शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

दुकानात बंदीचा फलक तरी मुलांकडे चायनीज मांजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 22:58 IST

जगदीश कोष्टी ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : पतंग उडविण्यात धम्माल करण्यासाठी मुलांचे लक्ष नागपंचमीकडे लागलेले असते. पतंगासाठी चायनीज मांजा वापरण्याकडे तरुणाईचा कल वाढला आहे; पण हा मांजा वाहनचालक, पादचाऱ्यांच्या जीवावर उठत आहेत. लोणंद, फलटणमध्ये दोघेजण जखमी झाले. या प्रकारानंतर साताºयातील अनेक दुकानांसमोर ‘चायनीज मांजा मिळत नाही, बंदी आहे,’ असे फलक लागले ...

जगदीश कोष्टी ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : पतंग उडविण्यात धम्माल करण्यासाठी मुलांचे लक्ष नागपंचमीकडे लागलेले असते. पतंगासाठी चायनीज मांजा वापरण्याकडे तरुणाईचा कल वाढला आहे; पण हा मांजा वाहनचालक, पादचाऱ्यांच्या जीवावर उठत आहेत. लोणंद, फलटणमध्ये दोघेजण जखमी झाले. या प्रकारानंतर साताºयातील अनेक दुकानांसमोर ‘चायनीज मांजा मिळत नाही, बंदी आहे,’ असे फलक लागले आहेत. तरीही ते मुलांना मिळतात, हे विशेष.जिल्ह्यातील अनेक भागांत नागपंचमीला पतंग मोठ्या प्रमाणावर उडविले जातात. पूर्वी यासाठी मांजा घरीच केला जात असायचा, यासाठी अनेक दिवसांपासून तयारी सुरू असायची. नेहमीच्या दोºयालाच ट्यूब लाईट, बल्बच्या काचांचा चुरा करून तो खळीतून लावला जायचा. अनेक तास वाळवून त्यापासून मांजा केला जात असायचा. तेव्हाही एकमेकांचे पतंग कापण्याची जणू स्पर्धाच लागलेली असायची.बदलत्या बाजारपेठेत पारंपरिक मांजाला पर्याय म्हणून चायनीज मांजा दाखल झाला आहे. जिल्ह्यातील बाजारपेठेत गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची विक्री सुरू आहे. ‘चॅवम्याव’ नावानंही ओळखला जात असलेला हा मांजा खूपच धारदार आहे. तसेच तो नायलॉनपासून बनलेला असल्याने त्याचा तिढा बसला तर सोडवणं खूपच अवघड जातं. त्यामुळे लोणंद येथे दोन दिवसांपूर्वी दुचाकीवरून निघालेले फलटण तालुक्यातील मुंजवडी येथील दत्तात्रय किसन आवळे यांच्या गळ्याला मांजाचा फास बसला. काही कळायच्या आत प्रचंड रक्तस्त्राव होऊ लागला. त्याचवेळी त्यांच्यासोबत मुलगा विकी होता. त्याने तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे वेळीच उपचार मिळाले; पण त्यांच्या गळ्याला आठ टाके पडले. तर सोमवारी सकाळी फलटण-आसू रस्त्यावर कामावरून घराकडे दुचाकीवरून जात असताना राजाळेनजीक ननवरे वस्तीजवळ चायनीज मांजा कापल्याने सुरेश संभाजी जगताप गंभीर जखमी झाले. त्यांना पंधरा टाके पडले आहेत.जीवघेणा चायनीज मांजावर बंदी आणावी, अशी मागणी वारंवार केली जात आहे. अशा घटना घडल्या की मांजा काउंटरवरून दूर केला जातो. मांजाला बंदी असल्याचा फलकही झळकला जातो; पण तरीही मुलांच्या हाती हा येतोय कोठून? याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. हा मांजा वापरापासून मुलांना पालकांनी परावृत करण्याची गरज आहे.भाजीची पाटी अन् घरातून विक्रीससाताºयातील अनेकांनी विक्री बंद केली असली तरी काही जणांकडून छुप्या पध्दतीने विकला जातो. हे मुलांनाही माहिती आहे. घर, भाजी मंडईतील भाजीच्या खाली ठेवून त्याची विक्री केली जाते. त्या ठिकाणी सहज मिळतो, अशी माहिती काही तरुणांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितली.