शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

भंगार वेचणाऱ्या मुलांच्या हाती आली पाटी अन् पेन्सील -अजित बल्लाळ यांची जिद्द शालाबाह्य वीस मुले शिक्षणाच्या प्रवाहात:

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 00:18 IST

सकाळ झाली की भंगार वेचणं अन् मिळालेल्या पैशातून पोट भरणं एवढाच त्या चिमुकल्यांचा दिनक्रम. परिस्थितीशी झगडणाºया या मुलांना शिक्षणाचा जराही गंध नव्हता. मात्र, लिंब-गोवे येथे राहणाºया एका शिक्षकाने या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न

सचिन काकडे ।सातारा : सकाळ झाली की भंगार वेचणं अन् मिळालेल्या पैशातून पोट भरणं एवढाच त्या चिमुकल्यांचा दिनक्रम. परिस्थितीशी झगडणाºया या मुलांना शिक्षणाचा जराही गंध नव्हता. मात्र, लिंब-गोवे येथे राहणाºया एका शिक्षकाने या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरू केलाय. या प्रयत्नांना आता यश आलं असून, भंगार वेचणारी ती मुलं हाती पाटी-पेन्सील घेऊन ज्ञान अर्जित करू लागली आहेत. अजित बल्लाळ असे या ध्येयवेड्या शिक्षकाचे नाव आहे.

अजित बल्लाळ येथे साताºयातील पालिकेच्या शाळा क्रमांक १६ मध्ये कार्यरत आहे. पहिली ते सातवीपर्यंत या शाळेत एकूण १८४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धतीचा अवलंब करून अजित बल्लाळ गुणवत्तावाढीसाठी शाळेत नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवितात. सामान्य ज्ञान असो की गणिती क्रिया अ‍ॅकरेलिक बोर्डचा वापर करून साध्या सोप्या भाषेत ते विद्यार्थ्यांना शिकवितात. एकीकडे गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करत असताना शालाबाह्य मुलांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणले पाहिजे, अशी कल्पना त्यांना मनात घर करून गेली आणि त्यांनी ती सत्यात उतरविली.

सातारा शहर व परिसरात अनेक लहान मुले त्यांना भंगार वेचताना आढळून आली. या मुलांना काही करून शाळेत दाखल करायचे, असा निर्धार त्यांनी केला. त्यानुसार त्यांनी मुलांच्या घरी जाऊन प्रथम आई-वडिलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्याकडून होकार मिळताच बल्लाळ यांनी भंगार वेचणाºया मुलांना वयोगटानुसार ज्या-त्या वर्गात प्रवेश मिळवून दिला. आतापर्यंत एकूण वीस मुले त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणली आहेत. या मुलांना शिक्षण देण्याबरोबरच गरजेनुसार त्यांना शैक्षणिक साहित्यही ते स्वत: उपलब्ध करतात. ‘भंगार वेचणारे हात आता शब्दांशी खेळू लागले आहेत. याचं त्यांच्या निरक्षर आई-वडिलांनाही आता अप्रूप वाटू लागलं आहे.अनाथ मुलांना नेहमीच मदतीचा हातज्या मुलांच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे, अशी काही मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत. या मुलांनाही गरजेनुसार शैक्षणिक मदत करण्याचे काम अजित बल्लाळ करतात. एकीकडे पालिका शाळांचा पट खालावत असताना दुसरीकडे शालाबाह्य व गरीब मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून पट टिकवून ठेवण्याचे कामही अजित बल्लाळ निरंतर करीत आहेत. 

भंगार वेचणाºया मुलांना आता शिक्षणातून व्यवहारज्ञान समजू लागले आहे. काही मुलं आजही भंगार गोळा करतात आणि वेळेनुसार शाळेत येतात. शिक्षणाप्रती त्यांच्यामध्ये थोडी का होईना गोडी निर्माण होत आहे. मुलांना घडविण्याचे काम कठीण असले तरी अशक्य मुळीच नाही. हे काम पुढे सुरूच ठेवणार आहे.- अजित बल्लाळ, शिक्षक