शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

बावकलवाडीत सोहळा : तीनशे वृद्धांनी कापला एकाच वेळी केक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:02 IST

वाढदिवस म्हटलं की प्रत्येकाच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण. परंतु ज्यांचा वाढदिवस कधी साजराच झाला नाही, त्यांचं काय? अशा व्यक्तींच्या जीवनात आनंदाचे रंग भरण्यासाठी बावकलवाडी

ठळक मुद्देतरुणांच्या अनोख्या उपक्रमाने अनेकजण गहिवरलेखंडाळा तालुक्यातील बावकलवाडी हे तसं कष्टकरी शेतकऱ्यांचं गाव.

लोणंद : वाढदिवस म्हटलं की प्रत्येकाच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण. परंतु ज्यांचा वाढदिवस कधी साजराच झाला नाही, त्यांचं काय? अशा व्यक्तींच्या जीवनात आनंदाचे रंग भरण्यासाठी बावकलवाडी येथील तरुणांना एक कल्पना सुचली अन् त्यांनी ती प्रत्यक्षात पूर्णही केली. आधारकार्डवर एकच जन्मतारीख असलेल्या गावातील तब्बल तीनशे वयोवृद्धांना त्यांनी एकत्र केलं अन् मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा केला.

खंडाळा तालुक्यातील बावकलवाडी हे तसं कष्टकरी शेतकऱ्यांचं गाव. शेती हेच येथील ग्रामस्थांच्या उदरनिर्वाहाचं मुख्य साधन. आताची पिढी शिक्षण अन् नोकरीसाठी घराबाहेर पडली आहे. तर दुसरीकडे गावातील वयोवृद्ध व्यक्तींच्या रुपाने आठवणींचा झरा आजही अखंडपणे वाहत आहे. गावाची लोकसंख्या हजारांच्या घरात असून, यामध्ये सुमारे तीनशे ते चारशे वृद्ध पुरूष व महिलांचा समावेश आहे.

काही वृद्धांच्या आधारकार्डवर १ जानेवारी अशी जन्मतारीख नोंदविण्यात आल्याची माहिती गावातील तरुणांना मिळाली. तरुणांनी पाहणी केली असता एकच जन्मतारीख असलेल्या तीनशे महिला व पुरुषांची नावे समोर आली. या वृद्धांसाठी आपण काहीतरी करावं, अशी कल्पना त्यांना सुचली. त्यानुसार सर्व वृद्धांचा वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले.

ठरल्याप्रमाणे तरुणांनी लोकवर्गणी गोळा केली. वृद्ध महिला व पुरुषांच्या वाढदिवसाचे निमंत्रण देण्यात आले. गावात भव्य स्टेज उभारण्यात आला. आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. वाढदिवसाची तयारी पूर्ण झाल्यानंतर तीनशे वृद्ध महिला व पुरुषांनी केक कापून आपला पहिला-वहिला वाढदिवस साजरा केला. या अनोख्या उपक्रमाने वयोवृद्धांचा आनंद द्विगुणित झाला होता. प्रत्येकाने एकमेकांना व आपल्या कुटुंबीयांना केक खाऊ घालून वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.

देशभरात साजरा झालेला हा अशाप्रकारचा पहिलाच उपक्रम असून, या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.कष्टकरी लोकांना त्यांच्या वाढदिवसाचा आनंद उपभोगता यावा, हाच या उपक्रमागील उद्देश आहे. प्रत्येक गावात अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात यावा. अशी माहिती गणेश केसकर यांनी दिली.वृक्षांची लागवडवाढदिवसानिमित्त गावात विद्यार्थ्यांकडून वृक्ष दिंडी काढण्यात आली. तसेच वेगवेगळ्या जातीच्या तब्बल २ हजार ५०० वृक्षांची लागवड करण्यात आली. या झाडांचे संवर्धन करण्याचा निर्धार विद्यार्थी व ग्रामस्थांनी केला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांना ग्रामस्थांनी भरभरून दाद दिली. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरIndiaभारत