शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
4
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
5
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
6
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
7
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
8
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
9
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
10
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
11
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
12
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
13
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
14
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
15
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
16
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
17
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
18
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
19
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
20
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...

नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करा : देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:40 IST

कोयनानगर : ‘राज्यातील कोरोनाचे संकट अद्याप कमी झाले नाही. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन शासनाने काही निर्बंध घालून ...

कोयनानगर : ‘राज्यातील कोरोनाचे संकट अद्याप कमी झाले नाही. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन शासनाने काही निर्बंध घालून दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करून गणेशोत्सव सण साजरा करावा लागणार आहे. दहा दिवस साजरा केला जाणारा हा सण शांततेच्या वातारणामध्ये नियमांचे पालन करून कोरोनाचा संसर्ग होऊ नये, याची दक्षता घेऊन आपण सर्वजण साजरा करावा,’ असे आवाहन गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी केले.

मंत्री देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ‘प्रतिवर्षी महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा केला जातो. श्री गणेशाचे आगमन नेहमी उत्साही, आनंदी व जल्लोषाचेवातावरण निर्माण करणारे आहे. दोन वर्षांपासून कोरोनामुळे सण अत्यंत साधेपणाने, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून सर्वजण साजरा करीत आहोत. त्यामुळे हा सण साजरा करताना काही मर्यादाही येऊ लागल्या असल्या, तरी राज्यातील नागरिक या नियमांचे पालन करून सण साजरा करत आहेत.’

‘राज्यावरील कोरोना संसर्गाचे संकट अद्यापही कमी झालेले नाही. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन शासनाने काही निर्बंध घालून दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करून हा सण साजरा करावा लागणार आहे. दहा दिवस साजरा केला जाणारा हा सण शांततेच्या वातावरणात, नियमांचे पालन करून, कोरोनाचा संसर्ग होऊ नये याची दक्षता घेऊन आपण सर्वजण साजरा करावा. उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राहण्याच्यादृष्टीने सर्वांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे,’ असे आवाहन शंभूराज देसाई यांनी केले.