शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

बावकलवाडीत सोहळा : तीनशे वृद्धांनी कापला एकाच वेळी केक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:02 IST

वाढदिवस म्हटलं की प्रत्येकाच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण. परंतु ज्यांचा वाढदिवस कधी साजराच झाला नाही, त्यांचं काय? अशा व्यक्तींच्या जीवनात आनंदाचे रंग भरण्यासाठी बावकलवाडी

ठळक मुद्देतरुणांच्या अनोख्या उपक्रमाने अनेकजण गहिवरलेखंडाळा तालुक्यातील बावकलवाडी हे तसं कष्टकरी शेतकऱ्यांचं गाव.

लोणंद : वाढदिवस म्हटलं की प्रत्येकाच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण. परंतु ज्यांचा वाढदिवस कधी साजराच झाला नाही, त्यांचं काय? अशा व्यक्तींच्या जीवनात आनंदाचे रंग भरण्यासाठी बावकलवाडी येथील तरुणांना एक कल्पना सुचली अन् त्यांनी ती प्रत्यक्षात पूर्णही केली. आधारकार्डवर एकच जन्मतारीख असलेल्या गावातील तब्बल तीनशे वयोवृद्धांना त्यांनी एकत्र केलं अन् मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा केला.

खंडाळा तालुक्यातील बावकलवाडी हे तसं कष्टकरी शेतकऱ्यांचं गाव. शेती हेच येथील ग्रामस्थांच्या उदरनिर्वाहाचं मुख्य साधन. आताची पिढी शिक्षण अन् नोकरीसाठी घराबाहेर पडली आहे. तर दुसरीकडे गावातील वयोवृद्ध व्यक्तींच्या रुपाने आठवणींचा झरा आजही अखंडपणे वाहत आहे. गावाची लोकसंख्या हजारांच्या घरात असून, यामध्ये सुमारे तीनशे ते चारशे वृद्ध पुरूष व महिलांचा समावेश आहे.

काही वृद्धांच्या आधारकार्डवर १ जानेवारी अशी जन्मतारीख नोंदविण्यात आल्याची माहिती गावातील तरुणांना मिळाली. तरुणांनी पाहणी केली असता एकच जन्मतारीख असलेल्या तीनशे महिला व पुरुषांची नावे समोर आली. या वृद्धांसाठी आपण काहीतरी करावं, अशी कल्पना त्यांना सुचली. त्यानुसार सर्व वृद्धांचा वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले.

ठरल्याप्रमाणे तरुणांनी लोकवर्गणी गोळा केली. वृद्ध महिला व पुरुषांच्या वाढदिवसाचे निमंत्रण देण्यात आले. गावात भव्य स्टेज उभारण्यात आला. आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. वाढदिवसाची तयारी पूर्ण झाल्यानंतर तीनशे वृद्ध महिला व पुरुषांनी केक कापून आपला पहिला-वहिला वाढदिवस साजरा केला. या अनोख्या उपक्रमाने वयोवृद्धांचा आनंद द्विगुणित झाला होता. प्रत्येकाने एकमेकांना व आपल्या कुटुंबीयांना केक खाऊ घालून वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.

देशभरात साजरा झालेला हा अशाप्रकारचा पहिलाच उपक्रम असून, या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.कष्टकरी लोकांना त्यांच्या वाढदिवसाचा आनंद उपभोगता यावा, हाच या उपक्रमागील उद्देश आहे. प्रत्येक गावात अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात यावा. अशी माहिती गणेश केसकर यांनी दिली.वृक्षांची लागवडवाढदिवसानिमित्त गावात विद्यार्थ्यांकडून वृक्ष दिंडी काढण्यात आली. तसेच वेगवेगळ्या जातीच्या तब्बल २ हजार ५०० वृक्षांची लागवड करण्यात आली. या झाडांचे संवर्धन करण्याचा निर्धार विद्यार्थी व ग्रामस्थांनी केला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांना ग्रामस्थांनी भरभरून दाद दिली. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरIndiaभारत