शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

मुख्यमंत्र्यांनी टोलमुक्तीचा वटहुकूम काढावा

By admin | Updated: June 27, 2014 00:57 IST

कऱ्हाड बाजार समितीच्या मैदानात ठिय्या : टोलविरोधी कृती समितीचा एकच नारा

मलकापूर : ‘शहराअंतर्गत टोल देशात कुठेही नाही. आंदोलने करून कोल्हापूरवासीयांची सहनशीलता संपली आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या अधिकारात कोल्हापूर टोलमुक्तीचा वटहुकूम काढावा; अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला कोल्हापुरात फिरकूही देणार नाही,’ असा इशारा टोलविरोधी कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे. कऱ्हाड येथील बाजार समितीच्या मैदानात टोलविरोधी कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यावेळी कृती समितीच्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे म्हणाले, ‘कोल्हापूर शहरातील तीन लाख चौरस फुटाचा भूखंड ‘आयआरबी’च्या ताब्यात आहे. त्याचे बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन करावे व आयआरबीने केलेल्या कामाचेही मूल्यांकन करावे. ज्यांचे देणे लागेल, त्यांचे देणे मुख्यमंत्र्यांनी भागवावे. मात्र, हा शहरातील जनतेवरील अन्याय थांबवावा, अन्यथा कोल्हापूरची जनता पेटून उठेल.’ बाबा इंदूलकर म्हणाले, ‘कोल्हापूरची शाहू महाराजांची संस्कृती वेगळी आहे. आंदोलकांना कऱ्हाड शहराच्या एका बाजूला जागा देऊन प्रशासनाने दुजाभाव केला आहे. टोल रद्द हा निर्णय लवकर नाही घेतल्यास शासन व प्रशासनास मोठी किंमत मोजावी लागेल.’ यावेळी दिलीप देसाई, बाबा पार्टे, रामभाऊ चव्हाण, चंद्रकांत यादव, दिलीप पोवार, महापौर सुनीता राऊत, ‘जनसुराज्य’चे जयंत पाटील, राष्ट्रवादीचे राजू लाटकर, विरोधी गटनेते मुरलीधर जाधव, अनिल राऊत, विनायक फाळके, रमेश पुरेकर, प्रकाश काटे, जयकुमार शिंदे, दीपा पाटील, वैशाली महाडिक, सुचिता साळोखे, सुजाता चव्हाण, आक्काताई जाधव, विजया फुले यांच्यासह सुमारे तीनशे आंदोलक अांदोलनात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)