शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

शिंदे, पवार गट चोऱ्या लपविण्यासाठी सत्तेत; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल 

By नितीन काळेल | Updated: August 21, 2023 17:54 IST

भाजपला महाराष्ट्र पाहिजे त्यामुळे अमित शाह यांनी अगोदर शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली

सातारा : ‘राज्यातील स्थिती बदलली असून महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष मोठा झाला आहे. त्यातच महाविकास एकत्र लढल्यास भाजपचा पराभव निश्चित आहे. हे ओळखूनच त्यांनी फोडाफोडी सुरू केली आहे. त्यातूनच शिंदे आणि पवार गट चोऱ्या लपविण्यासाठीच सत्तेत गेले आहेत,’ असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.येथील जिल्हा काँग्रेस कमिटीत जिल्हा कार्यकारिणी आढावा बैठकीत चव्हाण बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, जिल्हा निरीक्षक श्रीरंग चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, राजेंद्र शेलार, उदयसिंह पाटील, प्रा. विश्वंभर बाबर, जगन्नाथ कुंभार, रजनी पवार, धनश्री महाडिक, निवास थोरात आदी उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, ‘राज्यातील सरकारमध्ये एक वाक्यता नाही. त्यांनी गद्दारी, फितुरी करुन आणि पाठीत खंजीर खुपसून सत्ता मिळवली आहे. त्यामुळे लोकांच्या मनात प्रचंड चीड निर्माण झालेली आहे. राज्यात आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यास भाजप जबाबदार आहे. त्यातच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र महत्वाचे राज्य आहे. त्यामुळे महाविकास आघाडी एकत्र लढली तर भाजप हरणार हे निश्चीत आहे. कारण, नुकताच कर्नाटकात भाजपचा पराभव झाला. तर भाजपकडे काही राज्यात नेतृत्वच नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे छत्तीसगड आणि राजस्थानमध्येही भाजपचा पराभव नक्की होणार आहे.भाजपला महाराष्ट्र पाहिजे त्यामुळे अमित शाह यांनी अगोदर शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. राष्ट्रवादीची फूट ही दुर्दैवी आहे. भाजप विरोधात काँग्रेस लढणार आहे असे सांगून माजी मुख्यमंत्री चव्हाण पुढे म्हणाले, ‘राज्यात मागीलवेळी ‘वंचित’मुळे अनेक ठिकाणी खासदार पडले आणि भाजपला त्याचा फायदा झाला. राज्यातील राजकीय परिस्थिती समजून सांगण्यासाठी सध्या चांगली पार्श्वभूमी आहे. त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तळागाळापर्यंत पोहचले पाहिजे.या बैठकीत पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले मत व्यक्त केले. तर बैठकीला जिल्हा कार्यकारिणीसह तालुकाध्यक्ष, विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारणcongressकाँग्रेसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे