शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

खाली जलवाहिनी, वर गटाराचे पाणी; सातारकरांचे आरोग्य धोक्यात 

By सचिन काकडे | Updated: February 12, 2024 18:53 IST

सातारा : साताऱ्यातील गुलमोहर कॉलनीत गेल्या अनेक महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा सुरू असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या भागाला ...

सातारा : साताऱ्यातील गुलमोहर कॉलनीत गेल्या अनेक महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा सुरू असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या जीवन प्राधिकरणच्या जलवाहिनीवरूनच गटाराचे सांडपाणी वाहत असल्याने ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.सातारा शहराचा काही भाग व लगतच्या परिसराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. पीरवाडीपासून जवळच असलेल्या गुलमोहर कॉलनीला देखील जीवन प्राधिकरणकडूनच पाणीपुरवठा होतो. ज्या जलवाहिनीद्वारे या कॉलनीला पाणी वितरण केले जाते, ती जलवाहिनी ओढ्यालगत आहे. या ओढ्यातील व गटारातील सांडपाणी जलवाहिनीत मिसळत असल्याने पाणी प्रचंड दूषित होत आहे. या पाण्याला उग्र वास येत असून, नागरिकांना कित्येक वेळा पाण्यात अळ्या आढळून आल्या आहे. असा प्रकार सातत्याने घडू लागल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.या गंभीर समस्येबाबत जीवन प्राधिकरणच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेकदा सूचित केले आहे. मात्र, कोणीही ही बाब गांभीर्याने घेत नाही, असा आरोपही रहिवाशांनी केला आहे. जीवन प्राधिकरणने नागरिकांच्या आरोग्यासाठी ही जलवाहिनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीHealthआरोग्य