शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

रखरखत्या उन्हाची तमा न बाळगता ‘उमेद’ने करुन दाखवले, साताऱ्यातील ९ लाख नागरिकांशी साधला संवाद 

By नितीन काळेल | Updated: May 8, 2024 18:47 IST

पथकांनी घराबाहेर पडून केले प्रोत्साहित 

सातारा : रखरखत्या उन्हाची तमा न बाळगता महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत पथकांनी घराबाहेर पडून लोकांना मतदानासाठी प्रोत्साहित केले. ९ लाख नागरिकांशी संवाद साधला. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढीस हातभार लागला. यामुळे ‘उमेद’ टीमचे काैतुक होत आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आणि स्वीप कक्षाच्या जिल्हा नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यासह जिल्हा प्रशासनाने मतदानाचा टक्का वाढीसाठी विविध पातळीवर प्रयत्न केले. यासाठी उपक्रम राबवून मतदारांत जनजागृती करण्यात आली. याचा फायदा या निवडणुकीत दिसून आला. तसेच या मतदानवाढीसाठी ‘उमेद’मधील महिलांनीही मोठी कामगिरी बजावलीय. जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला रखरखत्या उन्हाची तमा न बाळगता उमेद अंतर्गत कार्यरत टीमने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कारण ‘उमेद’मध्ये कार्यरत प्रेरिकांनी गृहभेटी, प्रत्यक्ष पात्र मतदारांची भेट घेऊन मतदान करण्यास प्रोत्साहित केले. यामुळेच गतवर्षीपेक्षा उन्हाची तीव्रता अधिक असतानाही मतदानाचा टक्का वाढविण्यास हातभार लागला. मागील निवडणुकीत ६० टक्क्यांहून अधिक मतदान सातारा लोकसभेसाठी झाले होते. यंदा हेच मतदान ६३ टक्क्यांवर पोहोचले आहे. यामध्ये अंतिम टक्केवारीत वाढ होणार आहे. त्यामुळे मागील निवडणुकीपेक्षा आता मतदान अधिक झाल्याचेच स्पष्ट झाले आहे. यासाठी स्वीप कक्षाच्या नोडल अधिकारी याशनी नागराजन आणि ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे यांचे प्रयत्नही कारणीभूत ठरले आहेत.

१० हजार महिलांशी संवाद..मतदान टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मतदार जनजागृती अभियान मोठ्या प्रमाणात राबविले. यामध्ये दुचाकी रॅली, चित्र प्रदर्शन, गृह भेटीद्वारे पत्रक वाटप करण्यात आले. त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांनी समाजमाध्यमाद्वारे ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत सुमारे १० हजार महिलांशी संवाद साधत मतदान वाढवण्यासाठी कशा पद्धतीने कार्यवाही करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील सुमारे १५ हजार १८७ बचत समूह, ९६७ ग्रामसंघ आणि ५१ प्रभागसंघाच्या बैठका घेऊन सुमारे १७ हजार समुदाय संस्थांचे सदस्य आणि पदाधिकारी कंबर कसून मतदार जनजागृतीसाठी मैदानात उतरले होते.

मतदान राहिले त्यांना नेले केंद्रावर..‘उमेद’ टीमने रखरखत्या उन्हाची कसलीही पर्वा न करता ग्रामीण भागातील प्रत्येक घरी जाऊन सुमारे ९ लाख नागरिकांचे मतदानाविषयी समुपदेशन केले. याशिवाय मतदानादिवशीही आपली जबाबदारी १०० टक्के बजावताना वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक व्यक्ती केंद्रापर्यंत जाऊन प्रत्यक्ष मतदान कसे करेल यासाठी नियोजन केले. कोणाचे मतदान झाले, कोणाचे बाकी आहे याची माहिती घेतली. त्यानंतर मतदान राहिले आहे त्यांना केंद्रापर्यंत पोहोचवण्याचे काम केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsatara-pcसाताराlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Votingमतदान