यांनी लोक आग्रहास्तव पुन्हा तालुक्यात लक्ष घालण्याचा प्रयत्न केला. पितृछत्र हरपल्यामुळे त्यांना राजकारणात कोणीच गॉडफादर नव्हता. त्यावेळी साताºयातील अनेक सामान्य कार्यकर्त्यांच्या जोरावर त्यांनी राजकारणात टिकण्याचा प्रयत्न केला. एकीकडे कुटुंबातील संघर्ष टोकावर असतानाच त्यांना भारतीय जनता पार्टीत गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे प्रवेश केला. भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवून त्यांना महसूल राज्यमंत्रिपद मिळविले. त्यानंतर १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्यावर खुनाचा आरोप झाला. त्यात २२ महिने ते सर्वांपासून दूर गेले. या खटल्यातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर त्यांनी सातारा नगरपालिकेत २००१ सातारा विकास आघाडी स्थापन करून पॅनेल टाकले. त्यावेळी सहानुभूतीच्या लाटेत सत्तारुढ नगर विकास आघाडीला केवळ १ नगरसेवक मिळाला. नगराध्यक्षांसह तब्बल ३६ नगरसेवकांची फौज घेऊन उदयनराजे यांनी सातारा शहरावर राज्य केलं. त्यानंतर त्यांना आमदार म्हणून संधी मिळाली.उदयनराजे भोसलेखासदार, सातारा लोकसभा मतदारसंघ (वय : ५३)तरुणाईच्या गळ्यातील ताईत म्हणून परिचीतआई कल्पनाराजे भोसले, पत्नी दमयंतीराजे भोसले, मुलगा वीरप्रतापसिंहराजे, मुलगी नयनतारासातारा पालिका नगरसेवककृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षमहसूल राज्यमंत्रीमी सर्व पक्षीय आहे...!उदयनराजे यांचा राजकीय प्रवास हा कायम पक्षविरहित राहिला आहे. सर्व पक्षात मित्रांचा गोतावळा असल्यामुळे ते कधीच कोणत्या पक्षात अडकून राहिले नाहीत. सातारकरही पक्ष न बघता राजेंना मतदान करतात. जलमंदिर पॅलेस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राजेंनी सर्व खुर्च्या एकत्र करून आपण सर्वपक्षीय असल्याचं ठणकावलं होतं.मोदी लाटेतही सामान्यांच्या मनावर अधिराज्यराज्यात आणि केंद्रात कोणाचीही लाट आली तरी त्या लाटेचा कसलाच परिणाम साताºयात झाला नाही. उदयनराजेंचा मदत करण्याचा स्वभाव, कोणताही किचकट प्रश्न दबंग स्टाईलने सोडविण्याची कला, सातारकरांची नस ओळखून त्यांच्यासोबत राहण्याची वृत्ती याबरोबरच सर्वात महत्त्वाचं म्हणजे थेट तेरावे वंशज म्हणून सातारकरांशी असलेले त्यांचे नाते त्यांना कायम सहाय्यभूत ठरले आहे. नवीन आणलेल्या गाडीचे पूजन असो वा सेल्फीचा नाद असो, तरुणाईच्या हाकेला न्याय मिळवून देणारा नेता म्हणून ते सामान्यांपर्यंत कायम पोहोचले.कायम चर्चेत राहण्याची लकब उदयनराजे यांना लाभली आहे. चर्चेत राहण्याचा योग्य ‘टायमिंग सेन्स’ उदयनराजे यांच्यामध्ये आहे. त्यामुळे कोणीही ठरवून उदयनराजे यांना बोलायला भाग पाडू शकत नाही, याचा अनुभव अनेकांना आलेला आहे. त्यांच्या मनातील प्रत्येक भाव त्यांच्या चेहºयावर झळकतो. गेल्या काही वर्षांत उदयनराजे यांच्या वादग्रस्त विधानांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस चर्चेत राहिली. त्यांच्या हटके स्टाईलही राज्यात गाजली.