शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

शिंदे, पवार गट चोऱ्या लपविण्यासाठी सत्तेत; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल 

By नितीन काळेल | Updated: August 21, 2023 17:54 IST

भाजपला महाराष्ट्र पाहिजे त्यामुळे अमित शाह यांनी अगोदर शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली

सातारा : ‘राज्यातील स्थिती बदलली असून महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष मोठा झाला आहे. त्यातच महाविकास एकत्र लढल्यास भाजपचा पराभव निश्चित आहे. हे ओळखूनच त्यांनी फोडाफोडी सुरू केली आहे. त्यातूनच शिंदे आणि पवार गट चोऱ्या लपविण्यासाठीच सत्तेत गेले आहेत,’ असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.येथील जिल्हा काँग्रेस कमिटीत जिल्हा कार्यकारिणी आढावा बैठकीत चव्हाण बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, जिल्हा निरीक्षक श्रीरंग चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, राजेंद्र शेलार, उदयसिंह पाटील, प्रा. विश्वंभर बाबर, जगन्नाथ कुंभार, रजनी पवार, धनश्री महाडिक, निवास थोरात आदी उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, ‘राज्यातील सरकारमध्ये एक वाक्यता नाही. त्यांनी गद्दारी, फितुरी करुन आणि पाठीत खंजीर खुपसून सत्ता मिळवली आहे. त्यामुळे लोकांच्या मनात प्रचंड चीड निर्माण झालेली आहे. राज्यात आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यास भाजप जबाबदार आहे. त्यातच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र महत्वाचे राज्य आहे. त्यामुळे महाविकास आघाडी एकत्र लढली तर भाजप हरणार हे निश्चीत आहे. कारण, नुकताच कर्नाटकात भाजपचा पराभव झाला. तर भाजपकडे काही राज्यात नेतृत्वच नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे छत्तीसगड आणि राजस्थानमध्येही भाजपचा पराभव नक्की होणार आहे.भाजपला महाराष्ट्र पाहिजे त्यामुळे अमित शाह यांनी अगोदर शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. राष्ट्रवादीची फूट ही दुर्दैवी आहे. भाजप विरोधात काँग्रेस लढणार आहे असे सांगून माजी मुख्यमंत्री चव्हाण पुढे म्हणाले, ‘राज्यात मागीलवेळी ‘वंचित’मुळे अनेक ठिकाणी खासदार पडले आणि भाजपला त्याचा फायदा झाला. राज्यातील राजकीय परिस्थिती समजून सांगण्यासाठी सध्या चांगली पार्श्वभूमी आहे. त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तळागाळापर्यंत पोहचले पाहिजे.या बैठकीत पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले मत व्यक्त केले. तर बैठकीला जिल्हा कार्यकारिणीसह तालुकाध्यक्ष, विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारणcongressकाँग्रेसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे