शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

संविधान बदलण्याच्या भाजपाच्या भूमिकेला काँग्रेसचा पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 19:51 IST

शरद पवारांना न भेटताच आंबेडकर निघून गेले

सातारा : पंतप्रधान व सरकारने मिळून सुप्रीम कोर्टाला ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. संविधान बदलण्याचा ठराव राज्यसभेत मांडला गेला, त्याला काँग्रेस पाठिंबा दिला. भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष मिळून देशात अस्थिर परिस्थिती निर्माण करत आहेत, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले, ‘काँग्रेस केवळ सांख्यिकी राजकारण खेळत आहे. अनुसूचित जाती व जमातीची यादी कमी करण्याचे काम १९६० मध्ये झाले. त्याला तेव्हाच्या सरकारने विरोध केला नाही. आता राज्यातील अलुतेदार व बलुतेदार एकत्र येऊन सरकार स्थापन करून आपला हक्क मिळवतील. आता कुणापुढेही हात पसरायला आम्ही जाणार नाही. २० मे रोजी सायंकाळी चार वाजता सत्ता संपादन परिषद होणार असून, पुढील लढ्याची दिशा ठरवली जाणार आहे, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. जाती-जातीत दंगल घडवून आणण्याचे डाव सरकार खेळत आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्याचा लढा वर्षानुवर्षे सुरू आहे. त्यांच्यासोबतच राज्यातील ३३ इतर जमातींचे प्रश्नही सुटलेले नाहीत. अटलबिहारी वाजपेयी यांनी सोलापुरात या समाजाचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील निवडणुकीत हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते पाळले नाही. २०१९ च्या निवडणुका तोंडावर असतानाही हा प्रश्न सुटलेला नाही. उलट धनगर-लिंगायत वाद पेटवण्याचे उद्योग भाजपच्या मंत्र्यांनी सुरू केले आहेत.

आम्ही कोणाच्या वाटेतील मांजर होणार नाही भाजपला रोखण्यासाठी आपण भूमिका घेत आहात, असा आरोप होत असतो, असे पत्रकारांनी विचारल्यावर आंबेडकर म्हणाले, ‘आम्ही कुणाच्याही वाटेतील मांजर होणार नाही.’

पंतप्रधानांच्या सूचनेमुळे भिडेंची अटक थांबली संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर एकच आरोप आहेत. एकबोटे यांना अटक झाली. मात्र, भिडे यांना अटक होत नाही, कारण त्यांना अटक करू नये, अशी खुद्द पंतप्रधान यांच्या सूचना आहेत.

शरद पवारांना न भेटताच आंबेडकर निघून गेलेसाताऱ्यातील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद सुरू असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विश्रामगृहावर दाखल झाले. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी आमदार प्रभाकर घार्गे हे त्यांच्यासोबत होते. पत्रकार परिषदेनंतर आंबेडकर पवारांना भेटतील, अशी शक्यता होती. परंतु पवारांना न भेटताच आंबेडकर बाहेर पडले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपाcongressकाँग्रेस