शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
6
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
7
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
8
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
9
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
10
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
11
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
12
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
13
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
14
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
15
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
16
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
17
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
18
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
19
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
20
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?

‘कास’चा पाणी पुरवठा बंद करण्याबाबत संभ्रम : पर्यायी व्यवस्थेचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 23:14 IST

कास धरणाचे काम जवळपास चाळीस टक्के पूर्ण झाले असून, धरणाकडून जलशुद्धीकरण केंद्राकडे येणाऱ्या पाण्याच्या पाटापर्यंत भिंत उभारली जाणार आहे. या कामासाठी सुमारे पंधरा दिवस कालावधी

ठळक मुद्देभिंत उभारण्यासाठी लागणार पंधरा दिवस कालावधी

सातारा/पेट्री : कास धरणाचे काम जवळपास चाळीस टक्के पूर्ण झाले असून, धरणाकडून जलशुद्धीकरण केंद्राकडे येणाऱ्या पाण्याच्या पाटापर्यंत भिंत उभारली जाणार आहे. या कामासाठी सुमारे पंधरा दिवस कालावधी लागणार असून, या कालावधीत शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्थेवर चर्चा सुरू आहे. पालिका, जलसंपदा विभाग व जीवन प्राधिकरणची बैठक झाल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

सातारा शहराला पाणीपुरवठा करणारी कास ही सर्वात जुनी योजना आहे. एक मार्च २०१८ पासून धरणाची उंची वाढविण्याचे काम जलसंपदा विभागाने हाती घेतले आहे. आतापर्यंत चाळीस टक्के काम पूर्ण झाले आहे. दोन डोझर, दोन रोलर, सात पोकलेन, पंचवीस डंपर तसेच ७५ कर्मचाºयांच्या मदतीने हे काम सुरू आहे. धरणाकडून जलशुद्धीकरण केंद्राकडे येणाºया पाण्याच्या पाटापर्यंत नवी भिंत उभारली जाणार आहे. या कामामुळे शहराला होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होऊ शकतो; परंतु पाणीपुरवठा विस्कळीत न करता पर्यायी व्यवस्था करूनच भिंतीचे काम हाती घेणार असल्याची माहिती मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दिली.

ते म्हणाले, ‘कास धरण ही पालिकेची महत्त्वाकांक्षी योजना आहे. धरणाचे काम सध्या गतीने सुरू आहे. भिंतीचे काम सुरू झाल्यानंतर पाणीपुरवठा विस्कळीत होऊ शकतो; परंतु या समस्येवर योग्य तो तोडगा काढला जाईल. जीवन प्राधिकरणचे पाणी उपलब्ध झाल्यास ही समस्याही संपुष्टात येईल. कासचे पाणी पंपिंग करून पुुन्हा पाटात सोडल्यास पाणीपुरवठा अखंडित राहू शकतो. याबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. पालिका, जलसंपदा विभाग व जीवन प्राधिकरणची बैठक झाल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. नागरिकांना कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नयेत, याची पालिका व जलसंपदा विभागाकडून काळजी घेतली जाणार आहे.पाणीपुरवठा बंद होणार नाही : श्रीकांत आंबेकरज्या बंदिस्त पाईपलाईनमधून शहराला पाणीपुरवठा केला जातो, त्या पाईपलाईनच्या कडेला संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा दुसरीकडून वळविला जाणार आहे. कासचा पाणीपुरवठा बंद होणार नाही; मात्र तो कमी-जास्त प्रमाणात होऊ शकतो. या कामाची पाहणी खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत केली आहे. जोपर्यंत कासचे पाणी वळविले जात नाही, तोपर्यंत भिंतीच्या कामास प्रारंभ होणार नाही. उदयनराजे यांनीही संबंधित विभागास याबाबतच्या सूचना केल्या आहेत. हे काम सुरू करण्यापूर्वी नागरिकांनी चार दिवस अगोदर पूर्वकल्पना देण्यात येईल, अशी माहिती पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDamधरण