शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांचा फोन येताच उमेदवारी घेतली मागे! बंडखोरी रोखण्यात भाजपला यश; उद्धवसेना मात्र अपयशी
2
तब्बल ६६ नगरसेवक बिनविरोध; भाजपचे सर्वाधिक ४३, शिंदेसेनेचे १९; ...तर आयोग करणार तपास
3
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ जानेवारी २०२६ : दिवस अत्यंत आनंददायी, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल!
5
सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
6
बिनविरोधचे हसू अन् बंडखोरीचे आसू; महामुंबईतील मोजके बंडखोरही सत्ताधाऱ्यांचेच; अनेकांनी घेतली माघार
7
राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  
8
धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 
9
मराठी दलित साहित्य हा भारतीय साहित्यविश्वाचा आधारस्तंभ - मृदुला गर्ग  
10
मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट
11
कृतिशील, निर्मितीशील असणे हेच जीवनाचे इतिवृत्त - तारा भवाळकर
12
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
13
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
14
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
15
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
16
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
17
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
18
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
19
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
20
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
Daily Top 2Weekly Top 5

नागरिक व वन विभागामध्ये संघर्ष अटळ !

By admin | Updated: September 28, 2016 00:23 IST

महाबळेश्वर टोल एकत्रिकरण : टोलविरोधी कृती समितीची स्थापना

महाबळेश्वर : महाबळेश्वर टोल एकत्रिकरणाला विरोध करण्यासाठी टोलविरोधी कृती समिती स्थापन करून न्यायालयीन लढा उभारण्याबरोबरच गावाने तीव्र आंदोलनाची तयारी करण्याचा निर्णय नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या नागरिकांच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे भविष्यात नागरिक व वन विभाग यांच्यातील संघर्ष आता अटळ मानला जात आहे.नगरपालिकेसह व स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असतानाही जिल्हा प्रशासनाने पालिका व वन विभागाच्या टोलनाक्यांचे एकत्रिकरणाचा चंग बांधला असून, वन विभागाने येथे त्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे. वन विभागाचे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाबळेश्वरात तळ ठोकला असून, कोणत्याही क्षणी वन विभाग एकत्रित टोल वसुली सुरू करणार असल्याचे दिसत आहे. अनेकवेळा विरोध करूनही वन विभाग पालिकेच्या व नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने गावात वन विभागाच्या कारभाराविरुद्ध तीव्र असंतोष पसरला आहे. ही बाब लक्षात घेऊन नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल यांनी या संदर्भात विचार विनिमय करून निर्णय घेण्यासाठी नागरिकांची तातडीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला १९ पैकी १६ नगरसेवक उपस्थित होते. तर माजी नगराध्यक्ष किसनराव शिंदे, अर्बन बँकेचे संचालक समीर सुतार, सी. डी. बावळेकर, लीलाताई शिंदे, रमेश शिंदे, अनंत पारठे, अतुल सलागरे, विशाल तोष्णीवाल, रामचंद्र हिरवे, अशोक शिंदे, गणेश दगडे, गोविंद कदम, संदीप आखाडे, अमित ढेबे, हिरो शेख आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत नगरसेवकांनी आपली भूमिका स्पष्ट केली. टोल घेण्यास पालिकेचा विरोध नव्हता व पुढेही राहणार नाही. दोन वर्षांपूर्वीच एकत्रित टोल वसुली करण्यासाठी पालिकेने सर्वानुमते ठराव करून सहमती दर्शविली आहे. परंतु वन विभागाने पाच रुपये वसूल करण्यास होकार दिला होता; परंतु पालिकेच्या ठरावाकडे दुर्लक्ष करून वन विभागाने पंधरा रुपये वसूल करण्याची तयारी सुरू केली. याला पालिकेचा विरोध आहे. वन विभागाला जर पालिकेचे म्हणणे पटत नसेल तर त्यांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या कोणत्याही एका पॉइंटवर एकत्रित टोल वसूल करावा. पालिकेच्या वेण्णा लेक येथील टोलनाक्यावरच वसुली करण्याचा हट्ट वन विभागाने करून गावाला वेठीस धरू नये. गावाच्या सहनशीलतेचा अंत वन विभागाने पाहू नये, असा सज्जड इशाराही मंगळवारी झालेल्या सभेत सर्व पक्षीय नगरसेवकांनी दिला.जर वन विभागाने आपली भूमिका बदलली नाही तर लोकशाही व सदनशीर मार्गाने आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय ही मंगळवारी झालेल्या नागरिकांच्या बैठकीत घेण्यात आला. आंदोलनासंदर्भात निवेदन संबंधित विभागाच्या सर्व सक्षम अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे, असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे नागरिक आणि वन विभाग यांच्यात संघर्ष रंगणार असे चिन्ह आहेत. (प्रतिनिधी)वन विभागाचा उंट गावच्या तंबूत शिरतोय!टोल एकत्रिकरणाच्या नावाखाली वन विभागाचा उंट गावाच्या तंबूत शिरण्याचा प्रयत्न करीत आहे. हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे, असे मत काही नागरिकांनी व्यक्त केले. उद्या काळ सोकावण्याचा धोका शहरासमोर उभा ठाकला आहे. हा धोका नागरिकांनी ओळखला पाहिजे नाही तर पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही, अशा संतप्त भावनाही काही नागरिकांनी व्यक्त केल्या. आज टोलनाक्यावर अधिकार दाखवतील, उद्या ते पालिकेच्या इमारतीही वन विभागाच्या मालकीची असल्याचा दावा करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत. तेव्हा हा टोल एकत्रिकरणाचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी गावाने एक व्हावे, असे आवाहनही या बैठकीत करण्यात आले.