शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

भंगार वेचणाऱ्या मुलांच्या हाती आली पाटी अन् पेन्सील -अजित बल्लाळ यांची जिद्द शालाबाह्य वीस मुले शिक्षणाच्या प्रवाहात:

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 00:18 IST

सकाळ झाली की भंगार वेचणं अन् मिळालेल्या पैशातून पोट भरणं एवढाच त्या चिमुकल्यांचा दिनक्रम. परिस्थितीशी झगडणाºया या मुलांना शिक्षणाचा जराही गंध नव्हता. मात्र, लिंब-गोवे येथे राहणाºया एका शिक्षकाने या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न

सचिन काकडे ।सातारा : सकाळ झाली की भंगार वेचणं अन् मिळालेल्या पैशातून पोट भरणं एवढाच त्या चिमुकल्यांचा दिनक्रम. परिस्थितीशी झगडणाºया या मुलांना शिक्षणाचा जराही गंध नव्हता. मात्र, लिंब-गोवे येथे राहणाºया एका शिक्षकाने या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरू केलाय. या प्रयत्नांना आता यश आलं असून, भंगार वेचणारी ती मुलं हाती पाटी-पेन्सील घेऊन ज्ञान अर्जित करू लागली आहेत. अजित बल्लाळ असे या ध्येयवेड्या शिक्षकाचे नाव आहे.

अजित बल्लाळ येथे साताºयातील पालिकेच्या शाळा क्रमांक १६ मध्ये कार्यरत आहे. पहिली ते सातवीपर्यंत या शाळेत एकूण १८४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धतीचा अवलंब करून अजित बल्लाळ गुणवत्तावाढीसाठी शाळेत नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवितात. सामान्य ज्ञान असो की गणिती क्रिया अ‍ॅकरेलिक बोर्डचा वापर करून साध्या सोप्या भाषेत ते विद्यार्थ्यांना शिकवितात. एकीकडे गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करत असताना शालाबाह्य मुलांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणले पाहिजे, अशी कल्पना त्यांना मनात घर करून गेली आणि त्यांनी ती सत्यात उतरविली.

सातारा शहर व परिसरात अनेक लहान मुले त्यांना भंगार वेचताना आढळून आली. या मुलांना काही करून शाळेत दाखल करायचे, असा निर्धार त्यांनी केला. त्यानुसार त्यांनी मुलांच्या घरी जाऊन प्रथम आई-वडिलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्याकडून होकार मिळताच बल्लाळ यांनी भंगार वेचणाºया मुलांना वयोगटानुसार ज्या-त्या वर्गात प्रवेश मिळवून दिला. आतापर्यंत एकूण वीस मुले त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणली आहेत. या मुलांना शिक्षण देण्याबरोबरच गरजेनुसार त्यांना शैक्षणिक साहित्यही ते स्वत: उपलब्ध करतात. ‘भंगार वेचणारे हात आता शब्दांशी खेळू लागले आहेत. याचं त्यांच्या निरक्षर आई-वडिलांनाही आता अप्रूप वाटू लागलं आहे.अनाथ मुलांना नेहमीच मदतीचा हातज्या मुलांच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे, अशी काही मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत. या मुलांनाही गरजेनुसार शैक्षणिक मदत करण्याचे काम अजित बल्लाळ करतात. एकीकडे पालिका शाळांचा पट खालावत असताना दुसरीकडे शालाबाह्य व गरीब मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून पट टिकवून ठेवण्याचे कामही अजित बल्लाळ निरंतर करीत आहेत. 

भंगार वेचणाºया मुलांना आता शिक्षणातून व्यवहारज्ञान समजू लागले आहे. काही मुलं आजही भंगार गोळा करतात आणि वेळेनुसार शाळेत येतात. शिक्षणाप्रती त्यांच्यामध्ये थोडी का होईना गोडी निर्माण होत आहे. मुलांना घडविण्याचे काम कठीण असले तरी अशक्य मुळीच नाही. हे काम पुढे सुरूच ठेवणार आहे.- अजित बल्लाळ, शिक्षक