शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने, भाजपविरोधात घोषणाबाजी 

By नितीन काळेल | Updated: December 22, 2023 18:15 IST

सातारा : केंद्र शासनाने अधिवेशनादरम्यान १४३ खासदारांचे निलंबन केल्याच्या निषधार्थ साताऱ्यात काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजपच्या विरोधात जोरदार ...

सातारा : केंद्र शासनाने अधिवेशनादरम्यान १४३ खासदारांचे निलंबन केल्याच्या निषधार्थ साताऱ्यात काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.संसदेच्या अधिवेशनादरम्यान केंद्र शासनाने विविध राजकीय पक्षातील १४३ खासदारांचे निलंबन केले आहे. यामुळे केंद्र शासनाच्या माध्यमातून लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न होत आहे. तर १३ डिसेंबरला सुरक्षा व्यवस्था तोडून संसदेत पिवळा धूर पसरविण्यात आला. ही बाब अतिशय गंभीर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. उलट या गोष्टीची चौकशी न करता १४३ खासदारांचे निलंबन करण्यात आले. ही अतिशय चुकीची घटना आहे. त्यामुळे आम्ही याचा निषेध करत आहोत, असे काँग्रेसच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.जिल्हा काँग्रेस कमिटीसमोर जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. यामध्ये सातारा तालुकाध्यक्ष संदीप चव्हाण, रफिक बागवान, रजनी पवार, धनश्री महाडिक, सुषमा राजेघोरपडे, मनिषा पाटील, मालन परळकर, संभाजी उत्तेकर, अभय कारंडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcongressकाँग्रेसagitationआंदोलन