शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

CoronaVirus Lockdown :जिल्ह्यात ११ आमदार, ३ खासदार, राजकीय इच्छाशक्ती वाढविण्याची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 17:34 IST

जिल्ह्यातील मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर झालेल्या बदलानुसार अनेकांचे मतदारसंघ उडाले. काही नव्याने तयार झाल्याने त्याठिकाणी ताकद लावाली लागली. जिल्ह्यात दहाचे आठ आमदार झाले आणि दोनाचे एक खासदार झाले. पण जिल्ह्याचे राजकीय नशीब पालटले आणि आठचे अकरा आमदार आणि एकाचे तीन खासदार झाले.

ठळक मुद्देजिल्ह्यात ११ आमदार, ३ खासदार, राजकीय इच्छाशक्ती वाढविण्याची आवश्यकताजिल्ह्याची राजकीय ताकद वाढल्याने विकासाला जोर

दीपक शिंदेसातारा : जिल्ह्यातील मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर झालेल्या बदलानुसार अनेकांचे मतदारसंघ उडाले. काही नव्याने तयार झाल्याने त्याठिकाणी ताकद लावाली लागली. जिल्ह्यात दहाचे आठ आमदार झाले आणि दोनाचे एक खासदार झाले. पण जिल्ह्याचे राजकीय नशीब पालटले आणि आठचे अकरा आमदार आणि एकाचे तीन खासदार झाले.

राज्यसभेसाठी खासदार उदयनराजे भोसले आणि विधान परिषदेसाठी आमदार शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून १ खासदार आणि १ आमदार अधिक मिळाला. रामराजे नाईक निंबाळकर आणि महादेव जानकर यांच्यामुळे अकरा आमदार आणि तीन खासदार अशी राजकीय ताकद वाढलेलीय. या नेत्यांच्या राजकीय ताकदीचा जिल्ह्याच्या विकासासाठी नक्कीच फायदा होईल.

सातारा जिल्ह्यात मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर अनेक बदल झाले. एका मतदारसंघात दोन मतदारसंघ विलीन झाले आणि अनेक वर्षे मतदारसंघ राखून ठेवलेल्या नेत्याचे कसब पणाला लागले. या पुनर्रचनेनुसार जिल्ह्यात आमदारकीसाठी आठ मतदारसंघ आणि खासदारकीचा एक मतदारसंघ झाला.

सातारा-जावळी, वाई-महाबळेश्वर - खंडाळा, माण-खटाव, फलटण, कऱ्हाड दक्षिण, कऱ्हाड उत्तर, पाटण आणि कोरेगाव असे आठ मतदारसंघ तयार झाले. तर सातारा आणि कऱ्हाड मिळून खासदारकीचा एकच मतदारसंघ तयार झाला. त्यामुळे अनेकांची राजकीय कोंडी झाली. आपल्या विभागात प्रभाव असला तरी दुसऱ्या उमेदवाराच्या मतदारसंघात जाऊन ताकद लावावी लागली.

मतदारसंघाच्या पुनर्रचनेतच शशिकांत शिंदे यांचे घोडे जावळीत अडले. माथाडी कामगारांचे प्रतिनिधीत्व करणारे शशिकांत शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने जावळीतून उमेदवारी दिली आणि सलग दोनवेळा तेथून ते निवडूनही आले. हा मतदारसंघ सातारा आणि जावळी या भागात विभागला गेला आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासाठी शशिकांत शिंदे यांना हा मतदारसंघ सोडावा लागला. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने शशिकांत शिंदे यांची कोरेगावमध्ये व्यवस्था केली.

साताऱ्यातून शिवेंद्रसिंहराजेंनी शशिकांत शिंदेंना मदत करायची आणि जावळीत शशिकांत शिंदेंनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मदत करायची, असा अलिखित समझोता झाला. गत निवडणुकीत सर्वच राजकीय गणिते फिरली. शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये गेले आणि शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच थांबले. त्यांनाही भाजपचे आवतन होतेच, दबावही होता. पण, शरद पवार यांच्यावरील निष्ठा आणि प्रेमापोटी त्यांनी राष्ट्रवादी सोडली नाही.

खासदार उदयनराजे भोसले हे देखील राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात असताना शशिकांत शिंदे यांनी सर्व आमदारांचा रोष ओढावून त्यांना मदत केली. पण, शशिकांत शिंदे यांच्या विधानसभा निवडणुकीला खासदार उदयनराजेंची मदत युतीचे उमेदवार महेश शिंदे यांना झाली. इथेच अडचण झाली आणि सहा हजार मतांनी शशिकांत शिंदेंचा पराभव झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसची साताऱ्यातील प्रचाराची सुरुवात असो अगर शेवटची पावसातील सभा. यामध्ये शशिकांत शिंदे यांचे संघटन कौशल्य पाहायला मिळाले. राज्यात आणि जिल्ह्यातही राष्ट्रवादीला यश मिळाले; पण शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्याने शरद पवार यांनी साताऱ्यात विजयी सभा घेण्याचा निर्णय बदलला. एवढा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला.

राष्ट्रवादीच्या या निष्ठेचे फळ त्यांना मिळणारच होते. ते विधान परिषदेच्या सदस्याच्या रुपाने मिळाले. पुढे मंत्रिपदही मिळेल. कारण, पक्ष वाढीसाठी धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांना जपण्याची शरद पवार यांची पद्धत आहे. विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर आणि महादेव जानकर यांच्या माध्यमातून आणखी दोन आमदार वाढल्याने जिल्ह्यातील आमदारांचे संख्या अकरा झाली आहे. त्यामुळे पुनर्रचनेनंतरही जिल्ह्याची राजकीय ताकद वाढली आहे.

आत्तापर्यंत राजकीय ताकदीमध्ये सांगली जिल्हा अव्वल ठरत होता. या जिल्ह्यामध्ये तीन-तीन मंत्रिपदे दिली जात होती. त्याबरोबरच आता सातारा जिल्ह्याचेही राजकीय वजन वाढत आहे. सध्या जिल्ह्याच्या वाट्याला सहकारमंत्री आणि गृहराज्यमंत्री असे एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद आहे.

शशिकांत शिंदेंच्या माध्यमातून आणखी एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तसेच खासदार उदयनराजे भोसले यांनीही जरा जोर लावला तर त्यांनाही केंद्रातील मंत्रिपद मिळू शकते. असे झाले तर नक्कीच जिल्ह्याची राजकीय ताकद वाढून त्याची जिल्ह्याच्या विकासाला मदत होणार आहे.उदयराजेंचा तह...रणजितसिंहांची लॉटरी...राष्ट्रवादीने राखली जागाखासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये जाताना भाजपशीही अलिखित तहच केला होता. दगा फटका होऊन जर खासदारकीच्या निवडणुकीत पराभव झाला तर राज्यसभेवर खासदार म्हणून घेतले जावे, असे ठरले होते. भाजपने हा शब्द पाळला आणि उदयनराजे भोसले यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली. माढा मतदारसंघातही राजकीय उलथापालथ झाली आणि शरद पवार यांना स्वत:ला हा मतदारसंघ सोडावा लागला. भाजपने त्याठिकाणी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिली आणि या मतदारसंघातून ते निवडून आले.

जिल्ह्याला त्यांच्या रुपाने आणखी एक खासदार मिळाला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने सातारा मतदारसंघ राखण्यात यश मिळविल्याने खासदार श्रीनिवास पाटील, माढ्याच्या रुपाने खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि राज्यसभेच्या माध्यमातून खासदार उदयनराजे भोसले असे तीन खासदार जिल्ह्याला मिळाले. 

टॅग्स :PoliticsराजकारणSatara areaसातारा परिसर