शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

corona virus : सातारा पालिकेतील न थांबता..न थकता.. सुरू आहे लढा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 14:45 IST

सातारा पालिकेतील आरोग्यच नव्हे तर सर्वच विभाग न थकता, न थांबता गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना विरुद्ध निकराचा लढा देत आहेत.

ठळक मुद्देसातारा पालिकेतील न थांबता..न थकता.. सुरू आहे लढा !पयार्यी व्यवस्था नसल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार

सातारा : सातारा पालिकेतील आरोग्यच नव्हे तर सर्वच विभाग गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना विरुद्ध निकराचा लढा देत आहेत. न थकता, न थांबता हे कर्मचारी शहर सुरक्षित राहावं यासाठी झटत आहेत; परंतु जिल्हा प्रशासनाने पालिकेला पयार्यी व्यवस्थाच उभी न केल्याने पालिकेचे अधिकारी, कर्मचारी जर बाधित झाले तर कोरोना प्रतिबंधाचे काम करायचे कुणी? असा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो.सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा आता पंचवीस हजाराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाकडूनही ठोस पावले उचलली जात आहेत. मात्र, कोरोनाविरुद्ध लढा देणारे डॉक्टर, परिचारिका, पालिकेचे आरोग्य कर्मचारी, अधिकारी, पोलीस प्रशासन या सर्वांचीच गेल्या पाच महिन्यांपासून अक्षरश: दमछाक झाली आहे.

न थकता व न थांबता या कर्मचाऱ्यांचा कोरोना विरूध्द आरोग्यपूर्ण लढा सुरूच आहे.पालिकेतील कर्मचाºयांना स्वच्छतेपासून ते कोरोनामुळे दगावलेल्या मृतांवर अंत्यसंस्कार करण्यापर्यंतची सर्व कामे करावी लागतात. हे काम अत्यंत जोखमीचे असूनही कर्मचारी ते जबाबदारीने पार पाडत आहे. वास्तविक या कर्मचाऱ्यांना पंधरा दिवसांच्या कामकाजानंतर काही दिवस सुट्टी मिळणे गरजेचे आहे; परंतु तसे होताना दिसत नाही.

असे असूनही कर्मचारी, अधिकारी आपल्या कामात कोणताही खंड पडू देत नाही. पालिकेतील कोरोना, आरोग्य, पाणीपुरवठा, जन्म-मृत्यू, शहर विकास या विभागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. काही कर्मचाऱ्यांवर उपचारही सुरू आहेत. तरीदेखील पालिका प्रशासनाचे कोरोना प्रतिबंधाचे काम अविरत सुरुच आहे.सद्य परिस्थितीत जिल्ह्यासह सातारा शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास पालिकेपुढे अनेक प्रश्न उभे राहू शकतात. जिल्हा प्रशासनाने पालिकेला पयार्यी व्यवस्था उभी केली असती तर कोणत्याही कर्मचाऱ्यांवर आज कामकाजाचा अतिरिक्त ताण आला नसता. मात्र याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांची अवस्था ''सांगताही येईना आणि सहनही होईना'' अशीच काहीशी झाली आहे.

कोरोना प्रतिबंधासाठी पालिकेतील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी मोठ्या जबाबदारीने झटत आहे. प्रामुख्याने आरोग्य विभागावर कामाचा प्रचंड ताण येत आहे. तरीदेखील आमचे अधिकारी व कर्मचारी कोरोना विरूध्द अविरत लढा देत आहेत. कर्मचाºयांवरील कामाचा भार कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा.- अनिता घोरपडे, आरोग्य सभापती

पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर सातारा शहराचा नव्हे तर जिल्ह्याचा देखील भार आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्हापरिषद, पंचायत समिती, जलसंपदा आदी विभागातील कर्मचाऱ्यांवर थोड्याफार फार प्रमाणात कामाची जबाबदारी सोपविली तर पालिकेवर कामाचा भार कमी होइल.- धनंजय जांभळे, नगरसेवक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर