शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

ssc exam: महाविद्यालयाची कवाडे खुली करणारी परीक्षा उद्यापासून, शिक्षण विभाग सज्ज 

By प्रगती पाटील | Updated: February 29, 2024 19:25 IST

सातारा जिल्ह्यातील ३७ हजार विद्यार्थी सज्ज

सातारा : महाविद्यालयीन प्रवेशाची कवाडे खुली करणारी दहावीची परीक्षा शुक्रवार दिनांक एक मार्चपासून सुरू होत आहे. सातारा जिल्ह्यातील ११६ परीक्षा केंद्रातून ३७ हजार ६५८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. शिक्षण विभागाच्या वतीने या परीक्षांची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात १५ परिरक्षक केंद्रे असून एकही परीक्षा केंद्रे उपद्रवी नाही.

सातारा जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांमध्ये १ ते २६ मार्च २०२४ दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. शाळेतील सुमारे ३७ हजार ६५८ विद्यार्थी यासाठी प्रविष्ट आहेत. कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी प्रशासन आग्रही असून त्या दृष्टीने ही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षा काळात कोणीही कॉपी करणार नाही यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. सापडलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांची कोणत्याही कारणांनी गय केली जाणार नसल्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.

परीक्षा केंद्राजवळ जमावबंदीजिल्ह्यातील परीक्षा केंद्रांजवळ फिरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. केंद्राजवळ जमावबंदीचा आदेश लागू केल्याने कोणीही फिरताना आढळून आल्यास कारवाईचे आदेश दिले आहेत. याबरोबरच केंद्रा जवळील झेरॉक्स दुकान, कॉम्प्युटर सेंटर बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने संबंधित दुकानदारांना देण्यात आले आहेत.

अशी आहेत भरारी पथकेबोर्डा मार्फत जिल्हास्तरीय नियुक्त भरारी पथके प्रत्येक तालुक्यात ठेवण्यात आली आहेत. एक तहसीलदार, गटविकास अधिकारी, एक गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फत प्रत्येक केंद्रावर एक बैठ्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत विभाग प्रमुखांचे प्रत्येक तालुक्यात एक पथक तैनात राहणार आहे.

परीक्षा काळात वीजपुरवठा खंडित नकोजिल्ह्यातील दहावीची परीक्षा सुरू होत असताना परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना अडचण होईल असे कृत्य होऊ नये यासाठी प्रशासकीय पातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत परीक्षा काळात वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसात साताऱ्याचा पारा भलताच वाढल्याने परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना उकडण्याचीही शक्यता आहे. यावरही आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने संबंधित प्रशासनाला दिल्या आहेत.

दहावी परीक्षेसाठी जिल्ह्यात तणावमुक्त वातावरण असावे यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांनी वेळेआधी अर्धा तास परीक्षा केंद्रांवर उपस्थित रहावे आणि तणाव मुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे. - प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक

टॅग्स :Satara areaसातारा परिसरssc examदहावी