शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

ssc exam: महाविद्यालयाची कवाडे खुली करणारी परीक्षा उद्यापासून, शिक्षण विभाग सज्ज 

By प्रगती पाटील | Updated: February 29, 2024 19:25 IST

सातारा जिल्ह्यातील ३७ हजार विद्यार्थी सज्ज

सातारा : महाविद्यालयीन प्रवेशाची कवाडे खुली करणारी दहावीची परीक्षा शुक्रवार दिनांक एक मार्चपासून सुरू होत आहे. सातारा जिल्ह्यातील ११६ परीक्षा केंद्रातून ३७ हजार ६५८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. शिक्षण विभागाच्या वतीने या परीक्षांची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात १५ परिरक्षक केंद्रे असून एकही परीक्षा केंद्रे उपद्रवी नाही.

सातारा जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांमध्ये १ ते २६ मार्च २०२४ दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. शाळेतील सुमारे ३७ हजार ६५८ विद्यार्थी यासाठी प्रविष्ट आहेत. कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी प्रशासन आग्रही असून त्या दृष्टीने ही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षा काळात कोणीही कॉपी करणार नाही यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. सापडलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांची कोणत्याही कारणांनी गय केली जाणार नसल्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.

परीक्षा केंद्राजवळ जमावबंदीजिल्ह्यातील परीक्षा केंद्रांजवळ फिरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. केंद्राजवळ जमावबंदीचा आदेश लागू केल्याने कोणीही फिरताना आढळून आल्यास कारवाईचे आदेश दिले आहेत. याबरोबरच केंद्रा जवळील झेरॉक्स दुकान, कॉम्प्युटर सेंटर बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने संबंधित दुकानदारांना देण्यात आले आहेत.

अशी आहेत भरारी पथकेबोर्डा मार्फत जिल्हास्तरीय नियुक्त भरारी पथके प्रत्येक तालुक्यात ठेवण्यात आली आहेत. एक तहसीलदार, गटविकास अधिकारी, एक गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फत प्रत्येक केंद्रावर एक बैठ्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत विभाग प्रमुखांचे प्रत्येक तालुक्यात एक पथक तैनात राहणार आहे.

परीक्षा काळात वीजपुरवठा खंडित नकोजिल्ह्यातील दहावीची परीक्षा सुरू होत असताना परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना अडचण होईल असे कृत्य होऊ नये यासाठी प्रशासकीय पातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत परीक्षा काळात वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसात साताऱ्याचा पारा भलताच वाढल्याने परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना उकडण्याचीही शक्यता आहे. यावरही आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने संबंधित प्रशासनाला दिल्या आहेत.

दहावी परीक्षेसाठी जिल्ह्यात तणावमुक्त वातावरण असावे यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांनी वेळेआधी अर्धा तास परीक्षा केंद्रांवर उपस्थित रहावे आणि तणाव मुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे. - प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक

टॅग्स :Satara areaसातारा परिसरssc examदहावी