शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

‘कास’चा पाणी पुरवठा बंद करण्याबाबत संभ्रम : पर्यायी व्यवस्थेचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 23:14 IST

कास धरणाचे काम जवळपास चाळीस टक्के पूर्ण झाले असून, धरणाकडून जलशुद्धीकरण केंद्राकडे येणाऱ्या पाण्याच्या पाटापर्यंत भिंत उभारली जाणार आहे. या कामासाठी सुमारे पंधरा दिवस कालावधी

ठळक मुद्देभिंत उभारण्यासाठी लागणार पंधरा दिवस कालावधी

सातारा/पेट्री : कास धरणाचे काम जवळपास चाळीस टक्के पूर्ण झाले असून, धरणाकडून जलशुद्धीकरण केंद्राकडे येणाऱ्या पाण्याच्या पाटापर्यंत भिंत उभारली जाणार आहे. या कामासाठी सुमारे पंधरा दिवस कालावधी लागणार असून, या कालावधीत शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्थेवर चर्चा सुरू आहे. पालिका, जलसंपदा विभाग व जीवन प्राधिकरणची बैठक झाल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

सातारा शहराला पाणीपुरवठा करणारी कास ही सर्वात जुनी योजना आहे. एक मार्च २०१८ पासून धरणाची उंची वाढविण्याचे काम जलसंपदा विभागाने हाती घेतले आहे. आतापर्यंत चाळीस टक्के काम पूर्ण झाले आहे. दोन डोझर, दोन रोलर, सात पोकलेन, पंचवीस डंपर तसेच ७५ कर्मचाºयांच्या मदतीने हे काम सुरू आहे. धरणाकडून जलशुद्धीकरण केंद्राकडे येणाºया पाण्याच्या पाटापर्यंत नवी भिंत उभारली जाणार आहे. या कामामुळे शहराला होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होऊ शकतो; परंतु पाणीपुरवठा विस्कळीत न करता पर्यायी व्यवस्था करूनच भिंतीचे काम हाती घेणार असल्याची माहिती मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दिली.

ते म्हणाले, ‘कास धरण ही पालिकेची महत्त्वाकांक्षी योजना आहे. धरणाचे काम सध्या गतीने सुरू आहे. भिंतीचे काम सुरू झाल्यानंतर पाणीपुरवठा विस्कळीत होऊ शकतो; परंतु या समस्येवर योग्य तो तोडगा काढला जाईल. जीवन प्राधिकरणचे पाणी उपलब्ध झाल्यास ही समस्याही संपुष्टात येईल. कासचे पाणी पंपिंग करून पुुन्हा पाटात सोडल्यास पाणीपुरवठा अखंडित राहू शकतो. याबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. पालिका, जलसंपदा विभाग व जीवन प्राधिकरणची बैठक झाल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. नागरिकांना कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नयेत, याची पालिका व जलसंपदा विभागाकडून काळजी घेतली जाणार आहे.पाणीपुरवठा बंद होणार नाही : श्रीकांत आंबेकरज्या बंदिस्त पाईपलाईनमधून शहराला पाणीपुरवठा केला जातो, त्या पाईपलाईनच्या कडेला संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा दुसरीकडून वळविला जाणार आहे. कासचा पाणीपुरवठा बंद होणार नाही; मात्र तो कमी-जास्त प्रमाणात होऊ शकतो. या कामाची पाहणी खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत केली आहे. जोपर्यंत कासचे पाणी वळविले जात नाही, तोपर्यंत भिंतीच्या कामास प्रारंभ होणार नाही. उदयनराजे यांनीही संबंधित विभागास याबाबतच्या सूचना केल्या आहेत. हे काम सुरू करण्यापूर्वी नागरिकांनी चार दिवस अगोदर पूर्वकल्पना देण्यात येईल, अशी माहिती पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDamधरण