शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नागरिक व वन विभागामध्ये संघर्ष अटळ !

By admin | Updated: September 28, 2016 00:23 IST

महाबळेश्वर टोल एकत्रिकरण : टोलविरोधी कृती समितीची स्थापना

महाबळेश्वर : महाबळेश्वर टोल एकत्रिकरणाला विरोध करण्यासाठी टोलविरोधी कृती समिती स्थापन करून न्यायालयीन लढा उभारण्याबरोबरच गावाने तीव्र आंदोलनाची तयारी करण्याचा निर्णय नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या नागरिकांच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे भविष्यात नागरिक व वन विभाग यांच्यातील संघर्ष आता अटळ मानला जात आहे.नगरपालिकेसह व स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असतानाही जिल्हा प्रशासनाने पालिका व वन विभागाच्या टोलनाक्यांचे एकत्रिकरणाचा चंग बांधला असून, वन विभागाने येथे त्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे. वन विभागाचे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाबळेश्वरात तळ ठोकला असून, कोणत्याही क्षणी वन विभाग एकत्रित टोल वसुली सुरू करणार असल्याचे दिसत आहे. अनेकवेळा विरोध करूनही वन विभाग पालिकेच्या व नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने गावात वन विभागाच्या कारभाराविरुद्ध तीव्र असंतोष पसरला आहे. ही बाब लक्षात घेऊन नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल यांनी या संदर्भात विचार विनिमय करून निर्णय घेण्यासाठी नागरिकांची तातडीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला १९ पैकी १६ नगरसेवक उपस्थित होते. तर माजी नगराध्यक्ष किसनराव शिंदे, अर्बन बँकेचे संचालक समीर सुतार, सी. डी. बावळेकर, लीलाताई शिंदे, रमेश शिंदे, अनंत पारठे, अतुल सलागरे, विशाल तोष्णीवाल, रामचंद्र हिरवे, अशोक शिंदे, गणेश दगडे, गोविंद कदम, संदीप आखाडे, अमित ढेबे, हिरो शेख आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत नगरसेवकांनी आपली भूमिका स्पष्ट केली. टोल घेण्यास पालिकेचा विरोध नव्हता व पुढेही राहणार नाही. दोन वर्षांपूर्वीच एकत्रित टोल वसुली करण्यासाठी पालिकेने सर्वानुमते ठराव करून सहमती दर्शविली आहे. परंतु वन विभागाने पाच रुपये वसूल करण्यास होकार दिला होता; परंतु पालिकेच्या ठरावाकडे दुर्लक्ष करून वन विभागाने पंधरा रुपये वसूल करण्याची तयारी सुरू केली. याला पालिकेचा विरोध आहे. वन विभागाला जर पालिकेचे म्हणणे पटत नसेल तर त्यांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या कोणत्याही एका पॉइंटवर एकत्रित टोल वसूल करावा. पालिकेच्या वेण्णा लेक येथील टोलनाक्यावरच वसुली करण्याचा हट्ट वन विभागाने करून गावाला वेठीस धरू नये. गावाच्या सहनशीलतेचा अंत वन विभागाने पाहू नये, असा सज्जड इशाराही मंगळवारी झालेल्या सभेत सर्व पक्षीय नगरसेवकांनी दिला.जर वन विभागाने आपली भूमिका बदलली नाही तर लोकशाही व सदनशीर मार्गाने आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय ही मंगळवारी झालेल्या नागरिकांच्या बैठकीत घेण्यात आला. आंदोलनासंदर्भात निवेदन संबंधित विभागाच्या सर्व सक्षम अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे, असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे नागरिक आणि वन विभाग यांच्यात संघर्ष रंगणार असे चिन्ह आहेत. (प्रतिनिधी)वन विभागाचा उंट गावच्या तंबूत शिरतोय!टोल एकत्रिकरणाच्या नावाखाली वन विभागाचा उंट गावाच्या तंबूत शिरण्याचा प्रयत्न करीत आहे. हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे, असे मत काही नागरिकांनी व्यक्त केले. उद्या काळ सोकावण्याचा धोका शहरासमोर उभा ठाकला आहे. हा धोका नागरिकांनी ओळखला पाहिजे नाही तर पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही, अशा संतप्त भावनाही काही नागरिकांनी व्यक्त केल्या. आज टोलनाक्यावर अधिकार दाखवतील, उद्या ते पालिकेच्या इमारतीही वन विभागाच्या मालकीची असल्याचा दावा करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत. तेव्हा हा टोल एकत्रिकरणाचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी गावाने एक व्हावे, असे आवाहनही या बैठकीत करण्यात आले.