शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

संविधान बदलण्याच्या भाजपाच्या भूमिकेला काँग्रेसचा पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 19:51 IST

शरद पवारांना न भेटताच आंबेडकर निघून गेले

सातारा : पंतप्रधान व सरकारने मिळून सुप्रीम कोर्टाला ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. संविधान बदलण्याचा ठराव राज्यसभेत मांडला गेला, त्याला काँग्रेस पाठिंबा दिला. भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष मिळून देशात अस्थिर परिस्थिती निर्माण करत आहेत, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले, ‘काँग्रेस केवळ सांख्यिकी राजकारण खेळत आहे. अनुसूचित जाती व जमातीची यादी कमी करण्याचे काम १९६० मध्ये झाले. त्याला तेव्हाच्या सरकारने विरोध केला नाही. आता राज्यातील अलुतेदार व बलुतेदार एकत्र येऊन सरकार स्थापन करून आपला हक्क मिळवतील. आता कुणापुढेही हात पसरायला आम्ही जाणार नाही. २० मे रोजी सायंकाळी चार वाजता सत्ता संपादन परिषद होणार असून, पुढील लढ्याची दिशा ठरवली जाणार आहे, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. जाती-जातीत दंगल घडवून आणण्याचे डाव सरकार खेळत आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्याचा लढा वर्षानुवर्षे सुरू आहे. त्यांच्यासोबतच राज्यातील ३३ इतर जमातींचे प्रश्नही सुटलेले नाहीत. अटलबिहारी वाजपेयी यांनी सोलापुरात या समाजाचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील निवडणुकीत हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते पाळले नाही. २०१९ च्या निवडणुका तोंडावर असतानाही हा प्रश्न सुटलेला नाही. उलट धनगर-लिंगायत वाद पेटवण्याचे उद्योग भाजपच्या मंत्र्यांनी सुरू केले आहेत.

आम्ही कोणाच्या वाटेतील मांजर होणार नाही भाजपला रोखण्यासाठी आपण भूमिका घेत आहात, असा आरोप होत असतो, असे पत्रकारांनी विचारल्यावर आंबेडकर म्हणाले, ‘आम्ही कुणाच्याही वाटेतील मांजर होणार नाही.’

पंतप्रधानांच्या सूचनेमुळे भिडेंची अटक थांबली संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर एकच आरोप आहेत. एकबोटे यांना अटक झाली. मात्र, भिडे यांना अटक होत नाही, कारण त्यांना अटक करू नये, अशी खुद्द पंतप्रधान यांच्या सूचना आहेत.

शरद पवारांना न भेटताच आंबेडकर निघून गेलेसाताऱ्यातील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद सुरू असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विश्रामगृहावर दाखल झाले. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी आमदार प्रभाकर घार्गे हे त्यांच्यासोबत होते. पत्रकार परिषदेनंतर आंबेडकर पवारांना भेटतील, अशी शक्यता होती. परंतु पवारांना न भेटताच आंबेडकर बाहेर पडले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपाcongressकाँग्रेस